शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

सावकारी पाश आवळतोय...!

By admin | Updated: May 30, 2017 00:36 IST

जालना : नापिकी, कर्ज देताना बँकांकडून होणारी अडवणूक आणि खासगी सावकारांचा वाढता तगादा यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यात विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा सुरू आहे, तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी विविध योजना राबवित असल्याचे सांगण्यासाठी शिवार संवाद अभियान राबवित आहे. मात्र, राजकीय चिखलफेकित शेतकऱ्यांच्या मूळ समस्या दुर्लक्षित होत आहे. नापिकी, कर्ज देताना बँकांकडून होणारी अडवणूक आणि खासगी सावकारांचा वाढता तगादा यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. गत तीन वर्षांत तब्बल १९२ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ येथील सुनील अण्णासाहेब रणपिसे या तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.तीन वर्षांत जालना जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून समोर येत आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालास न मिळणारा भाव, बँकांचे वेळकाढून धोरण आणि खाजगी सावकाराचा घट्ट होत असलेला विळखा यामुळे तीन वर्षांत तब्बल १९२ शेतकऱ्यांनी विषारी द्रव प्राशन करून किंवा गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. यातील वीस शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळालेली नाही. तर २०१७ मध्ये आत्महत्या केलेल्या १२ शेतकऱ्यांच्या मृत्यूचा रासायनिक परीक्षण अहवाल प्राप्त न झाल्याने ते शासकीय मदतीपासून अद्याप वंचित आहेत. कर्ज फेडल्यानंतरही जमिनीचा ताबा न सोडणाऱ्या सावकाराच्या जाचास कंटाळून मंठा तालुक्यातील हेलस येथील लक्ष्मीबाई विठ्ठल खराबे (४५) यांनी विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. या प्रकरणी संशयितांवर गुन्हाही दाखल झाला. या घटनेने सावकराचा फास किती शेतकऱ्यांवर आवळला जातोय, हे अधोरेखित होते. जिल्ह्यात आजही अनेक शेतकऱ्यांची फसवणूक हे सावकार करीत आहेत. कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेली जमीन खरेदी केली जात असून, कर्जाची परतफेड करू न शकलेल्या अनेकांच्या जमिनी बळकवण्याचे प्रकार सुरू आहेत.