शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

औरंगाबाद शहरात अपघातांचे अनेक ‘ब्लॅक स्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:19 IST

सतत घडणा-या प्राणांतिक अपघातांमुळे विविध रस्ते आणि चौकांना पोलिसांनी काळ्या यादीत टाकले आहे. या दहा ब्लॅक स्पॉटस्चे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने नुकतेच सर्वेक्षण केले.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सतत घडणा-या प्राणांतिक अपघातांमुळे विविध रस्ते आणि चौकांना पोलिसांनी काळ्या यादीत टाकले आहे. या दहा ब्लॅक स्पॉटस्चे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने नुकतेच सर्वेक्षण केले. अपघात रोखण्यासाठी या ब्लॅक स्पॉटस्वर करावयाच्या उपाययोजनांच्या शिफारशींसह अहवाल वाहतूक आयुक्तांना पाठविला.दरवर्षी शहरात पाचशेहून अधिक अपघात घडतात. या अपघातांत अनेकांना प्राण गमवावा लागतो आणि शेकडो जखमींना कित्येक दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. यात उपचारांवर लाखो रुपये खर्च होतो आणि काहींना कायमस्वरूपी अपंगत्वही येते. अपघातामुळे होणारे नुकसान कधीही भरून निघत नाही. यामुळे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांसह आरटीओ, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जागतिक बँक प्रकल्प अधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांची संयुक्त समिती आहे. सतत होणारे अपघात रोखण्यासाठी या समितीने पंधरा दिवसांपूर्वी आयुक्तालय हद्दीतील अपघातामुळे पोलिसांच्या यादीत ब्लॅक स्पॉटस् ठरलेल्या १० ठिकाणांचे सर्वेक्षण केले. सिडको वाहतूक शाखेच्या हद्दीअंतर्गत सर्वाधिक सहा ब्लॅक स्पॉटस् असल्याचे समोर आले. यात हर्सूल टी-पॉइंट, केम्ब्रिज शाळा चौक, एअरपोर्ट टी-पॉइंट, रामनगर चौक, मुकुंदवाडी चौक, देवळाई चौक यांचा समावेश आहे, तर शहर वाहतूक विभागांतर्गत बीड बायपास रस्त्यावर तीन ब्लॅक स्पॉटस् आहेत. बीड बायपासवर एमआयटी हॉस्पिटल चौक, रेणुकामाता मंदिर कमानीजवळ, मास्टर कुक हॉटेलजवळ तसेच संग्रामनगर रेल्वे ओव्हर ब्रीजवरून खाली आलेला रस्ता आणि गोदावरी टी-पॉइंट यांचा यात समावेश आहे, तर छावणी विभागांतर्गत दौलताबाद रोडवरील अश्फाक ढाब्याजवळ सतत अपघात घडत असल्याने त्या ठिकाणाला ब्लॅक स्पॉट म्हणून पोलिसांनी घोषित केले.