शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

महावितरणला बसला १८ कोटींचा शॉक

By admin | Updated: October 8, 2016 01:15 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीचे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १७ ते १८ कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

औरंगाबाद : महावितरण कंपनीचे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे १७ ते १८ कोटी रुपयांपर्यंतचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजूनही विभागातील पूर्ण पाहणी झाली नसून या नुकसानीमुळे वीजपुरवठ्याला मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे युद्धपातळीवर आराखडे तयार करण्याचे आदेश प्रादेशिक प्रभारी संचालक तथा मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी यंत्रणेला दिले आहेत.मराठवाड्यात आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत दाणादाण उडवून देऊन सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत करून टाकले. वीज आणि रस्त्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याखालोखाल वीजपुरवठा यंत्रणा कोलमडली आहे. सुमारे ३०० ते ४०० गावांना वीजपुरवठा करणाऱ्या लाईन अतिवृष्टीत तुटल्या. त्यामुळे ही गावे अंधारात आहेत. बीड जिल्ह्यातील सुमारे १५०० विजेचे खांब वाकले आहेत. नांदेडमध्ये २ हजारांहून अधिक खांब वाकले आहेत. उस्मानाबाद, लातूरमध्येही नुकसान झाले आहे. ट्रान्सफॉर्मर अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर दुरुस्ती करणे शक्य होईल. तसेच चिखल आणि रस्ते नसल्यामुळे महावितरणच्या यंत्रणेला दुरुस्तीसाठी पोहोचणेही अवघड होत असल्याचे सांगण्यात येत आहे. महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी संचालक तथा मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, बीड, उस्मानाबाद, नांदेड, लातूर जिल्ह्यांत तातडीने पाहणी करून आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.