शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

मल्लांची शिष्यवृत्ती रखडली

By admin | Updated: March 6, 2017 00:48 IST

लातूर : जीवाचे रान करीत मेहनत करणाऱ्या मल्लांनी राज्याचे नावलौकिक करावे, अशी अपेक्षा ठेवून शासनाने त्यांना क्रीडा धोरणात शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले.

लातूर : जीवाचे रान करीत मेहनत करणाऱ्या मल्लांनी राज्याचे नावलौकिक करावे, अशी अपेक्षा ठेवून शासनाने त्यांना क्रीडा धोरणात शिष्यवृत्ती देण्याचे ठरविले. मात्र लातूर ुजिल्ह्यातील ५४ मल्लांची शिष्यवृत्ती क्रीडा विभागाच्या उदासीनतेमुळे रखडली आहे. २०१३-१४ मधील २५, २०१४-१५ मधील १६ आणि २०१५-१६ मधील १३ मल्लांची शिष्यवृत्ती रखडली आहे. क्रीडा कार्यालयात खेटे मारून मल्लांची निराशा होत आहे.२०१३-१४ मधील २५ मल्लांची ५० ते ६० हजार, २०१४-१५ मधील १६ मल्लांची ३५ हजार आणि २०१५-१६ मधील १३ मल्लांची २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती रखडली आहे. मल्लांकडून संबंधित कार्यालयाकडे वारंवार शिष्यवृत्तीसाठी मागणी होत आहे. मात्र शासनाकडून शिष्यवृत्ती अद्याप आली नसल्याचे कारण त्यांना सांगितले जात आहे.राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या खेळाडूंना राज्य शासनाकडून त्यांच्या पदकांनुसार अनुक्रमे शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. लातूर जिल्ह्याचा इतिहास पाहता राज्य व देशभरात लातूरच्या मल्लांनी कुस्तीमध्ये छाप सोडली आहे. लातूरच्या अनेक मल्लांनी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. मात्र शासनामार्फत मिळणारी शिष्यवृत्ती त्यांना वेळेवर मिळत नाही. लातूर व पुण्याच्या कार्यालयात अनेकवेळा खेटे मारूनही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. लातूरचे क्रीडा कार्यालयही याबाबत गांभीर्याने पाहत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीही अशीच अवस्था झाल्याने ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर खेळाडूंना मानधन देण्यात आले. आता आणखी तोच प्रश्न कुस्तीगीरांसमोर निर्माण झाला आहे. यासह वयोवृद्ध खेळाडूंचेही मानधन रखडले होते. मात्र काही दिवसांपूर्वी ते देण्यात आले. परंतु, कुस्तीपटूंचे मानधन अद्यापि दिले नसल्याने कुस्तीगीरांतून नाराजीचा सूर उमटत आहे. वर्षभर सकाळ-सायंकाळ मेहनत करून मल्ल आपल्या कौशल्याची ताकद वाढवितात. त्यामुळेच त्यांंना स्पर्धेत यश मिळते. मात्र प्रशासनाकडून त्यांची वेळेत दखल घेतली जात नाही. लातूरच्या क्रीडा कार्यालयात अनेक कुस्तीपटूंनी खेटे मारले. त्यांना बँकेचा खाते क्रमांक चुकल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मल्लांकडून दुरुस्ती करूनही ते वेळेत मिळाले नाही. चौकशी करूनही त्यांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे इकडून-तिकडे चकरा मारूनही मल्लांच्या पदरी निराशाच आहे. (प्रतिनिधी)