शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

१२ पथकांची निगराणी

By admin | Updated: May 8, 2016 23:51 IST

राजेश खराडे , बीड खरीप हंगामाला अजून अवधी असला तरी प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी झाली आहे. हंगामपूर्व बैठकीनंतर खत, बियाणांची आवश्यकता समोर आली आहे.

राजेश खराडे , बीडखरीप हंगामाला अजून अवधी असला तरी प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी झाली आहे. हंगामपूर्व बैठकीनंतर खत, बियाणांची आवश्यकता समोर आली आहे. त्या प्रमाणात मागणीही करून खत, बियाणांचा पुरवठा होण्यास सुरवात झाली आहे. खरेदी-विक्रीत अनियमितता होऊ नये म्हणून जिल्ह्यात १२ पथके नेमण्यात आली आहेत. खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र लक्षात घेता १ लाख ४६ हजार मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे, पैकी ४६ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. बियाणांच्या ७० हजार क्विंटलच्या मागणीनुसार कृषी विभागाकडे सोयाबीनचे १५ हजार क्विंटल खत उपलब्ध झाले आहे. गतवर्षी हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांकडून मानवनिर्मित टंचाई दर्शविण्यात आली होती.यंदा अगोदरच शेतकरी दुष्काळात होरपळलेला आहे अशातच खते, बियाणांच्या पुरवठ्यात अनियमितता होऊ नये म्हणून जिल्हा पथकासह तालुकानिहाय एक पथक नेमण्यात आले आहे. पथकाकडून बियाणांची खरेदी, पावती, विक्रीच्या रजिस्टरला नोंदी, दुकानासमोर दरफलक, तसेच उपलब्ध खत, बियाणांचा साठा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात लहान-मोठे २०० पेक्षा अधिक खत, बियाणे विक्रेते आहेत. गतवर्षी विक्रीमध्ये गैरप्रकार आढळून आल्याने अंबाजोगाई येथील विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर तिघा जणांचा परवाना जप्त करून आठ जणांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पथकाने केली होती. पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण बियाणांची विक्री झाली नव्हती, त्यामुळे गतवर्षीचे बियाणे व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहे. त्याचीच विक्री यंदाही होऊ नये याचे मोठे आव्हान पथकासमोर राहणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याकडे त्या तालुक्याची जबाबदारी असून, यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय पथक नेमण्यात आले आहे. सद्य:स्थितीला खत, बियाणे विक्रीला सुरुवात झाली नसली तरी ४६ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून, सोयाबीनचे १५ हजार, उडदाचे एक हजार क्विंटल, तर कापसाच्या २ लाख ५० पाकिटांचा साठा कृषी विभागाकडे आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोन्हीही मुख्य हंगामातील पिकांचे पावसाअभावी मोठे नुकसान होत आहे. यंदा पर्जन्यमान चांगले राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी खरिपाबाबत जिल्हा कृषी विभाग तत्पर झाला आहे. बळीराजाही मशागतीच्या कामाला लागला आहे.प्रशासन दरबारी २०० खत, बियाणे विक्रेत्यांची नोंद असली तरी आता ग्रामीण भागातही अनाधिकृतपणे विके्रत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याचे मोठे आव्हान आहे. ४तालुक्याचे पथकप्रमुख तालुका कृषी अधिकारी राहणार असून, ३५ अधिकाऱ्यांद्वारे खत, बी-बियाणांच्या विक्रीमध्ये होणारी अनियमितता आटोक्यात आणली जाणार आहे.\तक्रार समोर येताच दुकानाची तपासणी करण्यात येणार आहे. विक्रेत्यांनी सर्व बाबींचे रेकॉर्ड बाळगणे अनिवार्य राहणार आहे. ज्यांना विक्रीचे परवाने दिले आहेत, त्यांच्याकडून खत, बियाणांचा विक्री होणे गरजेचे आहे.- डी. बी. बिटके, पथक प्रमुख सर्वाधिक बियाणे सोयाबीनचेजिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत असले तरी यामधून शेतकऱ्याचे अधिकचे नुकसानच झाले आहे. त्यामुळे यंदा कापसावर भर न देता सोयाबीनच्या लागवडीविषयी कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचाही ओढा सोयाबीन व कडधान्यावरच आहे. त्यामुळे ७० हजार क्विंटलच्या बियाणे मागणीमध्ये सोयाबीन ५० हजार क्विंटल आहे. त्यापैकी १५ हजार क्विंटलचा पुरवठा झाला असून, शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे उपलब्ध आहे.