शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मूल्य, तत्त्वाशिवाय मनुष्य पशुसमान -धनश्री तळवलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:55 IST

मनुष्य जीवनात ‘मूल्य’,‘ तत्त्व’ असते हेच माणूस विसरला आहे. ‘तत्त्वा’शिवाय मनुष्य जीवन पशुसमान आहे. ज्या दिवशी माणसाला माणसातील ‘मूल्य’ लक्षात येईल त्या दिवशी जाती, धर्म, पंथाच्या भिंती निघून जातील, असे मौलिक विचार स्वाध्याय परिवाराच्या अध्वर्यू धनश्री तळवलकर (दीदी) यांनी उपस्थित हजारो नागरिकांच्या मनात रुजविले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मनुष्य जीवनात ‘मूल्य’,‘ तत्त्व’ असते हेच माणूस विसरला आहे. ‘तत्त्वा’शिवाय मनुष्य जीवन पशुसमान आहे. ज्या दिवशी माणसाला माणसातील ‘मूल्य’ लक्षात येईल त्या दिवशी जाती, धर्म, पंथाच्या भिंती निघून जातील, असे मौलिक विचार स्वाध्याय परिवाराच्या अध्वर्यू धनश्री तळवलकर (दीदी) यांनी उपस्थित हजारो नागरिकांच्या मनात रुजविले.श्रीमद् भगवतगीता जयंतीनिमित्त स्वाध्याय परिवाराच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने दीदी रविवारी सर्व स्वाध्यायी परिवाराच्या भेटीला औरंगाबादेत आल्या होत्या. दीदींचे दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळला होता.मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान खचाखच भरले होते. शिवाय बाहेरील रस्त्यावर हजारो लोक बसले होते. त्यांच्यासाठी दोन ठिकाणी एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात आली होती. एवढा जनसमुदाय असतानाही वातावरण एकदम शांत होते. प्रत्येक जण शिस्तीचे पालन करीत होता. या सोहळ्यातून स्वाध्याय परिवाराने सर्वांना शांती, शिस्तीचे दर्शन घडविले.दीदींचे सायंकाळी व्यासपीठावर आगमन होताच दीदींनी सर्वांना नमस्कार केला तेव्हा जनसमुदायाने टाळ्यांचा कडकडाट केला. यानंतर स्वाध्याय केंद्रात जाणाºया या मराठवाडा व विदर्भातील हजारो युवक-युवतींनी ‘यह धरती अंबर सब सुंदर है’ या भावगीतावर नृत्यवंदना केली. गीत संपल्यावर ‘कृष्णम वंदे जगतगुरू’, ‘ हमारी शक्ती कृष्ण की भक्ती’ असा जयघोष करण्यात आला. याचाच धागा पकडून दीदींनी आपल्या प्रवचनाला सुरुवात केली. नुसत्या घरात किंवा गल्लीत जयघोष करून ‘कृष्ण जगत गुरू होणार का’ असा प्रश्न दीदींनी उपस्थित युवक-युवतींना विचारला. आपण जयघोष केला नाही तरी कृष्ण हे जगतगुरू आहेत व राहणारच. आयुष्याची सुरुवात भगवतगीता वाचून केली पाहिजे. पण ज्यांनी डोळे बंद केले त्यांना गीतेतील ज्ञान कसे मिळेल. यासाठी सर्वप्रथम मनुष्यातील माणसाला जागे केले पाहिजे. नुसती इमारत, पूल बांधून विकास होत नसतो. घरटे तर पक्षीही बांधतात.तेही इमारतीपेक्षा मजबूत असते. मग पशु-पक्ष्यांपेक्षा आपण वेगळे काय करतो. माणसाच्या जीवनात‘मूल्य’, ‘तत्त्व’ नसेल तर तो पशुसमानच आहे. ज्या दिवशी मनुष्याला हे कळेल त्या दिवशी सर्व भेदभाव विसरून ‘तेजोमय’ जीवन जगेल, असा आत्मविश्वासदीदींनी प्रत्येक मनामनात निर्माण केला.तत्पूर्वी मराठवाडा व विदर्भातील १६ युवक-युवतींनी ‘गीता-तेज का दर्शन, जीवनमूल्य संवर्धन’या विषयावर आपले विचारमांडले. आपले विचारप्रभावीपणे मांडण्यासाठी स्पर्धकांनी ‘मराठी, हिंदी, संस्कृत व इंग्रजी’ भाषेचा वापर केला. त्यासही उपस्थितांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.भगवतगीता, शाल, नारळ झाले ‘मॅचिंग’धनश्री तळवलकर (दीदी) यांनी सांगितले की, श्रीमद् भगवतगीतेचे महत्त्व फक्त सेवानिवृत्तीच्या दिवशी सप्रेम भेट म्हणून देण्यापुरतेच उरले आहे. भगवतगीता, शाल व नारळ जणू काही ‘मॅचिंग’ झाले आहे. गीता हे तत्त्वज्ञान आहे, असे मानून घराच्या एखाद्या कोनाड्यात ती ठेवली जाते.मात्र, श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली ही गीता अत्यंत साधी-सोपी आहे. ती एवढी सोपी आहे की, एखाद्या आईने मुलाची घातलेली समजूत आहे, असे सांगत दीदींनी प्रत्येकाला भगवतगीता समजून त्याचा प्रत्यक्ष जीवनात अवलंब करण्याचे आवाहन केले.