शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

‘मेड इन औरंगाबाद’ची जपानभरारी!

By गजानन दिवाण | Updated: November 23, 2017 11:10 IST

औरंगाबाद : जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. त्यामुळे भारतातील दिग्गज कंपन्यादेखील सॉफ्टवेअर उत्पादने तेथूनच आयात करतात. हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न औरंगाबाद शहराने केला असून, मराठमोळ्या तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर उत्पादने लवकरच जपानच्या बाजारात दिसणार आहेत.

ठळक मुद्देसॉफ्टवेअर उत्पादनात मराठी पाऊल

गजानन दिवाणऔरंगाबाद : जगभरात सॉफ्टवेअर उत्पादनात दबदबा अमेरिकेचा. त्यामुळे भारतातील दिग्गज कंपन्यादेखील सॉफ्टवेअर उत्पादने तेथूनच आयात करतात. हा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न औरंगाबाद शहराने केला असून, मराठमोळ्या तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर उत्पादने लवकरच जपानच्या बाजारात दिसणार आहेत. यासंदर्भात औरंगाबादेतील ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’ या कंपनीने अलीकडेच सॉफ्टबँक या जपानी कंपनीशी करार केला आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आनंद माहूरकर या तरुणाने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून आपली बलस्थाने हेरून २०१० साली या कंपनीची स्थापना केली. अमेरिकेतील बोस्टनमध्ये या कंपनीचे मुख्यालय आहे. मराठी मातीशी नाळ जोडल्या गेलेल्या माहूरकर यांनी त्याचवर्षी या कंपनीचे सातासमुद्रापार औरंगाबादेतही एक कार्यालय सुरू केले. हीच कंपनी आता मराठवाड्यातील मराठी तरुणांनी निर्माण केलेली सॉफ्टवेअर उत्पादने जपानला निर्यात करणार आहे.

आनंद यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अंबाजोगाईत झाले. आई-वडील दोघेही शिक्षक. बारावीला गुणवत्ता यादीत आल्याने औरंगाबादेत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. घरात नोकरीचेच वातावरण असल्याने पुढे पुण्यात एका कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून नोकरी केली. ती करीत असताना त्यांनी संगणकाचे ज्ञान घेतले. पुण्यात मन न रमल्याने परत औरंगाबादेत येऊन एका कंपनीत नोकरी केली. मेकॅनिकल इंजिनिअरमधील सॉफ्टवेअर अभियंत्याचे गुण हेरून त्यांना मुंबईला एका विशेष प्रकल्पावर पाठविण्यात आले. तेथेही न रमलेल्या आनंद यांनी १९९९ साली पुन्हा पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी सुरु केली. नंतर मुंबईतील एका कंपनीच्या माध्यमातून थेट अमेरिका गाठली. त्या कंपनीचा व्यवसाय २५ कोटींवरुन ३५० कोटींवर नेला. अगदी नवीन ब्रॅण्ड असलेल्या कंपनीच्या मालकाला आपण कोट्यवधी रुपये मिळवून देऊ शकतो, तर आपणच तो व्यवसाय करून अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न का सोडवू शकत नाही, या विचारातून त्यांनी २०१० साली ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’ कंपनीची स्थापना केली. एकही पैशाची गुंतवणूक नाही. केवळ आयडिया हीच त्यांची गुंतवणूक. सॉफ्टवेअरमधील कुठलीही डिग्री वा सर्टिफिकेट कोर्स नाही.

केवळ अनुभवाच्या जोरावर ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रात जगभरातील दिग्गजांच्या यादीत त्यांचे नाव पहिल्या काहींमध्ये घेतले जाते. हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? आपण कुठले कपडे घालायला पाहिजे, कुठली फॅशन आपल्याला सूट करते, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी कुठल्याही माणसाची गरज यापुढे राहणार नाही. तुमची पर्सनॅलिटी, तुमचे विचार याचा अभ्यास करून कॉम्पुटरच तुम्हाला हे सांगेल. साधारण न पटणारीच ही गोष्ट. देशभरातून आलेल्या जवळपास ४० प्रतिनिधींसमोर गुरुवारी आणि शुक्रवारी औरंगाबादेत या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा डेमो दाखविला जाणार आहे. लवकरच अशी अनेक सॉफ्टवेअर उत्पादने औरंगाबादेत तयार केली जातील आणि भारतासह जगभराला ती पुरविली जातील, अशी माहिती ‘फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहूरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

त्याची सुरुवात जपानपासून झाली आहे. सॉफ्ट बँक नावाच्या जपानी कंपनीने आपल्या कंपनीत ५० कोटींची गुंतवणूक केली. भारतात आपल्या एकमेव कंपनीशी त्यांनी जॉइंट व्हेंचर केले आहे. औरंगाबादेत आपण जी टेक्नॉलॉजी डेव्हलप करू ती जपानमध्ये नेऊन ते विकतील. तिथे आपण त्यांना कंपनीचा ५१ टक्के भाग दिला आहे. तेथे मार्केटची पूर्ण जबाबदारी त्यांचीच असेल, असे माहूरकर यांनी सांगितले.तरुणांना प्रशिक्षणऔरंगाबादेतील एमआयटी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि जेएनईसीच्या माध्यमातून अभियांत्रिकीच्या तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल. स्किल डेव्हलपेमेंट केले जाईल. याच तरुणांना पुढे आपल्या कंपनीत सामावून घेतले जाईल. भविष्यात याच मराठी तरुणांनी तयार केलेली सॉफ्टवेअर उत्पादने जगभरात निर्यात केली जातील.-आनंद माहूरकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,फाइंड अ‍ॅबिलिटि सायन्सेस.....................