शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अनेक कामे अडकली आचारसंहितेच्या कचाट्यात

By admin | Updated: May 14, 2014 23:58 IST

अंबड: यावर्षी सलग आलेल्या लोकसभा, विधान परिषद व विधानसभा निवडणुकांमुळे काही काळ अपवाद वगळता संपूर्ण वर्षभर आचारसंहितेचा अमंल राहण्याची शक्यता आहे.

 अंबड: यावर्षी सलग आलेल्या लोकसभा, विधान परिषद व विधानसभा निवडणुकांमुळे काही काळ अपवाद वगळता संपूर्ण वर्षभर आचारसंहितेचा अमंल राहण्याची शक्यता आहे. या आदर्श आचारसंहितेचा बदल्यांसाठी इच्छुक अधिकारी, कर्मचारी व कामे मंजूर करुन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या कंत्राटदारांनी चांगलाच धसका घेतल्याचे चित्र अंबड तालुक्यात पाहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता राज्यातील तिसर्‍या टप्प्यातील म्हणजेच २४ एप्रिल रोजीच्या मतदानानंतर काही प्रमाणात शिथिल करण्यात आली. मात्र ही आदर्श आचारसंहिता पूर्णपणे शिथिल होण्यासाठी २४ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील आ.सतीश चव्हाण यांची मुदत १९ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे जुलै महिन्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी पदवीधर मतदार नाव नोंदणीची प्रक्रियासुद्धा सुरु करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करुन निवडणुकीची घोषणा होण्यास एक महिन्याचा म्हणजेच जून महिन्याच्या मध्यापर्यंतचा अवधी लागण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या मध्यापर्यंत पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे. शासकीय नियमानुसार निवडणुकांची घोषणा करताच आदर्श आचारसंहिता लागू होते. मराठवाडा पदवीधर विधान परिषद मतदारसंघामध्ये मराठवाड्यातील सर्व म्हणजेच औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी व नांदेड या आठही जिल्ह्यांचा समावेश होतो. या अनुषंगाने साहजिकच विधान परिषद निवडणुकांसाठी जारी करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता अंबड तालुक्यास लागू होणार आहे. या सर्व शक्यता लक्षात घेत बदल्यांसाठी इच्छुक असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राट मंजूर करुन घेण्यासाठी धडपडणारे कंत्राटदार वर्गाने आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत. मे महिन्याच्या शेवटी आचारसंहिता पूर्णपणे शिथिल होताच आपल्या बदल्या करुन घेण्यासाठी करण्यात येणार्‍या कसरती व कंत्राटे पदरात पाडण्यासाठी करावे लागणारे जोडतोड यासाठी या सर्वांनी आतापासूनच सुरुवात केल्याचे दिसत आहे. यामध्ये किती अधिकारी, कर्मचारी आपल्या इच्छितस्थळी जातात तसेच किती कंत्राटदार इच्छित कंत्राटे आपल्या पदरात पाडून घेण्यात यशस्वी होतात हे आगामी काळात कळेलच. आदर्श आचारसंहितेचा अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी मोठा धसका घेतला आहे, एवढे मात्र खरे. (वार्ताहर) आदर्श आचारसंहितेचा अंमल विधानसभा निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणजेच आॅगस्ट महिन्याच्या शेवटी अथवा सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात येईल. विधानसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता निवडणूक निकालानंतर शिथिल करण्यात येईल. अशाप्रकारे जवळपास सन २०१४ च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत जून महिन्यातील सुरुवातीचे पंधरा दिवस व आॅगस्ट महिना वगळता आदर्श आचारसंहितेचा अंमल राहण्याची शक्यता आहे.