शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोह योजनेतील विहिरी अपूर्ण

By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST

इलियास बावाणी, श्रीक्षेत्र माहूर शासनाकडून मग्रारोहयोअंतर्गत शेतकऱ्यांना शेकडो विहिरी मंजूर केल्या, परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक विहिरी गेल्या

इलियास बावाणी, श्रीक्षेत्र माहूरशासनाकडून मग्रारोहयोअंतर्गत शेतकऱ्यांना शेकडो विहिरी मंजूर केल्या, परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक विहिरी गेल्या चार वर्षांपासून पूर्णत्वाकडे गेल्या नसल्याने सिंचनक्षेत्र वाढूनही शासन दरबारी सिंचन क्षेत्रात वाढ झाली नसल्याचा अहवाल गेला़माहूर तालुक्यात वनजमिनीसह ३४ हजार ४०० हेक्टर जमीन शेती करण्यालायक आहे, पैकी कृषी विभागाच्या माहितीनुसार ५ हजार २०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे़ मग्रारोहयो योजना लागू झाल्यानंतर सन २०११ वर्षापासून या योजनेतून माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानित विहिरी देण्यात आल्या़ कुशल अकुशलच्या भानगडीत ६० टक्के अकुशल व ४० टक्के कुशल देयकांचे प्रमाण राखण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश न आल्याने सन २०११ पासून कुशल देयके देण्यात न आलयाने या विहिरी पूर्ण होवून सिंचनक्षेत्र वाढूनही विहिरी अपूर्ण असल्याचे भिजत घोंगडे कायम आहे़माहूर तालुक्यात ६२ महसुली गावे व या गावांना जोडलेल्या ६० गावांपैकी फक्त ५४ गावांतील ७३६ शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान देण्यात आले़ यापैकी त्रुटीत ३०७ प्रगतीपथावर ५० अपूर्ण ६७७ तर ९ विहिरी पूर्ण झालेल्या आहेत़ यात अंजनखेड येथे-९, आष्टा-१९, आसोली-२६, बंजारा तांडा-१९, भगवती-९, भोरड- ७, बोंडगव्हाण-२, बोरवाडी-४२, चोरड-१२, दिगडी कुत्तेमार-३, दिगडी धानोरा-१०, ईवळेश्वर-२४, गोंडवडसा-७, गोकुळ गोंडेगाव-१०, गुंडवळ-१६, हडसणी-२०, हिंगणी-८, करंजी-५, कुपटी-२६, लखमापूर-२९, लांजी-३, लसनवाडी-२७, लिंबायत-५, लोकरवाडी-६, मच्छिंद्रपार्डी-५, मदनापूर-२१, मेंढकी-७, महादापूर-१०, मांडवा-१५,मेठ-११, मुंगश्ी-१३, मुरली-८, पाचुंदा-२६, पडसा-१, पानोळा-१९, पापलवाडी-१७, रूई-३, समीगुडा-६, रूपलानाईक-२०, रुपानाईकतांडा-११, साकूर-५, सेलू-११, शेकापूर-४, शेखफरीदवझरा-५, सिंदखेड-१६, टाकळी-२, तांदळा-२३, तुळश्ी-१६, उमरा-६, वडसा-३, वाईबाजार-१, वानोळा-२८, वसरामनाईक तांडा-१९, वायफनी-६ या गावांना विहिरी देण्यात आल्या आहेत़या विहिरीधारकांना १ लाख ८७ हजार रुपये अनुदान देण्याचे ठरलेले असताना यापैकी अनेकांना १ लाख रुपयापर्यंत अकुशल देयके देण्यात आली़ उर्वरित रक्कम कुशल या नावावर अडकवून ठेवण्यात आली आहे़ १५ कोटी रुपये देणे असताना फक्त ७ कोटी देण्यात आल्याची माहिती असून अधिकाऱ्यांच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना बसल्यास अस्मानी संकटात नुकसान होणार आहे़ परिणामी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नसून कारण दोन लाख रुपयांत विहीर होणे शक्य नसल्याने उर्वरित रक्कम मिळेल या आशेने प्रत्येक शेतकऱ्याने व्याजाने लाखो रुपये घेवून विहिरी पूर्ण केल्या आहेत़