शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

नाताळसाठी विशेष रेल्वे सोडण्यास ‘खो’

By admin | Updated: December 23, 2014 00:15 IST

औरंगाबाद : सुट्यांनिमित्त विविध ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी औरंगाबादमार्गे विशेष रेल्वे सोडण्याकडे दक्षिण मध्य रेल्वे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे.

औरंगाबाद : सुट्यांनिमित्त विविध ठिकाणी पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी औरंगाबादमार्गे विशेष रेल्वे सोडण्याकडे दक्षिण मध्य रेल्वे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून आले आहे. नाताळच्या सुट्यांनिमित्त प्रवाशांना तोच अनुभव येत असून, पुन्हा एकदा ‘दमरे’ विशेष रेल्वे सोडण्याच्या मागणीला ‘खो’ देत आहे.नाताळच्या सुट्यांनिमित्त विविध ठिकाणी पर्यटनासाठी जाण्याचे नियोजन प्रवाशांकडून केले जात आहे. रेल्वेचा प्रवास सोयीचा आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा असल्याने सर्वसामान्य प्रवाशांकडून त्यास प्राधान्य दिले जाते. परंतु त्या तुलनेत प्रवाशांना सुविधा देण्याकडे रेल्वे प्रशासन कायम दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येते. नाताळनिमित्त दरवर्षी गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते. अशा प्रवाशांच्या सुविधेसाठी गोव्याला विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे सातत्याने दुर्लक्षच केले जात आहे. अवघ्या पाच दिवसांवर नाताळ सण आला असून, विशेष रेल्वे सोडली जाईल का, याचीच प्रवाशांकडून प्रतीक्षा केली जात आहे. परंतु दक्षिण मध्य रेल्वेचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. गोव्यासह जोधपूर, बंगळुरू आदी ठिकाणी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.४विशेष रेल्वेअभावी जादा पैसे मोजून अन्य वाहतुकीची सुविधा वापरण्याची वेळ प्रवाशांवर सातत्याने येत आहे. शिवाय सुट्यांनिमित्त रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. त्यामुळे अशा वाढलेल्या गर्दीतून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.४गोव्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. अनेकांकडून त्यात खोडा घातला जात आहे. मराठवाड्याच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असताना अन्य ठिकाणी जोधपूर, बंगळुरूसाठी विशेष रेल्वे सोडल्या जात असल्याचे मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा म्हणाले.