शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

...तर मनपा गमावेल जाधववाडीतील २० कोटींचा भूखंड

By admin | Updated: May 21, 2014 01:13 IST

प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील १० एकर जागेवर वाहतूकनगर उभारण्यासाठी १५ वर्षांपूर्वी महानगरपालिकेने करार केला होता.

प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील १० एकर जागेवर वाहतूकनगर उभारण्यासाठी १५ वर्षांपूर्वी महानगरपालिकेने करार केला होता. मात्र, वेळेच्या आत विकास न केल्यामुळे मनपा व कृउबा यांच्यातील करार संपुष्टात आला. वेळ गेल्यानंतर डोळे उघडलेल्या मनपाने बळजबरीने येथे बांधकाम करण्याचा प्रयत्न केला; पण तो बाजार समितीने हाणून पाडला. मुळातच बाजार समितीच्या मार्केट यार्डात शेतीनियमित माल खरेदी-विक्रीशिवाय दुसरा उद्योग करण्यास मनाई आहे. यामुळे वाहतूकनगरला परवानगी देता येत नाही. येथील वाहतूकनगरचे आरक्षण रद्द करावे, याचा प्रस्ताव कृउबाने नगरविकास मंत्रालयाकडे पाठविला आहे. आज वाहतूकनगरसाठीच्या भूखंडाची किंमत २० कोटी रुपये झाली आहे. मंत्रालयाकडून प्रस्ताव रद्द झाल्यास मनपाला या भूखंडावर पाणी सोडावे लागेल. वाहतूकनगर उभारण्यासाठी मनपाला १० एकर जागा देण्याचा ठरावाला २० सप्टेंबर १९९७ रोजी तत्कालीन बाजार समिती संचालकांनी परवानगी दिली होती. १० एकर जागेची किंमत २३ लाख १५ हजार ५८७ रुपये आकारण्यात आली होती. त्यानुसार मनपाने बाजार समितीकडे तेव्हा २० लाख रुपये भरले होते. मनपाकडे उर्वरित रक्कम ३ लाख १५ हजार ५८७ रुपये बाकी होते. महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त व अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणामुळे या वाहतूकनगरच्या जागेकडे दुर्लक्ष झाले. २००७ मध्ये तत्कालीन पणन संचालकांनी वाहतूकनगरचे आरक्षण वगळून बाजार समितीच्या सुधारित मास्टर प्लॅनला परवानगी दिली होती. २००८ पर्यंत मनपाने लक्ष दिलेच नाही. २००८ मध्ये औरंगाबादेत मंत्रिमंडळाची बैठक झाली. तेव्हा बाजार समितीच्या जागेवर शेतीनियमित मालाच्या खरेदी-विक्रीशिवाय दुसरा कोणताच उद्योग सुरू करता येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी वाहतूकनगरचे आरक्षण रद्द करण्याचा सूचना दिल्या. त्यावेळीस महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त, अधिकार्‍यांचे डोळे उघडले आणि घाईघाईत जाधववाडीत वाहतूकनगरच्या बांधकामाला सुरुवात केली. मात्र, परवानगी नसताना बांधकाम केले जात असल्याने तत्कालीन बाजार समितीच्या संचालकांनी हे बांधकाम रोखले होते. ९ एप्रिल २००९ रोजी वाहतूकनगरचे आरक्षण रद्द करावे, असा प्रस्ताव कृउबाने नगरविकास मंत्रालयाकडे पाठविला होता. आज १० एकर जमीन २० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. मंत्रालयही वाहतूकनगरसाठी परवानगी देणार नाही, हे निश्चित आहे. 1.जाधववाडीतील १० एकर जागेवर मनपाने अर्धवट बांधकाम केले आहे. मात्र, कृउबा समितीच्या हद्दीत शेतीनियमित मालाची खरेदी-विक्री केली जाते. तेथे वाहतूकनगर उभारण्यास परवानगीच नाही. 2.कृउबा व मनपात झालेला करारही आता रद्द झाला आहे. परिणामी, १० एकर जागा जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्याच ताब्यात आहे. नगरविकास मंत्रालयाची परवानगी मिळताच आम्ही मनपाने केलेले बांधकाम पाडून टाकू. -एन.ए. अधाने, सचिव, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती1.१९९७ मध्ये १० एकर जागेसाठी झालेल्या करारानुसार मनपाने २० लाख रुपये समितीला दिले. परंतु त्याचा कोणताच दस्तावेज महानगरपालिकेकडे नाही. 2.मुळात कृउबा समितीमध्ये कायद्यानुसार वाहतूकनगर उभारण्यात येऊ शकत नाही. तत्कालीन संचालक मंडळाने चुकीचा निर्णय घेऊन मनपाशी करार केला होता. 3.मात्र, २००९ मध्ये आम्ही वाहतूकनगरचे आरक्षण संचालकांच्या सर्वसाधारण सभेत रद्द केले होते. तरीही महानगरपालिकेने दादागिरी करून जाधववाडीत केलेले अतिक्रमण आम्ही रोखले. हे अतिक्रमण पाडण्याची परवानगी कृउबाला असून, प्रशासकाने त्वरित बांधकाम पाडून टाकावे. हरीश पवार, माजी संचालक, जिल्हा कृउबा समिती