शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अनेक कामे अडकली आचारसंहितेच्या कचाट्यात

By admin | Updated: May 14, 2014 23:58 IST

अंबड: यावर्षी सलग आलेल्या लोकसभा, विधान परिषद व विधानसभा निवडणुकांमुळे काही काळ अपवाद वगळता संपूर्ण वर्षभर आचारसंहितेचा अमंल राहण्याची शक्यता आहे.

 अंबड: यावर्षी सलग आलेल्या लोकसभा, विधान परिषद व विधानसभा निवडणुकांमुळे काही काळ अपवाद वगळता संपूर्ण वर्षभर आचारसंहितेचा अमंल राहण्याची शक्यता आहे. या आदर्श आचारसंहितेचा बदल्यांसाठी इच्छुक अधिकारी, कर्मचारी व कामे मंजूर करुन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या कंत्राटदारांनी चांगलाच धसका घेतल्याचे चित्र अंबड तालुक्यात पाहावयास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता राज्यातील तिसर्‍या टप्प्यातील म्हणजेच २४ एप्रिल रोजीच्या मतदानानंतर काही प्रमाणात शिथिल करण्यात आली. मात्र ही आदर्श आचारसंहिता पूर्णपणे शिथिल होण्यासाठी २४ मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील आ.सतीश चव्हाण यांची मुदत १९ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे जुलै महिन्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी पदवीधर मतदार नाव नोंदणीची प्रक्रियासुद्धा सुरु करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करुन निवडणुकीची घोषणा होण्यास एक महिन्याचा म्हणजेच जून महिन्याच्या मध्यापर्यंतचा अवधी लागण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या मध्यापर्यंत पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठीच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे. शासकीय नियमानुसार निवडणुकांची घोषणा करताच आदर्श आचारसंहिता लागू होते. मराठवाडा पदवीधर विधान परिषद मतदारसंघामध्ये मराठवाड्यातील सर्व म्हणजेच औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी व नांदेड या आठही जिल्ह्यांचा समावेश होतो. या अनुषंगाने साहजिकच विधान परिषद निवडणुकांसाठी जारी करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता अंबड तालुक्यास लागू होणार आहे. या सर्व शक्यता लक्षात घेत बदल्यांसाठी इच्छुक असलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राट मंजूर करुन घेण्यासाठी धडपडणारे कंत्राटदार वर्गाने आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत. मे महिन्याच्या शेवटी आचारसंहिता पूर्णपणे शिथिल होताच आपल्या बदल्या करुन घेण्यासाठी करण्यात येणार्‍या कसरती व कंत्राटे पदरात पाडण्यासाठी करावे लागणारे जोडतोड यासाठी या सर्वांनी आतापासूनच सुरुवात केल्याचे दिसत आहे. यामध्ये किती अधिकारी, कर्मचारी आपल्या इच्छितस्थळी जातात तसेच किती कंत्राटदार इच्छित कंत्राटे आपल्या पदरात पाडून घेण्यात यशस्वी होतात हे आगामी काळात कळेलच. आदर्श आचारसंहितेचा अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांनी मोठा धसका घेतला आहे, एवढे मात्र खरे. (वार्ताहर) आदर्श आचारसंहितेचा अंमल विधानसभा निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणजेच आॅगस्ट महिन्याच्या शेवटी अथवा सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात येईल. विधानसभा निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेली आदर्श आचारसंहिता निवडणूक निकालानंतर शिथिल करण्यात येईल. अशाप्रकारे जवळपास सन २०१४ च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत जून महिन्यातील सुरुवातीचे पंधरा दिवस व आॅगस्ट महिना वगळता आदर्श आचारसंहितेचा अंमल राहण्याची शक्यता आहे.