शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचा जांगडगुत्ता गं़़़

By admin | Updated: July 26, 2014 01:07 IST

भारत दाढेल, नांदेड पे्रमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता ग़ं़़ उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंंबळ रट्टा गं़़़ गावबोलीतील शब्दांनी दरवळलेल्या पे्रमाच्या गोष्टींचा सुंगध शुक्रवारी

भारत दाढेल, नांदेडपे्रमाचा जांगडगुत्ता गं, जीव झाला हा खलबत्ता ग़ं़़ उखळात खुपसले तोंड प्रिये, मुसळाचा तुंंबळ रट्टा गं़़़गावबोलीतील शब्दांनी दरवळलेल्या पे्रमाच्या गोष्टींचा सुंगध शुक्रवारी कवीसंमेलनात दरवळला अन रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला़ कवी केशव खटींग यांच्या निवेदनाने संमेलनात अधिकच रंगत आली़शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित केलेल्या या कवीसंमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात कवी डॉ़ विठ्ठल वाघ होते़ डॉ़ जगदीश कदम, प्रा़ रविचंद्र हडसनकर, प्रा़ मनोज बोरगावकर, प्रा़ महेश मोरे, नारायण पुरी, महेंद्र शेळके या कवींची उपस्थिती होती़ ग्रामीण पे्रम कवितांची उधळण करीत सर्वच कवींनी रसिकांनी उत्स्फुर्त दाद मिळविली़ प्रारंभी, विठ्ठल वाघ यांनी ओलीत ही कविता सादर करून वातावरण गंभीर केले़ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भ देत वाघ म्हणाले, शेकडो शेतकरी आत्महत्या करू द्या म्हणून विनंती करत आहेत़ ही शोकांतिका आहे़ शेतकऱ्यांच्या वेदनांची दाह मांडणारी ओलित ही कविता त्यांनी सादर केली़ कोरडे जे शेत आहे, ओलेच झाले पाहिजे, मुक्या जीवांचे दुखया, बोलेत आले पाहिजे़़सामाजिक, राजकीय परिस्थितीची उकल करताना विसंगतीचे कसे दर्शन होते, याचे वास्तव डॉ़ जगदीश कदम यांनी आपल्या कवितेतून मांडले़ काय राव बाता हाणता, अन म्हणल तर म्हणल म्हणता़़़ सहज, सोप्या शब्दांची कवितेत गुंफन करीत कदम यांनी राजकीय नेते, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांचे खोटे वर्तन उघडे पाडले़ रविचंद्र हडसनकर यांची ‘माय भक्का भक्का करीत गाडी ठेसणात आली’ ही कविताही दाद मिळवून गेली़ ठेसनात आलेल्या वऱ्हाडाचे चित्रण करताना मानवी भाव- भावनांचा अविष्कार त्यांनी प्रकट केला़ प्रा़ मनोज बोरगावकर यांनी ‘बाई माणसाला जळण्यासाठी फारसे लाकडे लागत नाहीत़़़ कारण आयुष्यभर ती जळतच राहते ’़़़ ही वेगळ्या आशयाची ‘मी जातच राहिल प्रेत यात्रेला’़़़ ही कविता सादर केली़ तुळजापूर येथील नारायण पुरी यांची जांगडगुत्ता ही कविता वन्समोअर झाली़ तु मनसेचे एैलान प्रिये, मी सावध धनुष्यबाण प्रिये, मी वेळ हातावर आलेली, तु कमळापरी बेभान प्रिये़़़ तु सत्ताधारी माजोरी, मी हाताशलेली जनता गं़़़ कवी केशव खटींग यांनी ‘आस लागली संसाराची मनी गं़ अन रानात राबतोय कुणबीनीचा धनी गं़’़़ ही कविता सादर केली़ या कवितेला रसिकांनी डोक्यावर घेतले़ खटींग यांच्या सूत्रसंचालनाने प्रभावी ठरलेल्या कवीसंमेलनात हास्यसम्राट सिद्धार्थ खिल्लारे यांनीही आपल्या कलेद्वारे रसिकांची मने जिंकले़ आयोजक माधव पावडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले़