शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

म. बसवेश्वरांनी बाराव्या शतकात लोकशाहीची संकल्पना मांडली

By admin | Updated: April 16, 2017 23:11 IST

लातूर : भारताच्या इतिहासात बाराव्या शतकात परिवर्तनाचे वारे वाहिले. याच शतकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून समाजात स्त्री-पुरुष समानता प्रचलित केली.

लातूर : भारताच्या इतिहासात बाराव्या शतकात परिवर्तनाचे वारे वाहिले. याच शतकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून समाजात स्त्री-पुरुष समानता प्रचलित केली. लोकशाहीची संकल्पना प्रत्यक्षात त्यांनीच मांडली, असे मत माजी खा.डॉ. जनार्दन वाघमारे यांनी येथे व्यक्त केले. कस्तुराई मंगल कार्यालयात सातव्या मराठी शरण साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ‘मानवतावादी बसवेश्वर आणि इतर राष्ट्रीय संत’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. प्रा. भीमराव पाटील, डॉ. विशाल लिंगायत, डॉ. विजयकुमार करजकर यांचाही सहभाग होता. यावेळी डॉ. वाघमारे यांनी, भगवान बुद्ध, महावीर यांच्यासह बाराव्या शतकातील अनेक राष्ट्रीय संतांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. कार्याची पद्धती वेगवेगळी असली, तरी संतांचे विचार समाजजागृतीसाठी बहुमूल्य असल्याचे ते म्हणाले. महात्मा बसवेश्वरांचा काळ जाऊन हजारो वर्षे उलटली. मात्र त्यांचे विचार, वचने आजही प्रेरणा देण्याचे कार्य करतात. शब्द आणि विचारांचा आविष्कार म्हणजे साहित्य. ज्ञान असल्याशिवाय स्वयंप्रकाशित होता येत नाही, अशा आशयाचे विचार सर्वच तत्कालीन महापुरुषांनी मांडले आहेत. बाराव्या शतकात परिवर्तनाचे वारे वाहिले असले तरी त्याकाळी सामान्यांना स्वातंत्र्य नव्हते. धर्म माहीत नव्हता. शरण साहित्य बहुजनांचे तर दलित साहित्यात नकार, निषेध, विद्रोह आढळून येतो. अशाच प्रकारचा विरोध शरण साहित्यातही आढळतो. आपल्या समाजात धर्माला विरोध नसतो. धर्माच्या नावावर होणाऱ्या वाईट गोष्टींना विरोध होत असतो. महात्मा बसवेश्वरांना मंदिर संकल्पना मान्य नव्हती. महावीर, बुद्धांनी ईश्वरच नाकारला, असेही डॉ. वाघमारे म्हणाले. समानतेची शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिली असल्याचे यावेळी प्रा. भीमराव पाटील, डॉ. करजकर, डॉ. विशाल लिंगायत म्हणाले. (प्रतिनिधी)