शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

सोशल मीडियामुळे प्रत्यक्ष संवाद हरवले

By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST

शेवगा : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेताना दिसत आहे.

शेवगा : माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आधुनिकीकरणाचे प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या इंटरनेटमुळे माणूस जगात कोणत्याही कोपऱ्यात असला तरी सहजपणे कानोसा घेताना दिसत आहे.सोशल नेटवर्किंग साईटवर प्रवेश केल्याने या माध्यमातून प्रत्येक जण एकमेकांशी आॅनलाईन संवाद साधण्यात मग्न असतात. आता ग्रामीण भागातही सगळीकडे व्हॉटसअ‍ॅपचे वेड पसरले आहे. आता तर चौदा-पंधरा वर्षांची मुले स्मार्ट फोनच्या आहारी पडले आहे. या वयात मुलांना शिक्षण घेण्याची गरज असते; पण या वयात त्यांना व्हॉटसअ‍ॅपचे वेड लागले आहे. पालकांनी आपल्या मुलांना आळा घालायला पाहिजे. माहिती मिळविण्याच्या नावाखाली सोशल नेटवर्कींग गरजेपेक्षा जास्त वापर होत असून विद्यार्थी व तरुण पिढीला या गोष्टीचे व्यसन जडले आहे. काही वेळेस त्याच्या गैरवापरामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. इंटरनेट जमाण्यात तरुण पिढी मैदानी खेळाकडे दिवसेंदिवस विसर पडत आहे. इंटरनेट माध्यमांमुळे विकासाला चालना मिळत आहे. आपल्या ओळखीच्या किंवा अनोळखी संपर्कात राहून आपल्या संवाद साधण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपचा वापर करीत आहे. आता स्मार्ट फोनच्या रुपाने उपलब्ध सोशल नेटवर्किंगचा जास्त जास्त वापर करण्यात आजच्या युगातील तरुण पिढी आघाडीवर दिसून येत आहे. एक विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त वापर होत असल्याने त्याचे काही फायदे तर तोटेही होतात. नवनवीन माहिती प्राप्त होते. परंतु जास्त वापर केल्याने मानसिक आजार जडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पूर्वीच्या काळी सामाजिक ठिकाणी समोरासमोर चर्चा रंगायच्या. यातून संवाद होऊन अनेक नावीन्यपूर्ण माहिती चर्चामधून व्हायची. परंतु आता इंटरनेट व्हॉटसप्अ‍ॅप,फेसबूक आदींमुळे कौटुंबिक, सामाजिक विकासासाठी कराव्या लागणाऱ्या चर्चा, प्रत्यक्ष संवाद हरवल्याचे चित्र दिसत आहे. मानवी जीवनात वरदान ठरलेल्या इंटरनेटच्या वापरात सर्वाधिक विद्यार्थी व तरुण पिढी आघाडीवर आहे. (वार्ताहर)