शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

सांडपाण्यातील डासांमुळे वाढतो मलेरियाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 23:48 IST

परभणी : मोकळ्या जागेत साचलेल्या घाण पाण्यात डासांचा प्रादुर्भाव होऊन या डासांच्या चावण्यामुळे मलेरिया होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो.

परभणी : मोकळ्या जागेत साचलेल्या घाण पाण्यात डासांचा प्रादुर्भाव होऊन या डासांच्या चावण्यामुळे मलेरिया होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. याकरीता आठवड्यातून एकदा घरातील सर्व भांडी साफ करुन नागरिकांनी कोरडा दिवस पाळल्यास डासांचा प्रादुर्भाव टळू शकतो. परिणामी मलेरियाचा धोकाही कमी होण्यास मदत होऊ शकते.२५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येतो. रेनॉल्ड रॉस नावाच्या शास्त्रज्ञांनी मलेरियाच्या पॅरासाईटचा शोध लावला होता. त्यांनी मलेरियातील जंतू शोधल्याने त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २५ एप्रिल रोजी हिवताप दिन साजरा करण्यात येतो. डासांच्या मादीमुळे मलेरियाचा जंतूद्वारे प्रसार होतो. आजारी अथवा सदृढ मनुष्याला या डासांच्या चाव्यामुळे मलेरिया होऊ शकतो. परभणी जिल्ह्यात आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नगण्य असले तरी साचलेल्या घाण पाण्यातून या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. मोकळ्या जागेत, ग्रामीण भागामध्ये डबक्याचे पाणी साचल्यास त्यात जंतूची वाढ होते. यामुळे त्या जागेत डास मोठ्या प्रमाणात बसतात. असे डास चावल्यास जंतूद्वारे मलेरिया होण्याची भीती असते. योग्य उपचाराद्वारे व तपासणी पद्धतीमुळे हा आजार बरा होतो. या करीता लक्षणे आढळून आल्यास संबंधित रुग्णाने रक्ताची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)