शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणास सरकार अनुकूल

By admin | Updated: March 21, 2016 00:22 IST

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार अनुकूल असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केले.

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार अनुकूल असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केले. नारायणगडावर शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था उघडण्याची घोषणाही त्यांनी केली.रविवारी श्रीक्षेत्र नारायणगड येथे नगद नारायण महाराज यांचा द्विशताब्दीपूर्ती पुण्यतिथी व महंत शिवाजी महाराज यांच्या एकषष्टीनिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. विनायक मेटे होते. यावेळी माजी खा. रजनी पाटील, माजी मंत्री अशोक पाटील, माजी आ. राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे, सिराज देशमुख, आदिनाथ नवले, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, अशोक हंगे, प्रा. सुशीला मोराळे यांच्यासह लक्ष्मण महाराज मेंगडे व संत महंत उपस्थित होते.यावेळी नगद नारायण महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. एकषष्टीनिमित्त मठाधिपती शिवाजी महाराज यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव झाला. मानपत्राचे वाचन देवयानी गोरे हिने केले.रणजित पाटील म्हणाले, नारायणगडाला अध्यात्माची मोठी परंपरा आहे. गडाच्या मातीत मनोकामना पूर्ण करण्याची ताकद आहे. मला अचानक या कार्यक्रमास उपस्थित राहावे लागले, हे माझे सुदैवच म्हणावे लागेल. नापिकी, दुष्काळ, पाणी-चारा टंचाई हे प्रश्न सध्या गंभीर आहे; मात्र या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यावे लागेल. शेतीच्या जोडीला कौशल्य हवेच, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी शेतीच्या मालाला दाम व तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे असे सांगितले.शाश्वत विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. येत्या तीन वर्षांत उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यात येतील, असेही ते म्हणाले. गडाच्या ५०० एकर जमिनीचे प्रकरण प्रलंबित आहे. ही जमीन गडाच्या मालकीची होण्यासाठी जातीने लक्ष घालण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.तत्पूर्वी, गडाचे विश्वस्त दिलीप गोरे यांनी प्रास्ताविक केले. माजी आ. राजेंद्र जगताप यांनी नारायण भक्तिपीठ तर रायगड शक्तिपीठ असल्याचा उल्लेख केला. जि.प. अध्यक्ष पंडित म्हणाले, गडाच्या विकासासाठी पंडित कुटुंबीय सदैव तत्पर राहील. लक्ष्मण महाराज मेंगडे म्हणाले, गडाने वारकरी संप्रदायाचा प्रसार-प्रचार करण्यात मोठा वाटा उचलला आहे. गडाच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी सरसावले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.खा. पाटील यांनी सांगितले की, एकेकाळी मरगळलेल्या समाजाला नवसंजीवनी देण्याचे काम संत-महंतांनी केले आहे. संतांची भूमिका जीपीआरएससारखी आहे. संत भक्तांना नेहमी योग्य ते मार्गदर्शन करतात. गडाच्या विकासासाठी आतापर्यंत २५ लाख रुपये दिले आहेत. बीड येथे गडाची साडेतीन एकर जागा आहे. या जागेत मुला-मुलींच्या शिक्षणासाठी उभारण्यात येणाऱ्या केंद्राला व गडाच्या इतर विकासासाठी ७५ लाख रुपये असे मिळून खासदार निधीतून १ कोटी देण्याची घोषणा त्यांनी केली.आ. मेटे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमुळे उपस्थित राहू शकले नाही, असे स्पष्ट केले. रणजित पाटील हे नागपूरचे असून, मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठविल्याचे सांगितले. जिल्ह्यात गडाचे प्रस्थ वाढत आहे. सामाजिक समतेचा संदेश नारायणगडावरून दिला जातो. हा गड पक्ष, जात, गट मानत नाही, असे स्पष्ट करून निमंत्रण पत्रिकेत सर्व आजी-माजी आमदार, मंत्री व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले; मात्र काही जण आले नाहीत. गड येणाऱ्यांना आशीर्वाद देतोच; पण न येणाऱ्यांना जास्तच आशीर्वाद देतो, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली.विधानसभा निवडणुकीत बीडच्या प्रचाराचा नारळ नारायणगडावर फोडला होता. त्याला देवेंद्र फडणवीस आले होते. आता ते मुख्यमंत्री झाले आहेत, अशी आठवणही त्यांनी करून दिली. नारायणगडाच्या विकासासाठी ६० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. हा आराखडा एक महिन्यात मंजूर करण्यात येईल. आराखडा मंजूर करूनच गडावर पाऊल ठेवीन, अशी प्रतिज्ञा मेटे यांनी यावेळी केली.गडाचा विकास व हितासाठी बांधील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. बीडमधील साडेतीन एकरात उभारण्यात येणाऱ्या केंद्रातून शेतकऱ्यांची मुले घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाले; मात्र न्यायालयात आता आरक्षण न्यायालयात अडकले आहे. हा प्रश्नही लवकर मार्गी लागेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पुण्यतिथी सोहळा दरवर्षी घेण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.यावेळी महंत शिवाजी महाराज यांचे भाषण झाले. विश्वस्त अ‍ॅड. महादेव तुपे यांनी आभार मानले. यावेळी कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.