शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पातळीने गाठला निचांक

By admin | Updated: December 10, 2014 00:41 IST

राजेश खराडे, बीड जिल्ह्यावर पाणी व धान्य टंचाईचे सावट असल्याचे सर्वश्रुत असतानाच आता मागील पाच वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच भूजलाने निचांकी गाठली असल्याची धक्कादायक

राजेश खराडे, बीडजिल्ह्यावर पाणी व धान्य टंचाईचे सावट असल्याचे सर्वश्रुत असतानाच आता मागील पाच वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच भूजलाने निचांकी गाठली असल्याची धक्कादायक बाब जिल्हा सर्व्हेक्षण कार्यालयाने केलेल्या पहाणीतून समोर आली आहे. उंबऱ्यावर येऊन ठेपलेला दुष्काळ नागरिकांचा घसा कोरडा करणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. जून महिन्यात पडणारा पाऊस उशीरा सुरु झाला. त्यामुळे पेरण्या रखडल्या. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लावलेली पीक वाया गेले. काही शेतकऱ्यांनी पाऊस पडले या आशेवर पुन्हा पेरण्या केल्या. मात्र पावसाने आॅगस्ट महिन्यात डोकेवर काढले. जवळपास दोन ते अडीच महिने पाऊस झाला नाही. त्यामुळे पाणी पातळी खालावली होती. आॅगस्ट महिन्या झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात पाणी होते. जिल्हा भुजल सर्व्हेक्षण कार्यालयाने नुकत्याच केलेल्या सर्व्हेमध्ये पाणी पातळी मायनस म्हणजेच समान पाणी पातळीच्या खाली गेली आहे. वडवणी तालुका वगळता दहा तालुक्याची पाणी पातळी -१ व -० च्या खाली गेली असल्याची बाब समोर आली आहे. पावसामध्ये सातत्य न राहिल्याने २०१२ सालानंतर प्रथमच जिल्ह्यातील विहीरींची भुजल पातळी मायनस मध्ये गेली आहे. पाण्यची पातळीचे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्ह्यातून १२६ विहीरींची निवड करण्यात आली होती. वडवणी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने येथील भुजल पातळी ही प्लसमध्ये आहे इतर सर्वच तालुक्यातील पाण्याची पातळी खालवल्याने पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. गतवर्षीच्या तुलनेत दोन ते तीन मीटरने पाण्याची पातळी खालावली आहे. पाणी पातळी खालावली असल्याने पुढील काळात जमिनितून पाण्याचा स्त्रोत उपलब्ध राहिलच याची शाश्वती आता तरी देता येणार नाही. नदी, तलाव, बंधारे यांच्या काठची गावे किंवा शिवार वगाळता इतर ठिकाणी बोअर व जमिनीतून पाणी मिळेल की नाही हे सांगता येणे कठीण आहे. जमिनीतून पाणी निघाले नाही परिस्थिती आणखिनच गंभीर होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी बोअर व विहिरीचे पाणी जपुन वापरणे हा एकमेव पर्याय आहे. पिके उगवली पण वाढ खुंटलीशेतकऱ्यांवरील संकाटाची मालिका संपता संपेना झाली आहे. चार महिन्यांच्या पावसाळ्यात जवळपास पंचवीस दिवस पाऊस पडला. याच पावसावर जिल्ह्यात रबीची ५० टक्के पेरणी झाली आहे. मात्र जमिनीत ओलावा नसल्याने या हंगामातील सर्वंच पिकांची वाढ खुंटली आहे. दरम्यान, रब्बी हंगामातील पिके ऐन जोमात असतानाच गारपीटीने सर्व पिके भुईसपाट करत शेतकऱ्यांच्या हात तोंडाला आलेला घास हिरावून घेतला. समाधानकारक पाऊस न झाल्याने सबंध मराठवाड्यातील शेतकरी चिंतातूर होता. यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्या जोरावर जिल्ह्यात रबी हंगामातील पिकांचा पेरा झाला खरा परंतु पिकांना पाणी मिळत नसल्याने ही पिके करपू लागली आहेत. गतवर्षी जिल्ह्यात डिसेंबर अखेर सरासरी क्षेत्रांपैकी २ लाख ५४ हजार हेक्टरवर रबी हंगामातील पिकांची पेरणी झाली होती. पर्जन्यमानही शंभर टक्क्याच्या जवळपास असल्याने रबी हंगामातील बहुतांशी सर्वच पिके शेतकऱ्यांच्या हाती लागली होती. यंदा पर्जन्यमान ५० टक्क्यांनी घटले आहे. तरीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे १लाख ९६ हजार ४०० हेक्टरवर रबीची पेरणी केलेली आहे. पावसाळ्यातील पाणीसाठ्याच्या जोरावरच रबी हंगाम जोपासला जातो. मात्र भुजल पातळी खलावली आहे. जिल्ह्यातील वडवणी वगळता इतर तालुक्यात भुजल पातळी ही मायनस मध्ये आहे. त्यामुळे पिके जोपासायची कशी असवा सवाल उपस्थित होत आहे. रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, मका, करडई, जवस, सुर्यफूल, तीळ आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र उत्पादन क्षेत्रात सर्वच पिकांत घट झाली असल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याअखेर रब्बी हंगामातील पेरणी संपुष्टात आलेली असते. यामध्ये ज्वारी या प्रमुख पिकाची पेरणी सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ३४ हजार पैंकी १ लाख ४० हजार हेक्टरवर करण्यात आली आहे. रबीची पेरणी समाधानकारक झाली असली तरी पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने रबीच्या सर्वच पिकांवर धोक्याची घंटा वाजत आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने शेतीसंबंधीचे सर्वच प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ऐन पावसाळ्यातही चाऱ्यासाठी भटकंती करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. हिरवा चारा तर दुरापास्त झाला आहे तर कडब्याचे दर गगनाला भिडले आहेत. कडबा २७०० ते ३००० शेकड्याचा घरात पोहचला आहे. त्यामुळे शेतकरी चारा व पाणी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.