शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

प्रमुख पक्षांना बंडखोरांची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:10 IST

मनपा निवडणुकीत प्रमुख पक्ष स्वबळ आजमावणार हे स्पष्ट झाले आहे. प्रमुख चारही पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळेच शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा एबी फॉर्म देताना कसरत करावी लागणार असून प्रमुख पक्षांनी बंडखोरांची धास्ती घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, भाजपामध्ये उमेदवारांची नावे निश्चित करण्यावरुन धुसफूस सुरु असून मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत झालेल्या बैठकीला मोजक्याच नेत्यांची उपस्थिती राहिल्याने कोअर कमिटीतील इतर सदस्यांत अस्वस्थता पसरली आहे.

विशाल सोनटक्के ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मनपा निवडणुकीत प्रमुख पक्ष स्वबळ आजमावणार हे स्पष्ट झाले आहे. प्रमुख चारही पक्षांकडे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यामुळेच शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचा एबी फॉर्म देताना कसरत करावी लागणार असून प्रमुख पक्षांनी बंडखोरांची धास्ती घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, भाजपामध्ये उमेदवारांची नावे निश्चित करण्यावरुन धुसफूस सुरु असून मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत झालेल्या बैठकीला मोजक्याच नेत्यांची उपस्थिती राहिल्याने कोअर कमिटीतील इतर सदस्यांत अस्वस्थता पसरली आहे.युती आणि आघाडीची आशा मावळल्यानंतर चारही प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारांची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती. ८१ जागांसाठी निवडणूक होत असली तरी काँग्रेस आणि भाजपाकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच एबी फॉर्म वाटपानंतर नाराज झालेल्यांना आवरायचे कसे असा प्रश्न या पक्षांसमोर उभा आहे. शुक्रवारी विविध प्रभांगांसाठी तब्बल १७४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसतर्फे प्राथमिक याद्या तयार झाल्यानंतर पक्षाचे नेते खा. अशोकराव चव्हाण यांनी या यादीला अंतिम स्वरुप दिले आहे. भाजपामध्ये मात्र काहींशी गोंधळाची स्थिती आहे. भाजपा मोठ्या ताकदीने निवडणूक मैदानात उतरत असली तरी पक्षाकडे शहरासाठी एकमुखी नेतृत्व नाही़ त्यामुळेच भाजपाच्या अडचणी वाढत आहेत. उमेदवारांच्या निवडीसाठी निवडणूक प्रभारी संभाजीराव पाटील निलंगेकर आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ़ सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली २८ जणांची जम्बो कोअर कमिटी करण्यात आली. या कमिटीच्या उपस्थितीतच भाजपा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही पार पडल्या. याबाबतची जंत्री घेऊन याद्या निश्चित करण्यासाठी कोअर कमिटीची टीम मुंबईला जाऊन आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तब्बल दीड तास या कमिटीसाठी दिला. मात्र मुलाखती घेण्यासाठी असलेल्या २८ जणांपैकी मोजक्यांनाच यादी निश्चित करतेवेळी मुंबईला पाचारण केल्याने कोअर टीममधील उर्वरित सदस्य अस्वस्थ असल्याचे दिसून आले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे झालेल्या बैठकीला आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ.सुजितसिंंह ठाकूर यांच्यासह संतुक हंबर्डे, आ.प्रताप पाटील चिखलीकर, दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख, राम पाटील रातोळीकर, डॉ.धनाजीराव देशमुख, ओमप्रकाश पोकर्णा, डॉ.अजित गोपछडे, श्यामसुंदर शिंदे आदींची उपस्थिती होती. मात्र या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांढरे यांच्यासह माधवराव किन्हाळकर, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर भाजपाचे आदी प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित नव्हते. विशेष म्हणजे, उपस्थित असलेल्यांपैकीही दोन नेत्यांना अधिकृत निमंत्रण मिळाले नव्हते मात्र अखेरच्या क्षणी त्यांना या बैठकीत सामावून घेतल्याचे समजते़ या बैठकीत नेमके कोणते उमेदवार निश्चित झाले हे गुलदस्त्यात असले तरी मुलाखतीसाठी असलेल्या इतर प्रमुख पदाधिकाºयांना का डावलले ? असा प्रश्न आता पक्षातीलच काही जणांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून याच दिवशी पक्षाने नेमके कोणाला मैदानात उतरविले हे ही स्पष्ट होणार आहे.