शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

एकाच महिन्यात १० लाखांचे नुकसान

By admin | Updated: July 3, 2014 00:15 IST

विजय चोरडिया , जिंतूर आगारात दोन महिन्यांपासून व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे एकाच महिन्यात दहा लाखांचे नुकसान झाले असून, तब्बल १२ गाड्या, २५ वाहक-चालक आगारामध्ये बसून आहेत़

विजय चोरडिया , जिंतूरआगारात दोन महिन्यांपासून व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे एकाच महिन्यात दहा लाखांचे नुकसान झाले असून, तब्बल १२ गाड्या, २५ वाहक-चालक आगारामध्ये बसून आहेत़ व्यवस्थापनाने फारसे लक्ष न दिल्याने जिंतूरचे आगार आता डबघाईला आले आहे़ राज्य पातळीवर पाच वर्षापूर्वी जिंतूर आगार प्रथम आले होते़ त्यावेळीही रस्त्यांची अवस्था फारशी चांगली नव्हती़ परंतु, आहे त्या परिस्थितीत उत्पन्नाचा विचार करून फेऱ्यांची संख्या व वेळापत्रक पाळले जात होते़ पाच वर्षाच्या कालावधीत ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते दुरुस्त करण्यात आले़ किंबहुना पहिल्यापेक्षा रस्त्यांची अवस्था, गाड्यांची अवस्था चांगली असतानाही उत्पन्नात मात्र जिंतूर आगार राज्यस्तरावर खालच्या पातळीवर पोहचला आहे़ या सर्व प्रकाराला आगारातील व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांत समन्वयाचा अभाव, गाड्यांची नादुरुस्ती, गाड्यांना उपलब्ध नसलेले सुटे भाग व जिल्हास्तरावरील व्यवस्थापनाची दुजाभावाची वागणूक यामुळे जिंतूर आगार आता डबघाईला आले आहे़ जिंतूर आगारात सध्या ५८ गाड्या उपलब्ध आहेत़ यापैकी पाच गाड्या मानव विकासच्या असून ५३ पैकी १२ गाड्या नादुरुस्त आहेत़ त्यामुळे १२ चालक व १२ वाहक ड्युटी नसल्याने आगारामध्ये बसून आहेत़ जून महिन्यामध्ये तब्बल ३६ हजार ३२७ किमी विविध कारणांनी कमी झाले़ म्हणजेच आगाराचे ९ लाख ८१ हजार ९१८ रुपयांचे नुकसान झाले़ मागील वर्षी पंढरपूर यात्रेनिमित्त ४३ गाड्या सोडण्यात आल्या़ ८६ फेऱ्या करून २९ हजार ३४ किमी प्रवासातून ७३ हजार २५२ रुपयांचे उत्पन्न आगाराला प्राप्त झाले़ यावर्षी आगारात गाड्याच उपलब्ध नाहीत़ त्यामुळे आता यात्रेनिमित्त आगार काय करेल हे सांगता येत नाही़ ४ ते १३ जुलै दरम्यान जिंतूर आगारातून पंढरपूरसाठी विशेष गाड्या सोडाव्या लागणार आहेत़ विशेष म्हणजे लोकमत प्रतिनिधीने जिंतूर आगाराला भेट दिल्यानंतर आगार प्रमुख, स्थानक प्रमुख, स्थानक नियंत्रक कोणीही हजर नव्हते़ सर्व कारभार अलबेल अवस्थेत होता़ त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मात्र याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला़ ग्रामीण भागातील फेऱ्या होणार बंदआषाढी यात्रेला गाड्या पाठविण्यासाठी जिंतूर आगारात पुरेशी व्यवस्था नाही़ त्यामुळे ग्रामीण भागातील किमान ८६ फेऱ्या बंद कराव्या लागणार आहेत़ त्यामुळे या भागातील प्रवाशांना किमान १० दिवस एसटी शिवाय प्रवास करावा लागेल़जिंतूर आगारातील एमएच १४ बीटी १९५०, एमएच २० डी-९६३६, एमएच २० डी-९८४५, एमएच २० सीएल-०६११, एमएच १४ बीटी ००१८, एमएच २०डी-९८४४, एमएच २० डी- ९६१४, एमएच २० बीएल-२४६, एमएच ०६- ८६४३, एमएच २० बीएल- ६११, एमएच १४ बीटी-००९९ या गाड्या दुरुस्ती अभावी जिंतूर आगारात पडून आहेत़