शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आपले गाव आदर्श बनवा

By admin | Updated: August 11, 2014 00:25 IST

हिंगोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले गाव आदर्श बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे केले.

हिंगोली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून आपले गाव आदर्श बनवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी हिंगोली तालुक्यातील जांभरून आंध येथे केले.शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ८ आॅगस्ट रोजी सायंकाळी जांभरून येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास उपविभागीय महसूल अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, विभागीय वन अधिकारी चंद्रशेखर सरोदे, गावच्या सरपंच लहिजाबाई जुमडे, कळमनुरीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धाबे, पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.प्रारंभी ग्रामस्थांनी विविध समस्या मांडल्या. यावेळी आरोग्यसेवा, शिक्षण, घरकुल, रेशन, रोहयो या बाबतच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. जांभरून हे गाव आदिवासीबहुल असल्या कारणाने आदिवासींच्या योजनांबाबतही काही ग्रामस्थांनी प्रश्न विचारले. तसेच ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले. जिल्हाधिकारी कासार म्हणाले की, ग्रामस्थांनी आरोग्याच्या बाबतीत सदैव सजग रहावे, महिलांसोबत बालकांच्या आरोग्याची काळजी घेतल्यास सदृढ पिढी निर्माण होईल, आरोग्य विषयक शासकीय उपक्रमांचा लाभ घ्यावा. उपचारासाठी कुठलाही खर्च करावा लागत नाही. गरोदर महिलांनी आशा स्वयंसेविकांच्या संपर्कात रहावे, बालकांना वेळेवर लसीकरण करावे, मुलींचे लग्न १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर करावे. ते म्हणाले की, उघड्यावर शौचास बसू नका, शासनाच्या योजनेचा लाभ घेवून घरोघरी शौचालय बांधा, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेवून शेततळी, विहिरी यासह जलसंधारणाचे विविध उपक्रम राबवा, आधुनिक पद्धतीने शेती करा, जन्म-मृत्यूची नोंद वेळेवर करा, यावेळी वारसांची नावे लावण्याबाबतची कार्यवाही तातडीने पुर्ण करून चावडी वाचन करण्याबाबतची सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. मुलांना शाळेत घाला. त्यांची अभ्यासातील प्रगती जाणून घेण्यासाठी पालकांनी महिन्यातील एक दिवस शाळेसाठी द्यावा, रेशनच्या धान्याचा पुरवठा व्यवस्थित होतो काय? यासाठी ग्रामदक्षता समितीने दक्ष रहावे, ग्रामस्थांनी कुठल्याही व्यसनाच्या आहारी जावू नये, गावाच्या प्रगतीसाठी शासनाच्या योजना समजून घ्या, अडचणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना भेटा, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. काही ग्रामस्थांना वन विभागाच्या वतीने गॅस किटचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)