शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

औशात शेतकरी, शेतमजुरासह निराधारांचा महाआक्रोश मोर्चा

By संदीप शिंदे | Updated: January 15, 2024 18:56 IST

सोयाबीनला ९ हजार भाव, १०० टक्के पिकविमा देण्याची मागणी

औसा : मराठवाड्यातील शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी औसा तहसील कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत ऊसाला भाव का मिळत नाही, असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला. जोपर्यंत सोयाबीनला प्रतिक्विंटल ९ हजार भाव, १०० टक्के पिकविमा, निराधारांना ३ हजार मानधन मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

औसा तालुक्यात १५ दिवस १०० गावातून १५० कि.मी. पायीदिंडी काढून शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांच्या मागण्याची जनजागृती करण्यात आली. किल्ला मैदान ते औसा तहसील कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी कांदा निर्यात बंदी उठवा, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान द्याओ, चालू बाकी करणाऱ्यांसाठी व्याजासह कर्जाची संपूर्ण रक्कम भरण्याची अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी शेतकरी नेते सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी, राजू कसबे, शामभाऊ जाधव आदींसह शेतकरी, शेतमजूर, आणि निराधार उपस्थित होते.

१९ जानेवारीला रेल्वे अडवणार...आम्ही आमचा हक्क व अधिकार मागतोय, सोयाबीनचा एकरी ३५ हजार खर्च अन् उत्पन्न १५ हजार. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याने सोयाबीनला ४५०० भाव मिळतो. १८ जानेवारीपर्यंत वरील मागण्या मान्य न झाल्यास १९ जानेवारीला मुंबई, गुजरातला रेल्वे जाणार नाहीत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा जीवही गेला तरीही चालेल, पण शेतकरी, शेतमजूर, निराधारांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र