शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

खैरेंसमोर आव्हान नेतृत्व टिकविण्याचे

By admin | Updated: September 26, 2014 01:55 IST

सुधीर महाजन, औरंगाबाद भाजपा-शिवसेना युतीचे तुटणे या एका घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झाले असले तरी खासदार चंद्रकांत खैरे यांचे केंद्रातील मंत्रिपदाचे मनसुबे उधळले गेले आहेत.

सुधीर महाजन, औरंगाबादभाजपा-शिवसेना युतीचे तुटणे या एका घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झाले असले तरी खासदार चंद्रकांत खैरे यांचे केंद्रातील मंत्रिपदाचे मनसुबे उधळले गेले आहेत. केंद्रात मंत्रिपदी त्यांची वर्णी लागेल, असे जवळपास त्यांच्यासह अनेकांनी गृहीत धरले होते; परंतु खैरेंच्या या महत्त्वाकांक्षेला मुरड बसली आहे. औरंगाबादच्या राजकारणाच्या दृष्टीने युतीचा हा एक परिणाम समजावा लागेल.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपला मंत्रिमंडळात समावेश होईल, असा विश्वास खैरेंना होता. खाजगीमध्ये ते बोलूनही दाखवीत होते. या फुटीचे परिणाम त्यांच्या वैयक्तिक राजकारणावरही दूरगामी स्वरूपात दिसतील. एकाच वेळी पक्षांतर्गत विरोधक आणि भाजपसह सर्व पक्षातील विरोधकांशी त्यांना संघर्ष करावा लागेल. ज्या अंबादास दानवे यांचा पत्ता कापण्यासाठी त्यांनी गंगापूर मतदारसंघाचे राजकारण केले तेच राजकारण त्यांच्यावर उलटण्याची शक्यता आहे. गंगापूरमधून आता अंबादास दानवे लढतीलच हे ओघाने आले; परंतु संदीपान भुमरे, संजय शिरसाट, अण्णासाहेब माने आणि अंबादास दानवे हे शिवसेनेतील खैरे यांचे विरोधक अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. आपल्या विरोधकांच्या खच्चीकरणाचा भाग म्हणून खैरेंनी गंगापूरमध्ये माने विरुद्ध दानवे अशी झुंज लावून दिली होती. परंतु आता नव्या राजकीय समीकरणात खैरेंचे हे सारे विरोधक उचल खातील. या फुटीचे परिणाम महापालिकेच्या युतीच्या राजकारणातही दिसून येतील. गेली अनेक वर्षे महापालिकेत युतीची सत्ता आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, अशा अवस्थेत महापालिकेतील युती काम करते. परंतु आता भाजपा प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात उभा राहणार आहे. खरे तर २०१० मध्येच सभापती पदाच्या मुद्यावर येथील युती तुटण्यापर्यंत पोहोचली होती. त्यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष असलेले बसवराज मंगरुळे यांचे डोकेही फोडले होते. हाणामारीपर्यंत गोष्टी पोहोचल्या होत्या, मने तर अगोदरच तुटली होती; परंतु विवेक देशपांडेंच्या घरी गोपीनाथ मुंडे यांनी समेटाचे राजकारण करून ही युती त्यावेळेस टिकविली होती. आता महापालिका निवडणुका आठ महिन्यांवर आल्या आहेत. अशा क्षणी युती तुटल्याने त्याचेही परिणाम होतील. महापालिका हे खैरेंचे सत्ताकेंद्र मानले जाते; परंतु येथेच सत्तेचे विघटन झाले आणि युतीविरहित होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुन्हा खैरेंची शक्ती कायम राहील याबद्दल शंका आहे, कारण पक्षांतर्गत विरोधक आणि विरोधात असलेली भाजपा हे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. खरे तर लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेनेच खैरे यांना तारले होते. आता या नव्या राजकीय समीकरणाशी ते कसे जुळवून घेतात, हे पहावे लागेल. पक्षांतर्गत विरोधक उचल खाणार हे निश्चित, त्यामुळे शिवसेनेचे नेतेपद सरकण्याची चिन्हे आहेत.आणखी एक शक्यता नाकारता येत नाही ती अशी की, विधानसभेत शिवसेनेचे सरकार आले तर पोटनिवडणूक लढवून खैरे विधानसभेवर जाऊ शकतात कारण शिवसेनेला लोकसभा आता महत्त्वाची राहिलेली नाही. परंतु या जर तरच्या गोष्टी आहेत. राजकारणात २+२ = ४ असे गणित नसते.