शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

म. बसवेश्वरांनी बाराव्या शतकात लोकशाहीची संकल्पना मांडली

By admin | Updated: April 16, 2017 23:11 IST

लातूर : भारताच्या इतिहासात बाराव्या शतकात परिवर्तनाचे वारे वाहिले. याच शतकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून समाजात स्त्री-पुरुष समानता प्रचलित केली.

लातूर : भारताच्या इतिहासात बाराव्या शतकात परिवर्तनाचे वारे वाहिले. याच शतकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून समाजात स्त्री-पुरुष समानता प्रचलित केली. लोकशाहीची संकल्पना प्रत्यक्षात त्यांनीच मांडली, असे मत माजी खा.डॉ. जनार्दन वाघमारे यांनी येथे व्यक्त केले. कस्तुराई मंगल कार्यालयात सातव्या मराठी शरण साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ‘मानवतावादी बसवेश्वर आणि इतर राष्ट्रीय संत’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. प्रा. भीमराव पाटील, डॉ. विशाल लिंगायत, डॉ. विजयकुमार करजकर यांचाही सहभाग होता. यावेळी डॉ. वाघमारे यांनी, भगवान बुद्ध, महावीर यांच्यासह बाराव्या शतकातील अनेक राष्ट्रीय संतांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. कार्याची पद्धती वेगवेगळी असली, तरी संतांचे विचार समाजजागृतीसाठी बहुमूल्य असल्याचे ते म्हणाले. महात्मा बसवेश्वरांचा काळ जाऊन हजारो वर्षे उलटली. मात्र त्यांचे विचार, वचने आजही प्रेरणा देण्याचे कार्य करतात. शब्द आणि विचारांचा आविष्कार म्हणजे साहित्य. ज्ञान असल्याशिवाय स्वयंप्रकाशित होता येत नाही, अशा आशयाचे विचार सर्वच तत्कालीन महापुरुषांनी मांडले आहेत. बाराव्या शतकात परिवर्तनाचे वारे वाहिले असले तरी त्याकाळी सामान्यांना स्वातंत्र्य नव्हते. धर्म माहीत नव्हता. शरण साहित्य बहुजनांचे तर दलित साहित्यात नकार, निषेध, विद्रोह आढळून येतो. अशाच प्रकारचा विरोध शरण साहित्यातही आढळतो. आपल्या समाजात धर्माला विरोध नसतो. धर्माच्या नावावर होणाऱ्या वाईट गोष्टींना विरोध होत असतो. महात्मा बसवेश्वरांना मंदिर संकल्पना मान्य नव्हती. महावीर, बुद्धांनी ईश्वरच नाकारला, असेही डॉ. वाघमारे म्हणाले. समानतेची शिकवण महात्मा बसवेश्वरांनी दिली असल्याचे यावेळी प्रा. भीमराव पाटील, डॉ. करजकर, डॉ. विशाल लिंगायत म्हणाले. (प्रतिनिधी)