शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बुद्धांची करुणा, मैत्री हीच सर्वांना प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:28 IST

बीड बायपास रोडलगत जबिंदा लॉन्सवर आयोजित दुस-या इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन रविवारी श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद राजपक्ष यांच्या हस्ते झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तथागत गौतम बुद्धांनी दिलेला करुणा, मैत्री आणि शांतीचा संदेश हाच भारतासह सर्व आशिया खंडातील राष्ट्रांसाठी प्रेरणादायी आहे. बुद्धांचा याच विचारांचा धागा भारताला सर्व बौद्ध राष्ट्रांसोबत जोडणारा आहे. आम्ही श्रीलंकन असलो, तरी बुद्धांची भूमी असलेला भारत देश हीच आमची मातृभूमी असल्याची भावना श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्ष यांनी आज व्यक्त केली.बीड बायपास रोडलगत जबिंदा लॉन्सवर आयोजित दुस-या इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन रविवारी श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद राजपक्ष यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री प्रा. जी. एल. पॅरिस, खा. लोहान रतवत्ते, खा. उदित लोकुबंडारा, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा. अमर साबळे, अर्जुन खोतकर, आ. संजय शिरसाट आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले होते.माजी राष्ट्रपती महिंद राजपक्ष यांनी आपल्या भाषणाची सुरुवात हिंदीमध्ये केली. त्यानंतर इंग्रजीमध्ये त्यांनी सविस्तर मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबद्दल गौरपूर्ण विवेचन केले. भारताची राजमुद्रा तसेच राष्ट्रध्वजावर बौद्ध प्रतीकांचा समावेश आहे. श्रीलंका हे बौद्ध राष्ट्र म्हणून गणले जात असले, तरी तेथील संविधानाने त्याचा उल्लेख केला नाही. त्यामुळे श्रीलंकेमध्ये आज अल्पसंख्याक असलेला संप्रदाय सातत्याने बौद्ध राष्ट्र संबोधण्यास विरोध करीत आहे. परंतु बुद्धांचा विचार हा मैत्री, करुणा, शांतीचा आहे. त्यामुळे श्रीलंकेमध्ये सर्व धर्म- संप्रदायाचे लोक एकोप्याने राहतात. या देशात बुद्धांचा जन्म झाला. परंतु भारतात बुद्धाच्या धम्माला फारसे संरक्षण मिळू शकले नाही.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा या फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक भन्ते एम. धम्मज्योती थेरो यांनी केले. स्वागताध्यक्ष विजय मगरे, मनीष बागूल, प्रफुल्ल ढेपे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी पंकजा मुंडे, अर्जुन खोतकर, खा. साबळे, पर्यटनमंत्री रावले, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मनोगत व्यक्त केले.