शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

महावितरण, ग्रा.पं.वर हल्लाबोल

By admin | Updated: June 5, 2014 01:09 IST

दौलताबाद : वाढता उकाडा आणि त्यातही १२ ते १३ तास भारनियमन यामुळे संतप्त झालेल्या दौलताबादकरांनी येथे महावितरण व ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करून जाळपोळ केली.

दौलताबाद : वाढता उकाडा आणि त्यातही १२ ते १३ तास भारनियमन यामुळे संतप्त झालेल्या दौलताबादकरांनी येथे महावितरण व ग्रामपंचायत कार्यालयावर हल्लाबोल करून जाळपोळ केली. या प्रकरणी पोलिसांनी २१ जणांना गजाआड केले आहे. दौलताबाद येथे दररोज तसे आठ तास भारनियमन होते; पण आता ते १२ तास करण्यात येत आहे. वाढत्या उन्हाळ्यासोबतच असह्य उकाडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर भारनियमन कमी न होता ते वाढविण्यात आल्याने ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट होऊन ही घटना घडली. भारनियमनाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास नागरिक महावितरणच्या कार्यालयासमोर जमू लागले. थोड्याच वेळात त्याचे रूपांतर मोठ्या जमावात झाले. पाहता पाहता हा जमाव बेफाम झाला. प्रथम या जमावाने महावितरणच्या कार्यालयावर हल्ला करीत दरवाजे तोडून तेथील टेबल, खुर्च्या, संगणक यांची तोडफोड करून महत्त्वाची कागदपत्रे जाळली. त्यानंतर जमावाने आपला मोर्चा शेजारीच असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाकडे वळविला. ग्रामपंचायत कार्यालयातील टेबल, खुर्च्या, संगणक आणि कागदपत्रे यांची जाळपोळ केली. या प्रकारात ग्रामपंचायतीचे अंदाजे १ लाख ११ हजार रुपयांचे, तर महावितरण कार्यालयाचे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गौतम फसले, उपनिरीक्षक गजानन तडसे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने कारवाई करून २१ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला. सर्व आरोपींना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. १ जून रोजी झाले होते आंदोलन भारनियमनाच्या निषेधार्थ यापूर्वीही १ जून रोजी काही युवकांनी रास्ता रोको करून या समस्येकडे लक्ष वेधले होते. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून हे आंदोलन मागे घेण्यास सांगितले होते. (वार्ताहर)