शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

‘मेड इन औरंगाबाद’ची जपानभरारी!

By गजानन दिवाण | Updated: November 23, 2017 11:10 IST

औरंगाबाद : जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. त्यामुळे भारतातील दिग्गज कंपन्यादेखील सॉफ्टवेअर उत्पादने तेथूनच आयात करतात. हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न औरंगाबाद शहराने केला असून, मराठमोळ्या तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर उत्पादने लवकरच जपानच्या बाजारात दिसणार आहेत.

ठळक मुद्देसॉफ्टवेअर उत्पादनात मराठी पाऊल

गजानन दिवाणऔरंगाबाद : जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. त्यामुळे भारतातील दिग्गज कंपन्यादेखील सॉफ्टवेअर उत्पादने तेथूनच आयात करतात. हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न औरंगाबाद शहराने केला असून, मराठमोळ्या तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर उत्पादने लवकरच जपानच्या बाजारात दिसणार आहेत. यासंदर्भात औरंगाबादेतील ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’ या कंपनीने अलीकडेच सॉफ्टबँक या जपानी कंपनीशी करार केला आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आनंद माहूरकर या तरुणाने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आपली बलस्थाने हेरून २०१० साली या कंपनीची स्थापना केली. अमेरिकेतील बोस्टनमध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. मराठी मातीशी नाळ जोडल्या गेलेल्या माहूरकर यांनी त्याचवर्षी या कंपनीचे सातासमुद्रापार औरंगाबादेतही एक कार्यालय सुरू केले. हीच कंपनी आता मराठवाड्यातील मराठी तरुणांनी निर्माण केलेली सॉफ्टवेअर उत्पादने जपानला निर्यात करणार आहे.

आनंद यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अंबाजोगाईत झाले. आई-वडील दोघेही शिक्षक. बारावीला गुणवत्ता यादीत आल्याने औरंगाबादेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. घरात नोकरीचेच वातावरण असल्याने पुढे पुण्यात एका कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून नोकरी केली. ती करीत असताना त्यांनी संगणकाचे ज्ञान घेतले. पुण्यात मन न रमल्याने परत औरंगाबादेत येऊन एका कंपनीत नोकरी केली. मेकॅनिकल इंजिनिअरमधील सॉफ्टवेअर अभियंत्याचे गुण हेरून त्यांना मुंबईला एका विशेष प्रकल्पावर पाठविण्यात आले. तेथेही न रमलेल्या आनंद यांनी १९९९ साली पुन्हा पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी सुरु केली. नंतर मुंबईतील एका कंपनीच्या माध्यमातून थेट अमेरिका गाठली. त्या कंपनीचा व्यवसाय २५ कोटींवरुन ३५० कोटींवर नेला. अगदी नवीन ब्रॅण्ड असलेल्या कंपनीच्या मालकाला आपण कोट्यवधी रुपये मिळवून देऊ शकतो, तर आपणच तो व्यवसाय करून अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न का सोडवू शकत नाही, या विचारातून त्यांनी २०१० साली ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’ कंपनीची स्थापना केली. एकही पैशाची गुंतवणूक नाही. केवळ आयडिया हीच त्यांची गुंतवणूक. सॉफ्टवेअरमधील कुठलीही डिग्री वा सर्टिफिकेट कोर्स नाही.

केवळ अनुभवाच्या जोरावर ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रात जगभरातील दिग्गजांच्या यादीत त्यांचे नाव पहिल्या काहींमध्ये घेतले जाते. हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? आपण कुठले कपडे घालायला पाहिजे, कुठली फॅशन आपल्याला सूट करते, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कुठल्याही माणसाची गरज यापुढे राहणार नाही. तुमची पर्सनॅलिटी, तुमचे विचार याचा अभ्यास करून कॉम्पुटरच तुम्हाला हे सांगेल. साधारण न पटणारीच ही गोष्ट. देशभरातून आलेल्या जवळपास ४० प्रतिनिधींसमोर गुरुवारी आणि शुक्रवारी औरंगाबादेत या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा डेमो दाखविला जाणार आहे. लवकरच अशी अनेक सॉफ्टवेअर उत्पादने औरंगाबादेत तयार केली जातील आणि भारतासह जगभराला ती पुरविली जातील, अशी माहिती ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

त्याची सुरुवात जपानपासून झाली आहे. सॉफ्ट बँक नावाच्या जपानी कंपनीने आपल्या कंपनीत ५० कोटींची गुंतवणूक केली. भारतात आपल्या एकमेव कंपनीशी त्यांनी जॉइंट व्हेंचर केले आहे. औरंगाबादेत आपण जी टेक्नॉलॉजी डेव्हलप करू ती जपानमध्ये नेऊन ते विकतील. तिथे आपण त्यांना कंपनीचा ५१ टक्के भाग दिला आहे. तेथे मार्केटची पूर्ण जबाबदारी त्यांचीच असेल, असे माहूरकर यांनी सांगितले.तरुणांना प्रशिक्षणऔरंगाबादेतील एमआयटी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जेएनईसीच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. स्किल डेव्हलपेमेंट केले जाईल. याच तरुणांना पुढे आपल्या कंपनीत सामावून घेतले जाईल. भविष्यात याच मराठी तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर उत्पादने जगभरात निर्यात केली जातील.-आनंद माहूरकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस.....................