शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
4
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
5
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
6
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
7
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
8
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
9
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
10
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
11
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
12
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
13
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
15
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
16
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
18
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय

आपले गाव आदर्श बनवा

By admin | Updated: August 11, 2014 00:25 IST

हिंगोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले गाव आदर्श बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे केले.

हिंगोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले गाव आदर्श बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे केले.शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ८ आॅगस्ट रोजी सायंकाळी जांभरून येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास उपविभागीय महसूल अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, विभागीय वन अधिकारी चंद्रशेखर सरोदे, गावच्या सरपंच लहिजाबाई जुमडे, कळमनुरीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धाबे, पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रारंभी ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या. यावेळी आरोग्यसेवा, शिक्षण, घरकुल, रेशन, रोहयो या बाबतच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. जांभरून हे गाव आदिवासीबहुल असल्या कारणाने आदिवासींच्या योजनांबाबतही काही ग्रामस्थांनी प्रश्न विचारले. तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. जिल्हाधिकारी कासार म्हणाले की, ग्रामस्थांनी आरोग्याच्या बाबतीत सदैव सजग रहावे, महिलांसोबत बालकांच्या आरोग्याची काळजी घेतल्यास सदृढ पिढी निर्माण होईल, आरोग्य विषयक शासकीय उपक्रमांचा लाभ घ्यावा. उपचारासाठी कुठलाही खर्च करावा लागत नाही. गरोदर महिलांनी आशा स्वयंसेविकांच्या संपर्कात रहावे, बालकांना वेळेवर लसीकरण करावे, मुलींचे लग्न १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर करावे. ते म्हणाले की, उघड्यावर शौचास बसू नका, शासनाच्या योजनेचा लाभ घेवून घरोघरी शौचालय बांधा, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेवून शेततळी, विहिरी यासह जलसंधारणाचे विविध उपक्रम राबवा, आधुनिक पद्धतीने शेती करा, जन्म-मृत्यूची नोंद वेळेवर करा, यावेळी वारसांची नावे लावण्याबाबतची कार्यवाही तातडीने पुर्ण करून चावडी वाचन करण्याबाबतची सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. मुलांना शाळेत घाला. त्यांची अभ्यासातील प्रगती जाणून घेण्यासाठी पालकांनी महिन्यातील एक दिवस शाळेसाठी द्यावा, रेशनच्या धान्याचा पुरवठा व्यवस्थित होतो काय? यासाठी ग्रामदक्षता समितीने दक्ष रहावे, ग्रामस्थांनी कुठल्याही व्यसनाच्या आहारी जावू नये, गावाच्या प्रगतीसाठी शासनाच्या योजना समजून घ्या, अडचणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना भेटा, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. काही ग्रामस्थांना वन विभागाच्या वतीने गॅस किटचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)