शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहचवा

By admin | Updated: September 19, 2014 00:12 IST

परभणी: काँग्रेसच्या आघाडी सरकारने व केंद्रातील युपीए सरकारने त्यांच्या कालावधीत लोकहिताचे घेतलेले निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून समाजजागृती करावी,

परभणी: राज्यातील काँग्रेसच्या आघाडी सरकारने व केंद्रातील युपीए सरकारने त्यांच्या कालावधीत लोकहिताचे घेतलेले निर्णय सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून समाजजागृती करावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी हरिकृष्ण यांनी येथे आयोजित निर्धार मेळाव्यात बोलताना केले.अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने परभणी येथील नांदखेडा रोडवरील खाजगी सभागृहात निर्धार मेळाव्याचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरिकृष्ण बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, जि.प. सदस्य मेघना बोर्डीकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, नगरसेवक डॉ.विवेक नावंदर, इरफान मलिक, लोकसभा अध्यक्ष नागसेन भेरजे, रवि पतंगे, नदीम इनामदार, लियाकत अली अन्सारी, इरफान उर रहेमान खान, बाळासाहेब रेंगे, गफ्फार मास्टर, नागसेन सोनपसारे, बंडू पाचलिंग, बाळासाहेब फुलारी, अगंद सोंगे, पेदापल्ली, डॉ.जेथलिया, विनय बांठिया, संतोष दिंडे, सतीश दामोदरे, अनिल गुट्टे, गणेश वाघमारे, इरफान आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना हरिकृष्ण यांनी मोदी सरकारने अच्छे दिन आने वाले है ची घोषणा फोल ठरल्याचे नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत निदर्शनास आले असल्याचे सांगितले. राज्यातील आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षात तर गेल्या दहा वर्षात केंद्रातील युपीए सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचवावेत. निश्चित विजय मिळेल. काँग्रेसने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार राज्यामध्ये पुन्हा एकदा आघाडीचे सरकार येणार असून परभणीतही आघाडीचीच जागा निवडून येणार असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचा पंजा हाच उमेदवार समजून कामाला लागण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला. यावेळी बोलताना सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी परभणी विधानसभेत काँग्रेस सातत्याने का पराभूत होते, याचे मंथन करावे व आता युवक काँग्रेसला ही जागा सोडण्यात यावी, अशी मागणी केली. काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वादामुळेच येथे आतापर्यंत पराभव झाल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक युवक काँग्रेसचे परभणी विधानसभा अध्यक्ष गणेश देशमुख यांनी केले. (प्रतिनिधी)यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये भाषण केले. ते म्हणाले की, पक्षाचे तिकीट मागवून आपण बेजार झालो आहोत. आम्ही सर्व ज्येष्ठ मंडळी वेटींगवर आहोत. वेटींगऐवजी आरएसी तर असू द्या, त्यातही आम्ही खूश राहणार आहोत, असे म्हणताच सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. यावेळी त्यांनी १ बुथ दहा युथ ही संकल्पना युवक काँग्रेस, काँग्रेस व महिला काँग्रेस यांनी सक्षमपणे अंमलात आणावी, असे आवाहन केले. परभणीची जागा निवडून आणण्याची जबाबदारी युवक काँग्रेसने घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादीवर जोरदार टीकाया निर्धार मेळाव्यात डॉ.विवेक नावंदर, मेघना बोर्डीकर, सिद्धार्थ हत्तीअंबिरे या तिघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. जिल्ह्यात खरी लढाई राष्ट्रवादीसोबतच असल्याचे त्यांनी सांगितले. हत्तीअंबिरे यांनी तर काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावरच लढवावी, असे सांगून जिंतूरमध्ये पुन्हा एकदा आ.रामप्रसाद बोर्डीकरच विजयी होणार असल्याचे भाकित केले.