शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वातंत्र्य संग्राम’ स्मारकाचे पावित्र्य कायम ठेवा, मराठवाडा मुक्तिसंग्राम पाठ्यपुस्तकात यावा - राज्यपाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:38 IST

मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्रामाची साक्ष देणारे क्रांतीचौक हे स्थळ आता स्वातंत्र्यसंग्राम स्मारकातील २०० फूट ध्वजस्तंभामुळे विश्वपटलावर ओळख निर्माण करण्यासाठी निघाले आहे. देशभक्ती, स्वाभिमान, आत्मविश्वास, आत्मगौरव वाढविणाºया ध्वजस्तंभाची गरिमा (पावित्र्य) कायम ठेवावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.

औरंगाबाद : मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्रामाची साक्ष देणारे क्रांतीचौक हे स्थळ आता स्वातंत्र्यसंग्राम स्मारकातील २०० फूट ध्वजस्तंभामुळे विश्वपटलावर ओळख निर्माण करण्यासाठी निघाले आहे. देशभक्ती, स्वाभिमान, आत्मविश्वास, आत्मगौरव वाढविणाºया ध्वजस्तंभाची गरिमा (पावित्र्य) कायम ठेवावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी केले.क्रांतीचौक येथे अडीच कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यसंग्राम स्मारकातील ध्वजस्तंभाचे लोकार्पण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत पार पडले.मराठवाडा- हैदराबाद मुक्तिसंग्राम हा हिंदू, मुस्लीम, शीख, इसार्इंचा स्वातंत्र्यलढा आहे. त्यामुळे या लढ्याची नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश करावा, अशी अपेक्षादेखील राज्यपालांनी याप्रसंगी व्यक्त केली.वंदेमातरम म्हणायचे की नाही. राष्ट्रगीतासाठी उभे राहायचे की नाही, यावरून वाद होण्याचे प्रकार दुर्दैवाने आज घडत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाहीत, असे सांगून राज्यपाल म्हणाले, निजामाला औरंगाबाद ताब्यात घ्यायचे होते; परंतु आपल्या पूर्वजांनी ते होऊ दिले नाही. १९४७ साली देश स्वतंत्र झाला; परंतु आम्ही निजामाच्या गुलामगिरी, अत्याचाराच्या जोखडात होतो. तत्कालीन शासनाने निजामाबरोबर करार केला, राष्ट्रनिर्मिती आणि वेगळे चलन यामुळे निजामाला जोश आला. त्याचे अत्याचार वाढल्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पोलीस अ‍ॅक्शनमुळे मराठवाडा-हैदराबाद- कर्नाटक या प्रांतांचे विलीनीकरण भारतात झाले. विलीनीकरण झाले नसते तर आज या प्रांतांची स्थिती दयनीय असती. या प्रांतांविना भारताचा नकाशा अर्धवट राहिला असता.या स्वातंत्र्यसंग्रामात अनेक मुस्लीमवीरांनी बलिदान दिले आहे. तुरेबाजखान, मौलवी अलाउद्दीन, शोएबउल्ला खान, पवार यांचा उल्लेख करून ते म्हणाले, मुक्तिसंग्रामात ज्या वीरांनी बलिदान दिले, त्यांची स्मारके झाली पाहिजेत. स्वामी रामानंद तीर्थ, भाऊसाहेब वैशंपायन, अनंत भालेराव, विजेंयद्र काबरा, बाबासाहेब परांजपे, चंद्रगुप्त चौधरी, तारामती लड्डा, रमणभाई पारिख, दिगंबरराव बिंदू, देविसिंग चौहान यांच्या योगदानाचे स्मरणही यावेळी त्यांनी केले.विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर, खा.रावसाहेब दानवे, खा.चंद्रकांत खैरे, आ.अतुल सावे, संजय शिरसाट, इम्तियाज जलील, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, आयुक्त डी. एम. मुगळीकर, आयकर विभागाचे प्रधान आयुक्त शिवदयाल श्रीवास्तव, समितीचे सदस्य राम भोगले, मानसिंग पवार यांच्यासह राजकीय, उद्योग, प्रशासकीय अधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मुकुंद कुलकर्णी यांनी केले.क्रांतिचौकातच ध्वजस्तंभ का उभारला..?ध्वजस्तंभ उभारण्यासाठी शहरातील चार ते पाच जागांचा विचार करण्यात आला. त्यापैकी बहुतांश जागांचा वाद होता. त्यामुळे क्रांतिचौकातील ही जागा स्तंभासाठी निवडली. शहरात सर्व बाजूंनी हा ध्वज दिसेल, असे समिती सदस्य भोगले यांनी सांगितले. या उद्यानाची दुरवस्था झालेली होती, तसेच गैरवापरही होत असे. त्यामुळे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला, शिवाय लोकसहभागातूनच स्तंभ उभारण्याची संकल्पना पुढे आली. क्रांतिचौकातील ही जागा ऐतिहासिक आहे. राष्ट्रीय उठावापासून मराठवाडा मुक्तिसंग्रामापर्यंत या जागेचे महत्त्व अधोरेखित आहे, असे भोगले यांनी नमूद केले. तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी या स्तंभ उभारणीसाठी पाठपुरावा केला. त्यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद