शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मारहाण करून दागिने लंपास

By admin | Updated: January 7, 2017 00:09 IST

लातूर : अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील तीन महिलांना वाटेत अडवून मारहाण करीत चौघांनी दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

लातूर : अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील तीन महिलांना वाटेत अडवून मारहाण करीत चौघांनी दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील अहिल्याबाई चाटे, गिरिजाबाई चाटे, अंजनाबाई चाटे या महिला केंद्रेवाडी शिवारातून सोनखेड-मानखेडकडे जाणाऱ्या रस्त्याने आपल्या शेताकडे जात होत्या. दरम्यान, केंद्रेवाडी शिवारात अंकुश चामे, लहू चामे, अक्षय चामे आणि मधुबाला चामे (सर्व रा. चिखली) यांनी रस्त्यात अडवून या तीन महिलांना जबर मारहाण केली. या मारहाणीत महिलेचे डोके फोडले. गळ्यातील सहा ग्रॅमच्या सोन्याची पोत हिसकावून पळविले. घाबरलेल्या महिलांनी या घटनेची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. या प्रकरणी राजेंद्र भानुदास चाटे (रा. चिखली) यांच्या फिर्यादीवरून अंकुश चामे यांच्यासह अन्य तिघाविरोधात किनगाव पोलीस ठाण्यात कलम १४३, १४७, १४८, ३४१, ३२७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास किनगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दशरथ तलेदवार हे करीत आहेत. महिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे चिखली परिसरात खळबळ उडाली आहे.