शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 01:10 IST

नालगोंडा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राने वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केलली आहे.

औरंगाबाद : नालगोंडा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राने वर्चस्व राखत सर्वसाधारण विजेतेपदाकडे वाटचाल सुरू केलली आहे.महाराष्ट्राने विविध वयोगट व प्रकाराच्या सांघिक गटात मुलांमध्ये दोन सुवर्ण, तीन रौप्य व एक कास्यपदक जिंकले आहे. मुलींच्या सांघिक गटात २ सुवर्ण, २ रौप्य व एक कास्यपदक जिंकले आहे.विशेष म्हणजे औरंगाबादच्या खेळाडूंनीही पदकांची लयलूट केली आहे. त्यात औरंगाबादच्या शाकेर सय्यद याने सांघिक आणि वैयक्तिक, अशी एकूण दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गेश जहागीरदार याने सांघिक सुवर्ण व वैयक्तिक रौप्यपदक जिंकले आहे. कशिष भराड, हर्षदा वंजारे, अभय शिंदे, दिग्विजय देशमुख यांनी सांघिक गटात सुवर्णपदकाची कमाई केली. सानिका मोरे हिने सांघिक रौप्य, तर यश वाघ व वेदांत खैरनार यांनी सांघिक कास्यपदके जिंकली आहेत. खेळाडूंना अजिंक्य दुधारे, राजू शिंदे, सागर मगरे, विलास उदय डोंगरे, दिनेश वंजारे, अजय त्रिभुवन, स्वप्नील तांगडे, संतोष आवचार, सचिन बोर्डे यांचे मार्गदर्शन लाभले. या संघासोबत संघव्यवस्थापक म्हणून क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे काम पाहत आहेत.या यशाबद्दल क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, भारतीय तलवारबाजी संघटनेचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.