इलियास बावाणी, श्रीक्षेत्र माहूरशासनाकडून मग्रारोहयोअंतर्गत शेतकऱ्यांना शेकडो विहिरी मंजूर केल्या, परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अनेक विहिरी गेल्या चार वर्षांपासून पूर्णत्वाकडे गेल्या नसल्याने सिंचनक्षेत्र वाढूनही शासन दरबारी सिंचन क्षेत्रात वाढ झाली नसल्याचा अहवाल गेला़माहूर तालुक्यात वनजमिनीसह ३४ हजार ४०० हेक्टर जमीन शेती करण्यालायक आहे, पैकी कृषी विभागाच्या माहितीनुसार ५ हजार २०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे़ मग्रारोहयो योजना लागू झाल्यानंतर सन २०११ वर्षापासून या योजनेतून माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अनुदानित विहिरी देण्यात आल्या़ कुशल अकुशलच्या भानगडीत ६० टक्के अकुशल व ४० टक्के कुशल देयकांचे प्रमाण राखण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश न आल्याने सन २०११ पासून कुशल देयके देण्यात न आलयाने या विहिरी पूर्ण होवून सिंचनक्षेत्र वाढूनही विहिरी अपूर्ण असल्याचे भिजत घोंगडे कायम आहे़माहूर तालुक्यात ६२ महसुली गावे व या गावांना जोडलेल्या ६० गावांपैकी फक्त ५४ गावांतील ७३६ शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान देण्यात आले़ यापैकी त्रुटीत ३०७ प्रगतीपथावर ५० अपूर्ण ६७७ तर ९ विहिरी पूर्ण झालेल्या आहेत़ यात अंजनखेड येथे-९, आष्टा-१९, आसोली-२६, बंजारा तांडा-१९, भगवती-९, भोरड- ७, बोंडगव्हाण-२, बोरवाडी-४२, चोरड-१२, दिगडी कुत्तेमार-३, दिगडी धानोरा-१०, ईवळेश्वर-२४, गोंडवडसा-७, गोकुळ गोंडेगाव-१०, गुंडवळ-१६, हडसणी-२०, हिंगणी-८, करंजी-५, कुपटी-२६, लखमापूर-२९, लांजी-३, लसनवाडी-२७, लिंबायत-५, लोकरवाडी-६, मच्छिंद्रपार्डी-५, मदनापूर-२१, मेंढकी-७, महादापूर-१०, मांडवा-१५,मेठ-११, मुंगश्ी-१३, मुरली-८, पाचुंदा-२६, पडसा-१, पानोळा-१९, पापलवाडी-१७, रूई-३, समीगुडा-६, रूपलानाईक-२०, रुपानाईकतांडा-११, साकूर-५, सेलू-११, शेकापूर-४, शेखफरीदवझरा-५, सिंदखेड-१६, टाकळी-२, तांदळा-२३, तुळश्ी-१६, उमरा-६, वडसा-३, वाईबाजार-१, वानोळा-२८, वसरामनाईक तांडा-१९, वायफनी-६ या गावांना विहिरी देण्यात आल्या आहेत़या विहिरीधारकांना १ लाख ८७ हजार रुपये अनुदान देण्याचे ठरलेले असताना यापैकी अनेकांना १ लाख रुपयापर्यंत अकुशल देयके देण्यात आली़ उर्वरित रक्कम कुशल या नावावर अडकवून ठेवण्यात आली आहे़ १५ कोटी रुपये देणे असताना फक्त ७ कोटी देण्यात आल्याची माहिती असून अधिकाऱ्यांच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना बसल्यास अस्मानी संकटात नुकसान होणार आहे़ परिणामी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नसून कारण दोन लाख रुपयांत विहीर होणे शक्य नसल्याने उर्वरित रक्कम मिळेल या आशेने प्रत्येक शेतकऱ्याने व्याजाने लाखो रुपये घेवून विहिरी पूर्ण केल्या आहेत़
मग्रारोह योजनेतील विहिरी अपूर्ण
By admin | Updated: June 19, 2014 00:19 IST