शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

औरंगाबाद परिसरातही अनेक ‘किलर स्पॉट’

By admin | Updated: June 5, 2014 01:08 IST

संतोष हिरेमठ, औरंगाबाद केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना सरकारने जीवघेण्या ठिकाणांना (किलर स्पॉट) निश्चित केले पाहिजे.

संतोष हिरेमठ, औरंगाबाद केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना सरकारने जीवघेण्या ठिकाणांना (किलर स्पॉट) निश्चित केले पाहिजे. त्या दृष्टीने नकाशा तयार करावा, तातडीने रस्त्यांवरील किलर स्पॉट हटविण्याची मागणी इंटरनॅशनल रोड फेडरेशनने केंद्र सरकारकडे केली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांचा बळी घेणार्‍या औरंगाबाद शहरातील विविध किलर स्पॉटचा घेतलेला हा आढावा. गेल्या काही वर्षांत शहर परिसरातील बीड बायपास, पैठण रोड, नगर नाका ते दौलताबाद टी-पॉइंट, वाळूज रोड, हर्सूल रोड भागात उंच इमारती आणि मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले. या भागांतील रहिवासी आणि शहराबाहेरून ये-जा करणारर्‍या अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते. रस्त्याला लागून विस्तारलेला परिसर, वाहनांची वाढलेली संख्या आणि अरुंद रस्ते, वळणाचे मार्ग, छोटे चौक, अशा अनेक कारणांनी या मार्गांवर किलर स्पॉट तयार झाले आहेत. अशा किलर स्पॉटमुळे या मार्गांवर सुरक्षित वाहतुकीचा वारंवार प्रश्न समोर येत आहे. दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जातात; परंतु या किलर स्पॉटच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे कोणााचे लक्ष जात नसल्याचे चित्र येते. नोकरी, कामानिमित्त अशा या किलर स्पॉटवरून ये-जा करणारे वाहनचालक आता स्वत: पुरेसी सावधगिरी बाळगण्यावर भर देत आहेत. बीड बायपासवरील दोन्ही बाजूंनी ये-जा करणारे वाहनचालक अनेकदा दुभाजकांत असलेल्या जागेतून वळण घेतात. त्यामुळे मागील वाहनचालकास वाहन नियंत्रणात ठेवणे अवघड होते. दर महिन्याला एक अपघात असे या रस्त्याचे वैशिष्ट््य ठरत आहे.