शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

महिला बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध करा-अशोकराव चव्हाण

By admin | Updated: March 20, 2016 01:05 IST

नांदेड : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांना तालुकास्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे,

नांदेड : ग्रामीण भागातील महिला बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी होत असून उत्पादनक्षमता, चिकाटी व परिश्रमाची तयारी असल्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांना तालुकास्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिला बचत गटांच्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केले आहे़ या प्रदर्शनाचे उद्घाटन खा़ चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी झाले़ यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमास आ़ डी़ पी़ सावंत, आ़ वसंतराव चव्हाण, जि़ प़ अध्यक्षा मंगला गुंडले, जि़ प़ शिक्षण सभापती संजय बेळगे, अतिरिक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, गुलाबसिंह राठोड, सुमिता व्याहाळकर, इंदिरा गांधी महिला बचत गट संघटनेच्या जिल्हाध्यक्षा महादेवी मठपती, अ‍ॅड़ एऩ एम़ रानोळकर यांची उपस्थिती होती़ प्रशासनाने या बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत़ मार्केटिंगच्या बाबतीत लक्ष देवून तालुकास्तरावर विक्री केंद्र सुरू केले पाहिजे़ दुष्काळाच्या काळात या बचत गटांनी अधिक चांगले काम करून आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही खा़ चव्हाण यांनी बचतगटांना केले़ सुमती व्याहाळकर म्हणाल्या, बचत गटातील महिलांनी बँकेचे कर्ज घराचे बांधकाम, लग्न, आजारासाठी नव्हे, तर उद्योगासाठी घ्यावे़ तरच बचत गट सक्षम होतील़ प्रास्ताविक प्रकल्प संचालक सुधीर भातलवंडे यांनी केले़ सूत्रसंचालन प्रदीप सोनटक्के, सतीश कावडे यांनी तर जी़ बी़ सुपेकर यांनी आभार मानले़ ग्रामीण भागातील महिला बचत गटांना खा़ अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले़ सन २०१३- १४ या वर्षात प्रथम पुरस्कार अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील सरस्वती महिला बचत गटाला, द्वितीय कंधार तालुक्यातील शेकापूर येथीली साईबाबा महिला बचत गट व तृतीय पुरस्कार हदगाव तालुक्यातील तामसा येथील राजश्री बचत गटाला देण्यात आला़ २०१४- १५ चा प्रथम पुरस्कार अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील समंत महिला बचत गट, पाथरड येथील आम्रपाली महिला बचत गट व तृतीय तेलंगवाडी येथील जिजामाता महिला बचतगट यांना पुरस्कार देण्यात आला़ प्रथम १० हजारांचा तर द्वितीय पुरस्कार ५ हजार रूपयांचा आहे़ (प्रतिनिधी)काँग्रेसच्या काळात शासनाने महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले होते़ त्यामुळे गावपातळीवर महिला बचत गटांचे जाळे निर्माण झाले़ नांदेड जिल्ह्यात १९८० साली बचत गटांसाठी योजना सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत १९ हजार ६०० बचत गट स्थापन झाले आहेत़ त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांच्या सक्षमीकरणाची संधी आहे़