शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

‘स्वातंत्र्य संग्राम’ स्मारकाचे पावित्र्य कायम ठेवा, मराठवाडा मुक्तिसंग्राम पाठ्यपुस्तकात यावा - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:38 IST

मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्रामाची साक्ष देणारे क्रांतीचौक हे स्थळ आता स्वातंत्र्यसंग्राम स्मारकातील २०० फूट ध्वजस्तंभामुळे विश्वपटलावर ओळख निर्माण करण्यासाठी निघाले आहे. देशभक्ती, स्वाभिमान, आत्मविश्वास, आत्मगौरव वाढविणाºया ध्वजस्तंभाची गरिमा (पावित्र्य) कायम ठेवावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.

औरंगाबाद : मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्रामाची साक्ष देणारे क्रांतीचौक हे स्थळ आता स्वातंत्र्यसंग्राम स्मारकातील २०० फूट ध्वजस्तंभामुळे विश्वपटलावर ओळख निर्माण करण्यासाठी निघाले आहे. देशभक्ती, स्वाभिमान, आत्मविश्वास, आत्मगौरव वाढविणाºया ध्वजस्तंभाची गरिमा (पावित्र्य) कायम ठेवावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.क्रांतीचौक येथे अडीच कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यसंग्राम स्मारकातील ध्वजस्तंभाचे लोकार्पण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत पार पडले.मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्राम हा हिंदू, मुस्लीम, शीख, इसार्इंचा स्वातंत्र्यलढा आहे. त्यामुळे या लढ्याची नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश करावा, अशी अपेक्षादेखील राज्यपालांनी याप्रसंगी व्यक्त केली.वंदेमातरम म्हणायचे की नाही. राष्ट्रगीतासाठी उभे राहायचे की नाही, यावरून वाद होण्याचे प्रकार दुर्दैवाने आज घडत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाहीत, असे सांगून राज्यपाल म्हणाले, निजामाला औरंगाबाद ताब्यात घ्यायचे होते; परंतु आपल्या पूर्वजांनी ते होऊ दिले नाही. १९४७ साली देश स्वतंत्र झाला; परंतु आम्ही निजामाच्या गुलामगिरी, अत्याचाराच्या जोखडात होतो. तत्कालीन शासनाने निजामाबरोबर करार केला, राष्ट्रनिर्मिती आणि वेगळे चलन यामुळे निजामाला जोश आला. त्याचे अत्याचार वाढल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पोलीस अ‍ॅक्शनमुळे मराठवाडा-हैदराबाद- कर्नाटक या प्रांतांचे विलीनीकरण भारतात झाले. विलीनीकरण झाले नसते तर आज या प्रांतांची स्थिती दयनीय असती. या प्रांतांविना भारताचा नकाशा अर्धवट राहिला असता.या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक मुस्लीमवीरांनी बलिदान दिले आहे. तुरेबाजखान, मौलवी अलाउद्दीन, शोएबउल्ला खान, पवार यांचा उल्लेख करून ते म्हणाले, मुक्तिसंग्रामात ज्या वीरांनी बलिदान दिले, त्यांची स्मारके झाली पाहिजेत. स्वामी रामानंद तीर्थ, भाऊसाहेब वैशंपायन, अनंत भालेराव, विजेंयद्र काबरा, बाबासाहेब परांजपे, चंद्रगुप्त चौधरी, तारामती लड्डा, रमणभाई पारिख, दिगंबरराव बिंदू, देविसिंग चौहान यांच्या योगदानाचे स्मरणही यावेळी त्यांनी केले.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, खा.रावसाहेब दानवे, खा.चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, आयुक्त डी. एम. मुगळीकर, आयकर विभागाचे प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव, समितीचे सदस्य राम भोगले, मानसिंग पवार यांच्यासह राजकीय, उद्योग, प्रशासकीय अधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले.क्रांतिचौकातच ध्वजस्तंभ का उभारला..?ध्वजस्तंभ उभारण्यासाठी शहरातील चार ते पाच जागांचा विचार करण्यात आला. त्यापैकी बहुतांश जागांचा वाद होता. त्यामुळे क्रांतिचौकातील ही जागा स्तंभासाठी निवडली. शहरात सर्व बाजूंनी हा ध्वज दिसेल, असे समिती सदस्य भोगले यांनी सांगितले. या उद्यानाची दुरवस्था झालेली होती, तसेच गैरवापरही होत असे. त्यामुळे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला, शिवाय लोकसहभागातूनच स्तंभ उभारण्याची संकल्पना पुढे आली. क्रांतिचौकातील ही जागा ऐतिहासिक आहे. राष्ट्रीय उठावापासून मराठवाडा मुक्तिसंग्रामापर्यंत या जागेचे महत्त्व अधोरेखित आहे, असे भोगले यांनी नमूद केले. तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी या स्तंभ उभारणीसाठी पाठपुरावा केला. त्यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद