शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

महावितरणचीही अवकाळी

By admin | Updated: April 14, 2015 00:34 IST

राजेश खराडे , बीड गतवर्षी अवकाळी पाऊसात पडलेल्या कामाचे बील अद्याप न मिळाले नाही. त्यामुळे महावितरणचे कंत्राटदार यावर्षी पोल दुरुस्तीचे काम हातात घेण्यास नकार देत आहेत

राजेश खराडे , बीडगतवर्षी अवकाळी पाऊसात पडलेल्या कामाचे बील अद्याप न मिळाले नाही. त्यामुळे महावितरणचे कंत्राटदार यावर्षी पोल दुरुस्तीचे काम हातात घेण्यास नकार देत आहेत तर गेल्या वर्षी आॅडर दिलेली कामे बोगस असल्याचा ठपका ठेवत त्यांची बील दिली नाहीत. या वादात मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस वाऱ्यामुळे झालेल्या विद्युत पोलची दुरुस्ती रखडली आहे. परिणामी सहा उपकेंद्रच बंद असल्याने जिल्ह्यातील गावे, वाड्या-वस्त्या महिनाभरापसून अंधरात आहेत. महावितरण कंपनीकडून दुरूस्तीकरिता कोणतेही उद्यापर्यंत ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. महावितरणच्या या अजब कारभारामुळे जिल्ह्याततील संतप्त विद्युत ग्राहकांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाचे हत्यार उगारले आहे.महिन्याभरापसापसून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे महावितरणचेही मोठे नुकसान झाले आहे. १ मार्च पासून आतापर्यंत ११०० विद्युत खांब उनमळून पडले आहेत. यामध्ये प्रमुख वाहीनीवरील ४५५ तर लघुदाब वाहिनीवरील ६४३ विद्युत खांबाची पडझड झाली आहे. यामध्ये बीड तालुक्यातील सर्वाधिक मुख्य प्रवाहावरील ३४ तर लघुदाब वाहिनीवरील ७८ वाड्या-वस्त्यावरील पोलची नासधुस झाली आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही महावितरण कंपनीने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. महिन्याभरापसून महावितरणची पडझड झाली असूनही कंत्राटदारांना मात्र दुरूस्तीविषयी अद्यापही आॅर्डर देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आष्टी तालुक्यातील लाटेवाडी, महाजनवाडी व परिसरातील वाड्या-वस्त्यावरील विद्युत पुरवठा तब्बल महिन्याभरापासून खंडित आहे.जनजीवन विस्कळीत अवकाळीने थैमान घातल्याने सर्वसामान्यांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे. त्यातच ग्रामीण भागात महावितरणचे पोल घरावर पडले आहेत तर ट्रान्सफर्मर उघडे असल्याने ग्रामस्थांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. महावितरणमध्ये गुफ्तगुया पुर्वीच्या काळात कंत्राटरांना परिमंडळाच्या परवानगीविनाच टेंडर दिले होते. त्यामुळे यंदाच्या दुरूस्ती कामाकरिता परिमंडळाकडून काम वाटपाचे अधिकार देण्यात आलेले नाहीत. या कारभारामुळेच कंत्राटदारांच्या कामावर अंकुश लावला असल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समजले आहे. सहा उपकेंद्र बंद अवस्थेत अवकाळीच्या अवकृपेने जिल्ह्यातील तब्बल सहा उपकेंद्र बंद अवस्थेत आहेत. यामध्ये वडवणी तालुक्यातील वडवणी, चिंचवण, देवडी, चिंचाळा तर परळी तालुक्यातील मोहा व आचार्य टाकळी या उपकेंद्रचा समावेश आहे. उपकेंद्र बंद असल्याने ५० गावांमध्ये अंधार असून तब्बल १० हजार ग्राहक विजेपासून वंचित आहेत. तर ३० डी.पी उन्मळून पडले आहेत. महावितरणला ७० लाखाचा फटकामार्च महिन्यापासून सुरू झालेल्या अवकाळीमुळे महावितरणला आता पर्यंत ७० लाखाचा फटका बसला आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान विद्युत खांबाचे आहे. तर नुकसानीबरोबर ग्राहाकनांही सेवा विस्कळीत झाली आहे. ग्रामीण भागात जागोजागी विद्युत वाहक तारा तुटलेल्या आहेत. महावितरणकडून पर्यायी व्यवस्था म्हणून ३३ केव्ही व ११ केव्ही केंद्रांतून विद्युत पुरवठा करण्याचा मार्ग महावितरणने निवडला आहे.