शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

सावकारी पाश आवळतोय...!

By admin | Updated: May 30, 2017 00:36 IST

जालना : नापिकी, कर्ज देताना बँकांकडून होणारी अडवणूक आणि खासगी सावकारांचा वाढता तगादा यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यात विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा सुरू आहे, तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी विविध योजना राबवित असल्याचे सांगण्यासाठी शिवार संवाद अभियान राबवित आहे. मात्र, राजकीय चिखलफेकित शेतकऱ्यांच्या मूळ समस्या दुर्लक्षित होत आहे. नापिकी, कर्ज देताना बँकांकडून होणारी अडवणूक आणि खासगी सावकारांचा वाढता तगादा यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. गत तीन वर्षांत तब्बल १९२ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ येथील सुनील अण्णासाहेब रणपिसे या तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.तीन वर्षांत जालना जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून समोर येत आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालास न मिळणारा भाव, बँकांचे वेळकाढून धोरण आणि खाजगी सावकाराचा घट्ट होत असलेला विळखा यामुळे तीन वर्षांत तब्बल १९२ शेतकऱ्यांनी विषारी द्रव प्राशन करून किंवा गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. यातील वीस शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळालेली नाही. तर २०१७ मध्ये आत्महत्या केलेल्या १२ शेतकऱ्यांच्या मृत्यूचा रासायनिक परीक्षण अहवाल प्राप्त न झाल्याने ते शासकीय मदतीपासून अद्याप वंचित आहेत. कर्ज फेडल्यानंतरही जमिनीचा ताबा न सोडणाऱ्या सावकाराच्या जाचास कंटाळून मंठा तालुक्यातील हेलस येथील लक्ष्मीबाई विठ्ठल खराबे (४५) यांनी विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. या प्रकरणी संशयितांवर गुन्हाही दाखल झाला. या घटनेने सावकराचा फास किती शेतकऱ्यांवर आवळला जातोय, हे अधोरेखित होते. जिल्ह्यात आजही अनेक शेतकऱ्यांची फसवणूक हे सावकार करीत आहेत. कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेली जमीन खरेदी केली जात असून, कर्जाची परतफेड करू न शकलेल्या अनेकांच्या जमिनी बळकवण्याचे प्रकार सुरू आहेत.