शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

प्रमुख पक्षांना बंडखोरांची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:10 IST

मनपा निवडणुकीत प्रमुख पक्ष स्वबळ आजमावणार हे स्पष्ट झाले आहे. प्रमुख चारही पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळेच शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा एबी फॉर्म देताना कसरत करावी लागणार असून प्रमुख पक्षांनी बंडखोरांची धास्ती घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, भाजपामध्ये उमेदवारांची नावे निश्चित करण्यावरुन धुसफूस सुरु असून मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत झालेल्या बैठकीला मोजक्याच नेत्यांची उपस्थिती राहिल्याने कोअर कमिटीतील इतर सदस्यांत अस्वस्थता पसरली आहे.

विशाल सोनटक्के ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मनपा निवडणुकीत प्रमुख पक्ष स्वबळ आजमावणार हे स्पष्ट झाले आहे. प्रमुख चारही पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळेच शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा एबी फॉर्म देताना कसरत करावी लागणार असून प्रमुख पक्षांनी बंडखोरांची धास्ती घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, भाजपामध्ये उमेदवारांची नावे निश्चित करण्यावरुन धुसफूस सुरु असून मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत झालेल्या बैठकीला मोजक्याच नेत्यांची उपस्थिती राहिल्याने कोअर कमिटीतील इतर सदस्यांत अस्वस्थता पसरली आहे.युती आणि आघाडीची आशा मावळल्यानंतर चारही प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. ८१ जागांसाठी निवडणूक होत असली तरी काँग्रेस आणि भाजपाकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच एबी फॉर्म वाटपानंतर नाराज झालेल्यांना आवरायचे कसे असा प्रश्न या पक्षांसमोर उभा आहे. शुक्रवारी विविध प्रभांगांसाठी तब्बल १७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसतर्फे प्राथमिक याद्या तयार झाल्यानंतर पक्षाचे नेते खा. अशोकराव चव्हाण यांनी या यादीला अंतिम स्वरुप दिले आहे. भाजपामध्ये मात्र काहींशी गोंधळाची स्थिती आहे. भाजपा मोठ्या ताकदीने निवडणूक मैदानात उतरत असली तरी पक्षाकडे शहरासाठी एकमुखी नेतृत्व नाही़ त्यामुळेच भाजपाच्या अडचणी वाढत आहेत. उमेदवारांच्या निवडीसाठी निवडणूक प्रभारी संभाजीराव पाटील निलंगेकर आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ़ सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली २८ जणांची जम्बो कोअर कमिटी करण्यात आली. या कमिटीच्या उपस्थितीतच भाजपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या. याबाबतची जंत्री घेऊन याद्या निश्चित करण्यासाठी कोअर कमिटीची टीम मुंबईला जाऊन आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तब्बल दीड तास या कमिटीसाठी दिला. मात्र मुलाखती घेण्यासाठी असलेल्या २८ जणांपैकी मोजक्यांनाच यादी निश्चित करतेवेळी मुंबईला पाचारण केल्याने कोअर टीममधील उर्वरित सदस्य अस्वस्थ असल्याचे दिसून आले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे झालेल्या बैठकीला आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ.सुजितसिंंह ठाकूर यांच्यासह संतुक हंबर्डे, आ.प्रताप पाटील चिखलीकर, दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख, राम पाटील रातोळीकर, डॉ.धनाजीराव देशमुख, ओमप्रकाश पोकर्णा, डॉ.अजित गोपछडे, श्यामसुंदर शिंदे आदींची उपस्थिती होती. मात्र या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांढरे यांच्यासह माधवराव किन्हाळकर, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर भाजपाचे आदी प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे, उपस्थित असलेल्यांपैकीही दोन नेत्यांना अधिकृत निमंत्रण मिळाले नव्हते मात्र अखेरच्या क्षणी त्यांना या बैठकीत सामावून घेतल्याचे समजते़ या बैठकीत नेमके कोणते उमेदवार निश्चित झाले हे गुलदस्त्यात असले तरी मुलाखतीसाठी असलेल्या इतर प्रमुख पदाधिकाºयांना का डावलले ? असा प्रश्न आता पक्षातीलच काही जणांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून याच दिवशी पक्षाने नेमके कोणाला मैदानात उतरविले हे ही स्पष्ट होणार आहे.