शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

महिला बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध करा-अशोकराव चव्हाण

By admin | Updated: March 20, 2016 01:05 IST

नांदेड : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांना तालुकास्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे,

नांदेड : ग्रामीण भागातील महिला बचतगटाच्या माध्यमातून स्वावलंबी होत असून उत्पादनक्षमता, चिकाटी व परिश्रमाची तयारी असल्यामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटांना तालुकास्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़ जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिला बचत गटांच्या वस्तूंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केले आहे़ या प्रदर्शनाचे उद्घाटन खा़ चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी झाले़ यावेळी ते बोलत होते़ कार्यक्रमास आ़ डी़ पी़ सावंत, आ़ वसंतराव चव्हाण, जि़ प़ अध्यक्षा मंगला गुंडले, जि़ प़ शिक्षण सभापती संजय बेळगे, अतिरिक्ति मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, गुलाबसिंह राठोड, सुमिता व्याहाळकर, इंदिरा गांधी महिला बचत गट संघटनेच्या जिल्हाध्यक्षा महादेवी मठपती, अ‍ॅड़ एऩ एम़ रानोळकर यांची उपस्थिती होती़ प्रशासनाने या बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत़ मार्केटिंगच्या बाबतीत लक्ष देवून तालुकास्तरावर विक्री केंद्र सुरू केले पाहिजे़ दुष्काळाच्या काळात या बचत गटांनी अधिक चांगले काम करून आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही खा़ चव्हाण यांनी बचतगटांना केले़ सुमती व्याहाळकर म्हणाल्या, बचत गटातील महिलांनी बँकेचे कर्ज घराचे बांधकाम, लग्न, आजारासाठी नव्हे, तर उद्योगासाठी घ्यावे़ तरच बचत गट सक्षम होतील़ प्रास्ताविक प्रकल्प संचालक सुधीर भातलवंडे यांनी केले़ सूत्रसंचालन प्रदीप सोनटक्के, सतीश कावडे यांनी तर जी़ बी़ सुपेकर यांनी आभार मानले़ ग्रामीण भागातील महिला बचत गटांना खा़ अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले़ सन २०१३- १४ या वर्षात प्रथम पुरस्कार अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील सरस्वती महिला बचत गटाला, द्वितीय कंधार तालुक्यातील शेकापूर येथीली साईबाबा महिला बचत गट व तृतीय पुरस्कार हदगाव तालुक्यातील तामसा येथील राजश्री बचत गटाला देण्यात आला़ २०१४- १५ चा प्रथम पुरस्कार अर्धापूर तालुक्यातील उमरी येथील समंत महिला बचत गट, पाथरड येथील आम्रपाली महिला बचत गट व तृतीय तेलंगवाडी येथील जिजामाता महिला बचतगट यांना पुरस्कार देण्यात आला़ प्रथम १० हजारांचा तर द्वितीय पुरस्कार ५ हजार रूपयांचा आहे़ (प्रतिनिधी)काँग्रेसच्या काळात शासनाने महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले होते़ त्यामुळे गावपातळीवर महिला बचत गटांचे जाळे निर्माण झाले़ नांदेड जिल्ह्यात १९८० साली बचत गटांसाठी योजना सुरू झाली तेव्हापासून आजपर्यंत १९ हजार ६०० बचत गट स्थापन झाले आहेत़ त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांच्या सक्षमीकरणाची संधी आहे़