शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

कचरा प्रश्न सोडविण्यात मनपा अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:43 IST

घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले असून, त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी मनपाला खडसावले. लोकांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडविण्याची लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. कच-याचा प्रश्न सोडविताना पोलीस बळाचा वापर करू नये, अशी सक्त ताकीदही खंडपीठाने दिली असून, तसे झाल्यास खंडपीठ याची गंभीर दखल घेईल, असे स्पष्ट केले. दरम्यान या जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचे ताशेरे : बळाचा वापर करण्यास मनाई; सोमवारी पुढील सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले असून, त्यांनी जनतेचा विश्वास गमावला आहे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी मनपाला खडसावले. लोकांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडविण्याची लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, असेही खंडपीठाने म्हटले आहे. कच-याचा प्रश्न सोडविताना पोलीस बळाचा वापर करू नये, अशी सक्त ताकीदही खंडपीठाने दिली असून, तसे झाल्यास खंडपीठ याची गंभीर दखल घेईल, असे स्पष्ट केले. दरम्यान या जनहित याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.कचºयाची विल्हेवाट लावण्यासंदर्भातील जनहित याचिकेवर बुधवारी खंडपीठात सुनावणी झाली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि मनपा आयुक्त डॉ. दीपक मुगळीकर, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली घाडगे उपस्थित होते. त्यांच्या वतीने खंडपीठाला अहवाल देण्यात आला. कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी शहरालगत असलेल्या तीसगाव, करोडी, पडेगाव आणि आडगाव या चार ठिकाणची पाहणी करण्यात आली. तिन्ही गावांतील स्थानिक नागरिकांचा कचरा डेपोला विरोध आहे, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.कचरा डेपोसंदर्भात काय करता येईल, अशी विचारणा खंडपीठाने केल्यामुळे सरकार, मनपाच्या वकिलांनी वेळ मागून घेतला. त्यानंतर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी आपसात चर्चा करून नारेगावातच कचरा टाकू द्या, तीन महिन्यांतच येथे प्रकल्प पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले. या सर्व प्रक्रियेस मान्यता मिळाली का? असा सवाल खंडपीठाने केल्यावर मनपाच्या वतीने डीपीआर तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. शहरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून ती केव्हाही हाताबाहेर जाऊ शकते. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करा, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.कचरा उचलण्यास मनपा प्रशासन उदासीन दिसत आहे. त्यामुळे जबाबदार अधिका-यांनी शपथपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे म्हणताच मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी राज्य सरकारच्या वतीने मुख्य सचिव शपथपत्र दाखल करणार आहेत, असे सांगितले.