शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

तलावावर माफियांचा डोळा

By admin | Updated: June 3, 2014 01:09 IST

औरंगाबाद : ऐतिहासिक आमखास मैदानाच्या बाजूला असलेल्या कमल तलावावर काही भूखंड माफियांची वक्रदृष्टी पडली असून, मागील काही महिन्यांपासून तलावात भरती टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

औरंगाबाद : ऐतिहासिक आमखास मैदानाच्या बाजूला असलेल्या कमल तलावावर काही भूखंड माफियांची वक्रदृष्टी पडली असून, मागील काही महिन्यांपासून तलावात भरती टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वक्फ बोर्ड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रेकॉर्डवर कमल तलावाच्या नावावर जेवढी जमीन आहे, त्यातील अर्ध्या जागेवर अगोदरच अतिक्रमणे झाली आहेत. उर्वरित जागाही बळकावण्याचे काम सध्या सुरू आहे. कमल तलावाच्या बाजूला आरोग्य विभागाचे टी. बी. हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलला लागून कमल तलावाची तीन ते चार एकर जागा आहे. पावसाळ्यात तलावात थोड्या फार प्रमाणात पाणी साचते. तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असल्याने पूर्वीप्रमाणे पाणीही थांबत नाही. फार वर्षांपूर्वी तलावात फक्त कमळाचीच फुले दिसून येत असत. त्यामुळे या तलावाचे नाव कमल तलाव असे पडले होते. तलावाच्या समोरून ८० फूट रुंद रस्ता आरेफ हाऊसिंग सोसायटीकडे जातो. या रस्त्यावर २४ तास वाहनधारकांची आणि पादचार्‍यांची वर्दळ असते. मात्र, मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला कमल तलावाच्या बाजूने मातीची भरती आणून टाकण्यात येत आहे. ही भरती कधी आणि कोण टाकतो हे परिसरातील नागरिकांनाही माहीत नाही. या भरतीमुळे ऐतिहासिक तलावाचे अस्तित्वच नष्ट होत आहे. अलीकडे कमल तलावाच्या जागेवर हज हाऊस बांधण्यात यावे, असाही प्रस्ताव समोर आला होता. ही जागा कमी पडेल म्हणून हज हाऊसचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने हज हाऊससाठी किलेअर्क येथे जागा दिली. कमल तलावाची मनपाने डागडुजी करावी, अशी मागणी आरेफ हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन अय्युब खान यांनी केली आहे. मनपा, जिल्हाधिकारी कार्यालयाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तलाव काही दिवसांमध्ये गायब होईल. भूखंड माफिया भरती टाकून प्लॉटिंग करून मोकळे होतील. तलावाच्या बाजूला मनपाचे उद्यान गेले तळीरामांच्या ताब्यात; रात्री भरते मैफल मागील अनेक वर्षांमध्ये महापालिकेने या तलावाची साफसफाई केली नाही. त्यामुळे तलावात दुर्गंधी पसरलेली असते. अतिक्रमणामुळे तलावातील पाण्याला वाहण्यासाठी नैसर्गिक प्रवाहच नाही. महापालिकेने तलावाच्या बाजूला एक उद्यान उभारले आहे. या उद्यानात एकही नागरिक पाय ठेवत नाही. दिवसा आणि रात्री उद्यान तळीरामांच्या ताब्यात असते. लाखो रुपये खर्च करून मनपाने हे उद्यान कशासाठी बांधले, असा प्रश्न नागरिकांना पडतो.