शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
4
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
5
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
6
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
7
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
8
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
9
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
10
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
11
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
12
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
13
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
14
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
15
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
16
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
17
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
18
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
19
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
20
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार

म. बसवेश्वरांनी बाराव्या शतकात लोकशाहीची संकल्पना मांडली

By admin | Updated: April 16, 2017 23:11 IST

लातूर : भारताच्या इतिहासात बाराव्या शतकात परिवर्तनाचे वारे वाहिले. याच शतकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून समाजात स्त्री-पुरुष समानता प्रचलित केली.

लातूर : भारताच्या इतिहासात बाराव्या शतकात परिवर्तनाचे वारे वाहिले. याच शतकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून समाजात स्त्री-पुरुष समानता प्रचलित केली. लोकशाहीची संकल्पना प्रत्यक्षात त्यांनीच मांडली, असे मत माजी खा.डॉ. जनार्दन वाघमारे यांनी येथे व्यक्त केले. कस्तुराई मंगल कार्यालयात सातव्या मराठी शरण साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ‘मानवतावादी बसवेश्वर आणि इतर राष्ट्रीय संत’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. प्रा. भीमराव पाटील, डॉ. विशाल लिंगायत, डॉ. विजयकुमार करजकर यांचाही सहभाग होता. यावेळी डॉ. वाघमारे यांनी, भगवान बुद्ध, महावीर यांच्यासह बाराव्या शतकातील अनेक राष्ट्रीय संतांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. कार्याची पद्धती वेगवेगळी असली, तरी संतांचे विचार समाजजागृतीसाठी बहुमूल्य असल्याचे ते म्हणाले. महात्मा बसवेश्वरांचा काळ जाऊन हजारो वर्षे उलटली. मात्र त्यांचे विचार, वचने आजही प्रेरणा देण्याचे कार्य करतात. शब्द आणि विचारांचा आविष्कार म्हणजे साहित्य. ज्ञान असल्याशिवाय स्वयंप्रकाशित होता येत नाही, अशा आशयाचे विचार सर्वच तत्कालीन महापुरुषांनी मांडले आहेत. बाराव्या शतकात परिवर्तनाचे वारे वाहिले असले तरी त्याकाळी सामान्यांना स्वातंत्र्य नव्हते. धर्म माहीत नव्हता. शरण साहित्य बहुजनांचे तर दलित साहित्यात नकार, निषेध, विद्रोह आढळून येतो. अशाच प्रकारचा विरोध शरण साहित्यातही आढळतो. आपल्या समाजात धर्माला विरोध नसतो. धर्माच्या नावावर होणाऱ्या वाईट गोष्टींना विरोध होत असतो. महात्मा बसवेश्वरांना मंदिर संकल्पना मान्य नव्हती. महावीर, बुद्धांनी ईश्वरच नाकारला, असेही डॉ. वाघमारे म्हणाले. समानतेची शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिली असल्याचे यावेळी प्रा. भीमराव पाटील, डॉ. करजकर, डॉ. विशाल लिंगायत म्हणाले. (प्रतिनिधी)