शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खैरेंसमोर आव्हान नेतृत्व टिकविण्याचे

By admin | Updated: September 26, 2014 01:55 IST

सुधीर महाजन, औरंगाबाद भाजपा-शिवसेना युतीचे तुटणे या एका घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झाले असले तरी खासदार चंद्रकांत खैरे यांचे केंद्रातील मंत्रिपदाचे मनसुबे उधळले गेले आहेत.

सुधीर महाजन, औरंगाबादभाजपा-शिवसेना युतीचे तुटणे या एका घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम झाले असले तरी खासदार चंद्रकांत खैरे यांचे केंद्रातील मंत्रिपदाचे मनसुबे उधळले गेले आहेत. केंद्रात मंत्रिपदी त्यांची वर्णी लागेल, असे जवळपास त्यांच्यासह अनेकांनी गृहीत धरले होते; परंतु खैरेंच्या या महत्त्वाकांक्षेला मुरड बसली आहे. औरंगाबादच्या राजकारणाच्या दृष्टीने युतीचा हा एक परिणाम समजावा लागेल.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपला मंत्रिमंडळात समावेश होईल, असा विश्वास खैरेंना होता. खाजगीमध्ये ते बोलूनही दाखवीत होते. या फुटीचे परिणाम त्यांच्या वैयक्तिक राजकारणावरही दूरगामी स्वरूपात दिसतील. एकाच वेळी पक्षांतर्गत विरोधक आणि भाजपसह सर्व पक्षातील विरोधकांशी त्यांना संघर्ष करावा लागेल. ज्या अंबादास दानवे यांचा पत्ता कापण्यासाठी त्यांनी गंगापूर मतदारसंघाचे राजकारण केले तेच राजकारण त्यांच्यावर उलटण्याची शक्यता आहे. गंगापूरमधून आता अंबादास दानवे लढतीलच हे ओघाने आले; परंतु संदीपान भुमरे, संजय शिरसाट, अण्णासाहेब माने आणि अंबादास दानवे हे शिवसेनेतील खैरे यांचे विरोधक अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. आपल्या विरोधकांच्या खच्चीकरणाचा भाग म्हणून खैरेंनी गंगापूरमध्ये माने विरुद्ध दानवे अशी झुंज लावून दिली होती. परंतु आता नव्या राजकीय समीकरणात खैरेंचे हे सारे विरोधक उचल खातील. या फुटीचे परिणाम महापालिकेच्या युतीच्या राजकारणातही दिसून येतील. गेली अनेक वर्षे महापालिकेत युतीची सत्ता आहे. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, अशा अवस्थेत महापालिकेतील युती काम करते. परंतु आता भाजपा प्रत्येक ठिकाणी शिवसेनेच्या विरोधात उभा राहणार आहे. खरे तर २०१० मध्येच सभापती पदाच्या मुद्यावर येथील युती तुटण्यापर्यंत पोहोचली होती. त्यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष असलेले बसवराज मंगरुळे यांचे डोकेही फोडले होते. हाणामारीपर्यंत गोष्टी पोहोचल्या होत्या, मने तर अगोदरच तुटली होती; परंतु विवेक देशपांडेंच्या घरी गोपीनाथ मुंडे यांनी समेटाचे राजकारण करून ही युती त्यावेळेस टिकविली होती. आता महापालिका निवडणुका आठ महिन्यांवर आल्या आहेत. अशा क्षणी युती तुटल्याने त्याचेही परिणाम होतील. महापालिका हे खैरेंचे सत्ताकेंद्र मानले जाते; परंतु येथेच सत्तेचे विघटन झाले आणि युतीविरहित होणाऱ्या महापालिका निवडणुकीत पुन्हा खैरेंची शक्ती कायम राहील याबद्दल शंका आहे, कारण पक्षांतर्गत विरोधक आणि विरोधात असलेली भाजपा हे त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. खरे तर लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेनेच खैरे यांना तारले होते. आता या नव्या राजकीय समीकरणाशी ते कसे जुळवून घेतात, हे पहावे लागेल. पक्षांतर्गत विरोधक उचल खाणार हे निश्चित, त्यामुळे शिवसेनेचे नेतेपद सरकण्याची चिन्हे आहेत.आणखी एक शक्यता नाकारता येत नाही ती अशी की, विधानसभेत शिवसेनेचे सरकार आले तर पोटनिवडणूक लढवून खैरे विधानसभेवर जाऊ शकतात कारण शिवसेनेला लोकसभा आता महत्त्वाची राहिलेली नाही. परंतु या जर तरच्या गोष्टी आहेत. राजकारणात २+२ = ४ असे गणित नसते.