शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

वस्तुस्थिती बदलत आहे; महायुतीच्या यशाच्या मार्गात अनेक अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 19:50 IST

आम्हीच जिंकू, अशा आविर्भावात युती असली तरी वस्तुस्थिती बदलत आहे.

ठळक मुद्देसत्तार यांना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. भाजपचे प्रशांत बंब हॅट्ट्रिक करण्यावर प्रश्नचिन्ह एमआयएमला या तीनही मतदारसंघात  मोठ्या अपेक्षा होत्या

- स. सो. खंडाळकर 

औरंगाबाद : मैदानात कुणी पहिलवानच दिसत नाही, असं नाही. कुस्तीच्या मैदानात कोणता पहिलवान कशी कुस्ती मारील आणि नामांकित पहिलवानालाही चीत-पट करील, हे सांगता येत नसतं. सध्या महाराष्ट्रात असंच काहीसं चालू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातही नऊच्या नऊ जागा आम्हीच जिंकू, अशा आविर्भावात युती असली तरी वस्तुस्थिती बदलत आहे. महायुतीला वाटतं तेवढं सोपं नाही. 

विधानसभेचे अध्यक्ष असलेल्या हरिभाऊ बागडे यांना काँग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांनी फुलंब्री मतदारसंघात तगडं आव्हान उभं केलं आहे. बागडेंमुळेच काळे यांना ही निवडणूक सोपी झाली आहे. भाजपने दुसरा उमेदवार दिला असता तर कदाचित काळे यांना अवघड गेलं असतं. बागडेंवर काळे रोज सडकून टीका करीत आहेत. शिवाय मागच्या वेळेसारखे राष्ट्रवादी वेगळे न लढल्यामुळे मत विभाजनाचा धोका दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते सिल्लोडच्या निवडणुकीकडे. कालच तेथे अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मोठी सभा झाली. काल-परवापर्यंत काँग्रेसमध्ये असलेल्या सत्तारांना महायुतीअंतर्गत भाजपनं स्वीकारलेलं नाही. तेथे भाजपने अपक्ष प्रभाकरराव पालोदकर यांच्या पाठीशी शक्ती एकवटलेली आहे. सत्तार यांना ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही.  

कन्नडमध्येही काट्याची लढत सुरू आहे. रावसाहेब दानवे यांचे  जावई हर्षवर्धन जाधव यांच्या अस्तित्वाची तेथे लढाई आहे. पण त्यांच्या व शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांच्या भांडणात राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कोल्हे यांनी पूर्वीपासूनच निवडणुकीची केलेली तयारी व त्यांचा घरोघर असलेला जनसंपर्क! गंगापूर- खुलताबाद मतदारसंघात भाजपचे प्रशांत बंब हॅट्ट्रिक करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरवेळी त्यांना स्थानिक मराठा नेत्यांमधील दुफळीचा लाभ उठवता आला. यावेळी ही संधी मिळणार नाही, याची काळजी घेऊन शिवसेनेचे एकेकाळचे आमदार असलेले अण्णासाहेब माने यांचे चिरंजीव संतोष माने यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घालण्यात आली. त्यामुळे गंगापूरची निवडणूक एकतर्फी राहिलेली नाही.   

वैजापूरच्या निवडणुकीतही शिवसेनेचे रमेश बोरनारे यांना राष्ट्रवादीचे अभय पा. चिकटगावकर यांचे तगडे आव्हान आहे. त्यांचे चुलते भाऊसाहेब पा. चिकटगावकर यांची ही जागा अभय टिकवू शकतात काय, हे पाहणे औत्सुक्याचेच. पैठणच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे. संजय वाघचौरे यांच्याऐवजी  राष्ट्रवादी काँग्रेसने दत्ता गोर्डे यांना उमेदवारी देऊन ही रंगत वाढवली आहे. संदीपान भुमरे या मतदारसंघातून सतत निवडून येत असतात. यावेळी मतदारांना बदल हवा असेल, तर तो होण्याची शक्यता आहे. प्रल्हाद राठोड (एमआयएम) व विजय चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) हे किती आणि कुणाची मते खातात, यावरही समीकरण अवलंबून आहे. 

एमआयएमला या तीनही मतदारसंघात  मोठ्या अपेक्षा होत्या; परंतु त्या पूर्ण होतील असे दिसत नाही. तिकीट मिळण्यापासून ते आता प्रचारात सुरू असलेल्या लाथाळ्या पाहता एमआयएम उघडी पडत चालली आहे. आता वंचित बहुजन आघाडीसोबत नाही. वंचितने औरंगाबाद पूर्व सोडता दोन्ही मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. पूर्वमध्ये मुस्लिम उमेदवारांमध्ये मुस्लिम मतांचे विभाजन अटळ आहे. बसपाचा उमेदवार दलित मते खाणार.... याचा फायदा भाजपचे अतुल सावे यांना होणार, अशी स्थिती दिसत आहे. 

औरंगाबाद पश्चिमच्या निवडणुकीची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचा इथं बोलबाला सुरू आहे. त्यांच्यामागे मदतीचे अनेक अदृश्य हात पाहता विद्यमान आमदार संजय शिरसाट यांचे धाबे दणाणले आहेत. मागच्या टर्ममध्ये शिरसाट यांचा परफॉर्मन्स नीट राहिला नसल्याची सार्वत्रिक तक्रार आहे.

औरंगाबाद मध्यमधील यावेळची निवडणूक शिवसेनेला सोपी झालेली आहे. एमआयएम, वंचित बहुजन आघाडी आपापल्या परीने लढत आहेत. राष्ट्रवादीचे कदीर मौलाना यांची स्थिती २००९ सारखी राहिलेली नाही. दलित- मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फायदा शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांना मिळू शकतो; परंतु नगरसेविका कीर्ती शिंदे यांचा सुनियोजित प्रचारही दखल घेण्याजोेगा आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमsillod-acसिल्लोडpaithan-acपैठणvaijapur-acवैजापूरgangapur-acगंगापूरkannad-acकन्नड