शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

तलावावर माफियांचा डोळा

By admin | Updated: June 3, 2014 01:09 IST

औरंगाबाद : ऐतिहासिक आमखास मैदानाच्या बाजूला असलेल्या कमल तलावावर काही भूखंड माफियांची वक्रदृष्टी पडली असून, मागील काही महिन्यांपासून तलावात भरती टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

औरंगाबाद : ऐतिहासिक आमखास मैदानाच्या बाजूला असलेल्या कमल तलावावर काही भूखंड माफियांची वक्रदृष्टी पडली असून, मागील काही महिन्यांपासून तलावात भरती टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वक्फ बोर्ड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रेकॉर्डवर कमल तलावाच्या नावावर जेवढी जमीन आहे, त्यातील अर्ध्या जागेवर अगोदरच अतिक्रमणे झाली आहेत. उर्वरित जागाही बळकावण्याचे काम सध्या सुरू आहे. कमल तलावाच्या बाजूला आरोग्य विभागाचे टी. बी. हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलला लागून कमल तलावाची तीन ते चार एकर जागा आहे. पावसाळ्यात तलावात थोड्या फार प्रमाणात पाणी साचते. तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असल्याने पूर्वीप्रमाणे पाणीही थांबत नाही. फार वर्षांपूर्वी तलावात फक्त कमळाचीच फुले दिसून येत असत. त्यामुळे या तलावाचे नाव कमल तलाव असे पडले होते. तलावाच्या समोरून ८० फूट रुंद रस्ता आरेफ हाऊसिंग सोसायटीकडे जातो. या रस्त्यावर २४ तास वाहनधारकांची आणि पादचार्‍यांची वर्दळ असते. मात्र, मागील काही दिवसांपासून रस्त्याच्या कडेला कमल तलावाच्या बाजूने मातीची भरती आणून टाकण्यात येत आहे. ही भरती कधी आणि कोण टाकतो हे परिसरातील नागरिकांनाही माहीत नाही. या भरतीमुळे ऐतिहासिक तलावाचे अस्तित्वच नष्ट होत आहे. अलीकडे कमल तलावाच्या जागेवर हज हाऊस बांधण्यात यावे, असाही प्रस्ताव समोर आला होता. ही जागा कमी पडेल म्हणून हज हाऊसचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने हज हाऊससाठी किलेअर्क येथे जागा दिली. कमल तलावाची मनपाने डागडुजी करावी, अशी मागणी आरेफ हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन अय्युब खान यांनी केली आहे. मनपा, जिल्हाधिकारी कार्यालयाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तलाव काही दिवसांमध्ये गायब होईल. भूखंड माफिया भरती टाकून प्लॉटिंग करून मोकळे होतील. तलावाच्या बाजूला मनपाचे उद्यान गेले तळीरामांच्या ताब्यात; रात्री भरते मैफल मागील अनेक वर्षांमध्ये महापालिकेने या तलावाची साफसफाई केली नाही. त्यामुळे तलावात दुर्गंधी पसरलेली असते. अतिक्रमणामुळे तलावातील पाण्याला वाहण्यासाठी नैसर्गिक प्रवाहच नाही. महापालिकेने तलावाच्या बाजूला एक उद्यान उभारले आहे. या उद्यानात एकही नागरिक पाय ठेवत नाही. दिवसा आणि रात्री उद्यान तळीरामांच्या ताब्यात असते. लाखो रुपये खर्च करून मनपाने हे उद्यान कशासाठी बांधले, असा प्रश्न नागरिकांना पडतो.