शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
2
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
3
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

पावसाळ्यातही मराठवाड्याच्या घशाला कोरड

By admin | Updated: August 8, 2014 01:23 IST

औरंगाबाद : निम्मा पावसाळा संपला तरी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. उलट दिवसेंदिवस विभागात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे.

औरंगाबाद : निम्मा पावसाळा संपला तरी मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर झालेली नाही. उलट दिवसेंदिवस विभागात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढत आहे. सद्य:स्थितीत विभागातील ९२६ गावांना ७२३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ११४४ गावांची तहान त्या-त्या परिसरातील विहिरी अधिग्रहित करून भागविण्यात येत आहे.संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे यंदा मराठवाड्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. रिमझिम पडणाऱ्या पावसावर पिके तग धरून आहेत. मात्र, भूजल पातळी खालावल्याने, तसेच सर्व प्रकल्प कोरडे पडल्यामुळे विभागातील पाणीटंचाई कायम आहे. उलट टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. मराठवाड्यात मागील आठवड्यापर्यंत ९२० गावांना ७१९ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. या आठवड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढल्यामुळे टँकरची संख्याही ४ ने वाढली आहे. सध्या विभागात ९२६ गावांना ७२३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईची तीव्रता औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत सर्वाधिक आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ३२२ टँकर सुरू आहेत. तर बीड जिल्ह्यातील टँकरची संख्याही २३४ वर पोहोचली आहे. परभणी जिल्ह्यात मात्र, सध्या एकही टँकर सुरू नाही. तसेच हिंगोली जिल्ह्यात अवघे २ टँकर सुरू आहेत.३९ तालुक्यांमध्ये तीव्र टंचाईसर्वच जिल्ह्यांत पाणीटंचाई जाणवत असली तरी काही तालुक्यांमध्ये त्याची तीव्रता अधिक आहे. मराठवाड्यातील ७६ पैकी ३९ तालुक्यांमध्ये भीषण स्वरूपाची पाणीटंचाई जाणवत आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ८, जालना जिल्ह्यातील ५, हिंगोली जिल्ह्यातील २, नांदेड जिल्ह्यातील ६, बीड जिल्ह्यातील ८, लातूर ४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ६ तालुक्यांना टंचाईच्या झळा बसत आहेत. टंचाईग्रस्त गावांची तहान भागविण्यासाठी ठिकठिकाणी विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. मराठवाड्यात १४८१ गावांमध्ये एकूण २०३३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.४बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४९५ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ उस्मानाबाद जिल्ह्यात ४४८, नांदेड जिल्ह्यात ३९६, औरंगाबाद जिल्ह्यात ३४१, जालना जिल्ह्यात १३०, लातूर जिल्ह्यात १५७, हिंगोली जिल्ह्यात ५२ आणि परभणी जिल्ह्यात १४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.