शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीचा पूल बांधकामामुळे दुधडच्या शेतकऱ्याचे नुकसान!

By | Updated: December 6, 2020 04:00 IST

दुधड : समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या बांधकामात पुलावरील पाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून वळविण्यात आले. त्यामुळे दुधड येथील शेतकरी दिवटे यांचे ...

दुधड : समृद्धी महामार्गाच्या पुलाच्या बांधकामात पुलावरील पाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून वळविण्यात आले. त्यामुळे दुधड येथील शेतकरी दिवटे यांचे नुकसान झाले आहे. त्यासंबंधी मदत देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे. मात्र, सहा महिन्यांपासून नुकसानभरपाई मिळाली नाही. तर बांधकाम कंपनीला मदत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असल्या तरी कंपनीच्या व्यवस्थापकाकडून शेतकऱ्याशी अरेरावी केली जात आहे. हा प्रकार गुरुवारी घडल्यानंतर पुन्हा गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, समृद्धी महामार्गाचे काम भांबर्डा (ता. औरंगाबाद) येथून जात असून या महामार्गालगत असलेल्या शेतकरी संतोष दिवटे यांचे दोन एकर जमिनीतील डाळिंबाचे नुकसान केवळ पाणी वळ‌विल्याने झाले होते. पुलाच्या कामासाठी महामार्गालगत असलेला जुना पूल बंद करण्यात आला. वाहत येणारे पाणी थेट नवीन तयार करण्यात आलेल्या नाल्यात न सोडता शेतकरी दिवटे यांच्या शेतात सोडण्यात आले. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे दिवटे यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर संबंधित विभाग या पिकाचा पंचनामा करून गेला होता. पंचनामा करून गेल्यावर सहा महिने झाले तरी फिरकले नाहीत. मदत न मिळाल्याने अखेर शेतकरी हतबल झाला आहे.

शेतकऱ्यांशी अरेरावी

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर मेघा इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीला शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा व मदत द्या, अशा सूचना देण्यात आल्या. कंपनीचे व्यवस्थापक नरसिंह कुंडी, समन्वयक अधिकारी अंबादास घागरे हे गुरुवार, ३ रोजी आले होते. सदर चर्चा करत असताना मेघा कंपनीच्या मॅनेजरकडून शेतकऱ्यांना हातवारे करत अरेरावीची भाषा वापरून अपमान करण्यात आला.

फोटो -