शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

मूल्य, तत्त्वाशिवाय मनुष्य पशुसमान -धनश्री तळवलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:55 IST

मनुष्य जीवनात ‘मूल्य’,‘ तत्त्व’ असते हेच माणूस विसरला आहे. ‘तत्त्वा’शिवाय मनुष्य जीवन पशुसमान आहे. ज्या दिवशी माणसाला माणसातील ‘मूल्य’ लक्षात येईल त्या दिवशी जाती, धर्म, पंथाच्या भिंती निघून जातील, असे मौलिक विचार स्वाध्याय परिवाराच्या अध्वर्यू धनश्री तळवलकर (दीदी) यांनी उपस्थित हजारो नागरिकांच्या मनात रुजविले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मनुष्य जीवनात ‘मूल्य’,‘ तत्त्व’ असते हेच माणूस विसरला आहे. ‘तत्त्वा’शिवाय मनुष्य जीवन पशुसमान आहे. ज्या दिवशी माणसाला माणसातील ‘मूल्य’ लक्षात येईल त्या दिवशी जाती, धर्म, पंथाच्या भिंती निघून जातील, असे मौलिक विचार स्वाध्याय परिवाराच्या अध्वर्यू धनश्री तळवलकर (दीदी) यांनी उपस्थित हजारो नागरिकांच्या मनात रुजविले.श्रीमद् भगवतगीता जयंतीनिमित्त स्वाध्याय परिवाराच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने दीदी रविवारी सर्व स्वाध्यायी परिवाराच्या भेटीला औरंगाबादेत आल्या होत्या. दीदींचे दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला होता.मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान खचाखच भरले होते. शिवाय बाहेरील रस्त्यावर हजारो लोक बसले होते. त्यांच्यासाठी दोन ठिकाणी एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती. एवढा जनसमुदाय असतानाही वातावरण एकदम शांत होते. प्रत्येक जण शिस्तीचे पालन करीत होता. या सोहळ्यातून स्वाध्याय परिवाराने सर्वांना शांती, शिस्तीचे दर्शन घडविले.दीदींचे सायंकाळी व्यासपीठावर आगमन होताच दीदींनी सर्वांना नमस्कार केला तेव्हा जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला. यानंतर स्वाध्याय केंद्रात जाणाºया या मराठवाडा व विदर्भातील हजारो युवक-युवतींनी ‘यह धरती अंबर सब सुंदर है’ या भावगीतावर नृत्यवंदना केली. गीत संपल्यावर ‘कृष्णम वंदे जगतगुरू’, ‘ हमारी शक्ती कृष्ण की भक्ती’ असा जयघोष करण्यात आला. याचाच धागा पकडून दीदींनी आपल्या प्रवचनाला सुरुवात केली. नुसत्या घरात किंवा गल्लीत जयघोष करून ‘कृष्ण जगत गुरू होणार का’ असा प्रश्न दीदींनी उपस्थित युवक-युवतींना विचारला. आपण जयघोष केला नाही तरी कृष्ण हे जगतगुरू आहेत व राहणारच. आयुष्याची सुरुवात भगवतगीता वाचून केली पाहिजे. पण ज्यांनी डोळे बंद केले त्यांना गीतेतील ज्ञान कसे मिळेल. यासाठी सर्वप्रथम मनुष्यातील माणसाला जागे केले पाहिजे. नुसती इमारत, पूल बांधून विकास होत नसतो. घरटे तर पक्षीही बांधतात.तेही इमारतीपेक्षा मजबूत असते. मग पशु-पक्ष्यांपेक्षा आपण वेगळे काय करतो. माणसाच्या जीवनात‘मूल्य’, ‘तत्त्व’ नसेल तर तो पशुसमानच आहे. ज्या दिवशी मनुष्याला हे कळेल त्या दिवशी सर्व भेदभाव विसरून ‘तेजोमय’ जीवन जगेल, असा आत्मविश्वासदीदींनी प्रत्येक मनामनात निर्माण केला.तत्पूर्वी मराठवाडा व विदर्भातील १६ युवक-युवतींनी ‘गीता-तेज का दर्शन, जीवनमूल्य संवर्धन’या विषयावर आपले विचारमांडले. आपले विचारप्रभावीपणे मांडण्यासाठी स्पर्धकांनी ‘मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी’ भाषेचा वापर केला. त्यासही उपस्थितांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.भगवतगीता, शाल, नारळ झाले ‘मॅचिंग’धनश्री तळवलकर (दीदी) यांनी सांगितले की, श्रीमद् भगवतगीतेचे महत्त्व फक्त सेवानिवृत्तीच्या दिवशी सप्रेम भेट म्हणून देण्यापुरतेच उरले आहे. भगवतगीता, शाल व नारळ जणू काही ‘मॅचिंग’ झाले आहे. गीता हे तत्त्वज्ञान आहे, असे मानून घराच्या एखाद्या कोनाड्यात ती ठेवली जाते.मात्र, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली ही गीता अत्यंत साधी-सोपी आहे. ती एवढी सोपी आहे की, एखाद्या आईने मुलाची घातलेली समजूत आहे, असे सांगत दीदींनी प्रत्येकाला भगवतगीता समजून त्याचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब करण्याचे आवाहन केले.