शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
2
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
3
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
4
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
5
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
6
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
7
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
8
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
9
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
10
12000 वर्षांनी Hayli Gubbi ज्वालामुखी खवळला; सॅटलाईटने टिपली उद्रेक होतानाची भयावह दृश्ये
11
शेअर बाजारात इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार, दिग्गजानं केली भविष्यवाणी; म्हटलं, "गुंतवणूकदारांना आपली संपत्ती..."
12
मालेगावनंतर बीड हादरले! साडेपाच वर्षांच्या मुलीवर नात्यातील मुलाचा अत्याचार, ४ दिवस वेदनेत
13
उबर कंपनीत परप्रांतीय आणि स्थानिक चालकांमध्ये भेदभाव? ड्रायव्हर्सचे कार्यालयाबाहेर आंदोलन
14
आजचा दिवस संकल्पपूर्तीचा; शांती पसरवणारा, समृद्धी देणारा भारत स्थापन करूया- मोहन भागवत
15
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
16
सासूने थिनर आणले अन् पतीने पेटवून दिले; चार्जशीटमध्ये झाला निक्की भाटी हत्या प्रकरणाचा मोठा खुलासा
17
IND vs SA 2nd Test : दुसरे सत्रही दक्षिण आफ्रिकेच्या नावे; ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली, तरी...
18
"तिजोरी तुमच्याकडे असली तरी ‘तिजोरी’चा मालक आमच्याकडे"; चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना टोला
19
"सोहम माझा मित्र...", मंजिरीच्या खऱ्या आयुष्यातील होणाऱ्या नवऱ्याला 'राया'ने दिला सल्ला
20
पतीची हत्या करून मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकणारी मुस्कान झाली आई; पण बाळ कुणाचं? साहिलनेही विचारला प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

कचरा प्रश्न सोडविण्यात मनपा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:43 IST

घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले असून, त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी मनपाला खडसावले. लोकांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडविण्याची लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. कच-याचा प्रश्न सोडविताना पोलीस बळाचा वापर करू नये, अशी सक्त ताकीदही खंडपीठाने दिली असून, तसे झाल्यास खंडपीठ याची गंभीर दखल घेईल, असे स्पष्ट केले. दरम्यान या जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचे ताशेरे : बळाचा वापर करण्यास मनाई; सोमवारी पुढील सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले असून, त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी मनपाला खडसावले. लोकांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडविण्याची लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. कच-याचा प्रश्न सोडविताना पोलीस बळाचा वापर करू नये, अशी सक्त ताकीदही खंडपीठाने दिली असून, तसे झाल्यास खंडपीठ याची गंभीर दखल घेईल, असे स्पष्ट केले. दरम्यान या जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.कचºयाची विल्हेवाट लावण्यासंदर्भातील जनहित याचिकेवर बुधवारी खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि मनपा आयुक्त डॉ. दीपक मुगळीकर, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली घाडगे उपस्थित होते. त्यांच्या वतीने खंडपीठाला अहवाल देण्यात आला. कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरालगत असलेल्या तीसगाव, करोडी, पडेगाव आणि आडगाव या चार ठिकाणची पाहणी करण्यात आली. तिन्ही गावांतील स्थानिक नागरिकांचा कचरा डेपोला विरोध आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.कचरा डेपोसंदर्भात काय करता येईल, अशी विचारणा खंडपीठाने केल्यामुळे सरकार, मनपाच्या वकिलांनी वेळ मागून घेतला. त्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी आपसात चर्चा करून नारेगावातच कचरा टाकू द्या, तीन महिन्यांतच येथे प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. या सर्व प्रक्रियेस मान्यता मिळाली का? असा सवाल खंडपीठाने केल्यावर मनपाच्या वतीने डीपीआर तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. शहरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून ती केव्हाही हाताबाहेर जाऊ शकते. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करा, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.कचरा उचलण्यास मनपा प्रशासन उदासीन दिसत आहे. त्यामुळे जबाबदार अधिका-यांनी शपथपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे म्हणताच मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी राज्य सरकारच्या वतीने मुख्य सचिव शपथपत्र दाखल करणार आहेत, असे सांगितले.