शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

१२ पथकांची निगराणी

By admin | Updated: May 8, 2016 23:51 IST

राजेश खराडे , बीड खरीप हंगामाला अजून अवधी असला तरी प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी झाली आहे. हंगामपूर्व बैठकीनंतर खत, बियाणांची आवश्यकता समोर आली आहे.

राजेश खराडे , बीडखरीप हंगामाला अजून अवधी असला तरी प्रशासकीय स्तरावर पूर्वतयारी झाली आहे. हंगामपूर्व बैठकीनंतर खत, बियाणांची आवश्यकता समोर आली आहे. त्या प्रमाणात मागणीही करून खत, बियाणांचा पुरवठा होण्यास सुरवात झाली आहे. खरेदी-विक्रीत अनियमितता होऊ नये म्हणून जिल्ह्यात १२ पथके नेमण्यात आली आहेत. खरिपाचे प्रस्तावित क्षेत्र लक्षात घेता १ लाख ४६ हजार मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली आहे, पैकी ४६ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. बियाणांच्या ७० हजार क्विंटलच्या मागणीनुसार कृषी विभागाकडे सोयाबीनचे १५ हजार क्विंटल खत उपलब्ध झाले आहे. गतवर्षी हंगामाच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांकडून मानवनिर्मित टंचाई दर्शविण्यात आली होती.यंदा अगोदरच शेतकरी दुष्काळात होरपळलेला आहे अशातच खते, बियाणांच्या पुरवठ्यात अनियमितता होऊ नये म्हणून जिल्हा पथकासह तालुकानिहाय एक पथक नेमण्यात आले आहे. पथकाकडून बियाणांची खरेदी, पावती, विक्रीच्या रजिस्टरला नोंदी, दुकानासमोर दरफलक, तसेच उपलब्ध खत, बियाणांचा साठा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात लहान-मोठे २०० पेक्षा अधिक खत, बियाणे विक्रेते आहेत. गतवर्षी विक्रीमध्ये गैरप्रकार आढळून आल्याने अंबाजोगाई येथील विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर तिघा जणांचा परवाना जप्त करून आठ जणांवर निलंबनाची कारवाई जिल्हा पथकाने केली होती. पावसाने ओढ दिल्याने संपूर्ण बियाणांची विक्री झाली नव्हती, त्यामुळे गतवर्षीचे बियाणे व्यापाऱ्यांकडे शिल्लक आहे. त्याचीच विक्री यंदाही होऊ नये याचे मोठे आव्हान पथकासमोर राहणार आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याकडे त्या तालुक्याची जबाबदारी असून, यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय पथक नेमण्यात आले आहे. सद्य:स्थितीला खत, बियाणे विक्रीला सुरुवात झाली नसली तरी ४६ हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून, सोयाबीनचे १५ हजार, उडदाचे एक हजार क्विंटल, तर कापसाच्या २ लाख ५० पाकिटांचा साठा कृषी विभागाकडे आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोन्हीही मुख्य हंगामातील पिकांचे पावसाअभावी मोठे नुकसान होत आहे. यंदा पर्जन्यमान चांगले राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी खरिपाबाबत जिल्हा कृषी विभाग तत्पर झाला आहे. बळीराजाही मशागतीच्या कामाला लागला आहे.प्रशासन दरबारी २०० खत, बियाणे विक्रेत्यांची नोंद असली तरी आता ग्रामीण भागातही अनाधिकृतपणे विके्रत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बोगस विक्रीतून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याचे मोठे आव्हान आहे. ४तालुक्याचे पथकप्रमुख तालुका कृषी अधिकारी राहणार असून, ३५ अधिकाऱ्यांद्वारे खत, बी-बियाणांच्या विक्रीमध्ये होणारी अनियमितता आटोक्यात आणली जाणार आहे.\तक्रार समोर येताच दुकानाची तपासणी करण्यात येणार आहे. विक्रेत्यांनी सर्व बाबींचे रेकॉर्ड बाळगणे अनिवार्य राहणार आहे. ज्यांना विक्रीचे परवाने दिले आहेत, त्यांच्याकडून खत, बियाणांचा विक्री होणे गरजेचे आहे.- डी. बी. बिटके, पथक प्रमुख सर्वाधिक बियाणे सोयाबीनचेजिल्ह्यात कापसाचे क्षेत्र वाढत असले तरी यामधून शेतकऱ्याचे अधिकचे नुकसानच झाले आहे. त्यामुळे यंदा कापसावर भर न देता सोयाबीनच्या लागवडीविषयी कृषी विभागाकडून जनजागृती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचाही ओढा सोयाबीन व कडधान्यावरच आहे. त्यामुळे ७० हजार क्विंटलच्या बियाणे मागणीमध्ये सोयाबीन ५० हजार क्विंटल आहे. त्यापैकी १५ हजार क्विंटलचा पुरवठा झाला असून, शेतकऱ्यांकडे घरचे बियाणे उपलब्ध आहे.