शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पाणी पातळीने गाठला निचांक

By admin | Updated: December 10, 2014 00:41 IST

राजेश खराडे, बीड जिल्ह्यावर पाणी व धान्य टंचाईचे सावट असल्याचे सर्वश्रुत असतानाच आता मागील पाच वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच भूजलाने निचांकी गाठली असल्याची धक्कादायक

राजेश खराडे, बीडजिल्ह्यावर पाणी व धान्य टंचाईचे सावट असल्याचे सर्वश्रुत असतानाच आता मागील पाच वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच भूजलाने निचांकी गाठली असल्याची धक्कादायक बाब जिल्हा सर्व्हेक्षण कार्यालयाने केलेल्या पहाणीतून समोर आली आहे. उंबऱ्यावर येऊन ठेपलेला दुष्काळ नागरिकांचा घसा कोरडा करणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. जून महिन्यात पडणारा पाऊस उशीरा सुरु झाला. त्यामुळे पेरण्या रखडल्या. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लावलेली पीक वाया गेले. काही शेतकऱ्यांनी पाऊस पडले या आशेवर पुन्हा पेरण्या केल्या. मात्र पावसाने आॅगस्ट महिन्यात डोकेवर काढले. जवळपास दोन ते अडीच महिने पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणी पातळी खालावली होती. आॅगस्ट महिन्या झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पाणी होते. जिल्हा भुजल सर्व्हेक्षण कार्यालयाने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये पाणी पातळी मायनस म्हणजेच समान पाणी पातळीच्या खाली गेली आहे. वडवणी तालुका वगळता दहा तालुक्याची पाणी पातळी -१ व -० च्या खाली गेली असल्याची बाब समोर आली आहे. पावसामध्ये सातत्य न राहिल्याने २०१२ सालानंतर प्रथमच जिल्ह्यातील विहीरींची भुजल पातळी मायनस मध्ये गेली आहे. पाण्यची पातळीचे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्ह्यातून १२६ विहीरींची निवड करण्यात आली होती. वडवणी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने येथील भुजल पातळी ही प्लसमध्ये आहे इतर सर्वच तालुक्यातील पाण्याची पातळी खालवल्याने पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. गतवर्षीच्या तुलनेत दोन ते तीन मीटरने पाण्याची पातळी खालावली आहे. पाणी पातळी खालावली असल्याने पुढील काळात जमिनितून पाण्याचा स्त्रोत उपलब्ध राहिलच याची शाश्वती आता तरी देता येणार नाही. नदी, तलाव, बंधारे यांच्या काठची गावे किंवा शिवार वगाळता इतर ठिकाणी बोअर व जमिनीतून पाणी मिळेल की नाही हे सांगता येणे कठीण आहे. जमिनीतून पाणी निघाले नाही परिस्थिती आणखिनच गंभीर होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी बोअर व विहिरीचे पाणी जपुन वापरणे हा एकमेव पर्याय आहे. पिके उगवली पण वाढ खुंटलीशेतकऱ्यांवरील संकाटाची मालिका संपता संपेना झाली आहे. चार महिन्यांच्या पावसाळ्यात जवळपास पंचवीस दिवस पाऊस पडला. याच पावसावर जिल्ह्यात रबीची ५० टक्के पेरणी झाली आहे. मात्र जमिनीत ओलावा नसल्याने या हंगामातील सर्वंच पिकांची वाढ खुंटली आहे. दरम्यान, रब्बी हंगामातील पिके ऐन जोमात असतानाच गारपीटीने सर्व पिके भुईसपाट करत शेतकऱ्यांच्या हात तोंडाला आलेला घास हिरावून घेतला. समाधानकारक पाऊस न झाल्याने सबंध मराठवाड्यातील शेतकरी चिंतातूर होता. यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्या जोरावर जिल्ह्यात रबी हंगामातील पिकांचा पेरा झाला खरा परंतु पिकांना पाणी मिळत नसल्याने ही पिके करपू लागली आहेत. गतवर्षी जिल्ह्यात डिसेंबर अखेर सरासरी क्षेत्रांपैकी २ लाख ५४ हजार हेक्टरवर रबी हंगामातील पिकांची पेरणी झाली होती. पर्जन्यमानही शंभर टक्क्याच्या जवळपास असल्याने रबी हंगामातील बहुतांशी सर्वच पिके शेतकऱ्यांच्या हाती लागली होती. यंदा पर्जन्यमान ५० टक्क्यांनी घटले आहे. तरीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे १लाख ९६ हजार ४०० हेक्टरवर रबीची पेरणी केलेली आहे. पावसाळ्यातील पाणीसाठ्याच्या जोरावरच रबी हंगाम जोपासला जातो. मात्र भुजल पातळी खलावली आहे. जिल्ह्यातील वडवणी वगळता इतर तालुक्यात भुजल पातळी ही मायनस मध्ये आहे. त्यामुळे पिके जोपासायची कशी असवा सवाल उपस्थित होत आहे. रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मका, करडई, जवस, सुर्यफूल, तीळ आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र उत्पादन क्षेत्रात सर्वच पिकांत घट झाली असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याअखेर रब्बी हंगामातील पेरणी संपुष्टात आलेली असते. यामध्ये ज्वारी या प्रमुख पिकाची पेरणी सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ३४ हजार पैंकी १ लाख ४० हजार हेक्टरवर करण्यात आली आहे. रबीची पेरणी समाधानकारक झाली असली तरी पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने रबीच्या सर्वच पिकांवर धोक्याची घंटा वाजत आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने शेतीसंबंधीचे सर्वच प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ऐन पावसाळ्यातही चाऱ्यासाठी भटकंती करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. हिरवा चारा तर दुरापास्त झाला आहे तर कडब्याचे दर गगनाला भिडले आहेत. कडबा २७०० ते ३००० शेकड्याचा घरात पोहचला आहे. त्यामुळे शेतकरी चारा व पाणी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.