शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी पाश आवळतोय...!

By admin | Updated: May 30, 2017 00:36 IST

जालना : नापिकी, कर्ज देताना बँकांकडून होणारी अडवणूक आणि खासगी सावकारांचा वाढता तगादा यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यात विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा सुरू आहे, तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी विविध योजना राबवित असल्याचे सांगण्यासाठी शिवार संवाद अभियान राबवित आहे. मात्र, राजकीय चिखलफेकित शेतकऱ्यांच्या मूळ समस्या दुर्लक्षित होत आहे. नापिकी, कर्ज देताना बँकांकडून होणारी अडवणूक आणि खासगी सावकारांचा वाढता तगादा यामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. गत तीन वर्षांत तब्बल १९२ शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. घनसावंगी तालुक्यातील शेवगळ येथील सुनील अण्णासाहेब रणपिसे या तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.तीन वर्षांत जालना जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून समोर येत आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालास न मिळणारा भाव, बँकांचे वेळकाढून धोरण आणि खाजगी सावकाराचा घट्ट होत असलेला विळखा यामुळे तीन वर्षांत तब्बल १९२ शेतकऱ्यांनी विषारी द्रव प्राशन करून किंवा गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. यातील वीस शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळालेली नाही. तर २०१७ मध्ये आत्महत्या केलेल्या १२ शेतकऱ्यांच्या मृत्यूचा रासायनिक परीक्षण अहवाल प्राप्त न झाल्याने ते शासकीय मदतीपासून अद्याप वंचित आहेत. कर्ज फेडल्यानंतरही जमिनीचा ताबा न सोडणाऱ्या सावकाराच्या जाचास कंटाळून मंठा तालुक्यातील हेलस येथील लक्ष्मीबाई विठ्ठल खराबे (४५) यांनी विष प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. या प्रकरणी संशयितांवर गुन्हाही दाखल झाला. या घटनेने सावकराचा फास किती शेतकऱ्यांवर आवळला जातोय, हे अधोरेखित होते. जिल्ह्यात आजही अनेक शेतकऱ्यांची फसवणूक हे सावकार करीत आहेत. कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेली जमीन खरेदी केली जात असून, कर्जाची परतफेड करू न शकलेल्या अनेकांच्या जमिनी बळकवण्याचे प्रकार सुरू आहेत.