शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

रोहित्रासाठी महावितरणपुढे ग्रामस्थांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:13 IST

ग्रामीण भागातील नादुरूस्त व नवीन रोहित्रांसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. वेळोवेळी मागणी करूनही रोहित्र दुरूस्ती किंवा बदलून दिले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ हैराण आहेत. शिवाय काही गावांनी बिलभरणा करूनही अद्याप रोहित्रांसाठी चकरा माराव्या लागत असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण भागातील नादुरूस्त व नवीन रोहित्रांसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. वेळोवेळी मागणी करूनही रोहित्र दुरूस्ती किंवा बदलून दिले जात नाही. त्यामुळे ग्रामस्थ हैराण आहेत. शिवाय काही गावांनी बिलभरणा करूनही अद्याप रोहित्रांसाठी चकरा माराव्या लागत असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.मागील अनेक महिन्यांपासून रोहित्र दुरूस्ती व बदलून दिले जात नसल्याने ग्रामीण भागात अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. तसेच गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू असून वीजेमुळे व्यत्यय निर्माण होत आहे. महावितरणचे संबधित कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करीत असून कार्यालयाच्या शेतकºयांना चकरा माराव्या लागत आहेत. महावितरणच्या अधिकाºयांना वेळोवेळी लेखी व तोंडी सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याचे शेतकरी व ग्रामस्थांतून सांगितले जात होते. बिलभरणा करूनही रोहित्र बदलून अथवा दुरूस्ती करून दिले जात नाही. २६ आॅक्टोबर रोजी जिल्हाभरातील शेतकरी व ग्रामस्थ रोहित्रांसाठी हिंगोली येथील महाविरण कार्यालयात आले होते. वसमत तालुक्यातील महागाव, सोमठाणा, कुरूंदा, टाकळगाव, सेनगाव तालुक्यातील जवळा बु. येथील ग्रामस्थ रोहित्रांच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयात ठिय्या मांडून बसले होते. तर काही ठिकाणच्या डीपी वीज पडून जळून खाक झाल्या आहेत. वीज पडून जळालेल्या रोहित्रांचाही प्रश्न गंभीर असून तेही अद्याप बदलून दिले नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.