शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीच्या पहिल्याच दिवशी लुटीचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:53 IST

तूर उत्पादकांमागचे शुक्लकाष्ठ काही संपायला तयार नाही. महसूल, उपनिबंधक, बाजार समिती व खरेदी विक्री संघ अशा चार यंत्रणांच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. खºया लाभार्थ्यालाही आपलीच तूर विकण्यासाठी अनेक पुरावे द्यावे लागत आहेत. ते दिल्यानंतरही खरेदीच्या वेळी हमाल-मापारी अधिकचे दर घेत असून एका अवैध वसुली करणाºयाला २00 रुपयांची रझाकारी मोजावी लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तूर उत्पादकांमागचे शुक्लकाष्ठ काही संपायला तयार नाही. महसूल, उपनिबंधक, बाजार समिती व खरेदी विक्री संघ अशा चार यंत्रणांच्या कचाट्यात शेतकरी भरडला जात आहे. खºया लाभार्थ्यालाही आपलीच तूर विकण्यासाठी अनेक पुरावे द्यावे लागत आहेत. ते दिल्यानंतरही खरेदीच्या वेळी हमाल-मापारी अधिकचे दर घेत असून एका अवैध वसुली करणाºयाला २00 रुपयांची रझाकारी मोजावी लागत आहे.जिल्हा प्रशासन व बाजार समितीच्या तपासणीच्या नादात शेवटच्या दोन दिवसांत ऐन सणासुदीत तूर खरेदी सुरू झाली. तरीही शेतकºयांनी महालक्ष्मीचा अतिशय महत्त्वाचा सण बाजूला सारून घरातील धान्य मोंढ्यात आणले. येथे आल्यावर मोजणी करतानाच वाद सुरू झाले. पहिल्याच दोन शेतकºयांची मोजणी झाली अन् त्यांना २६ पोत्यांसाठी अधिकृतरीत्या केवळ ३४0 रुपये द्यावे लागणार असताना त्यांच्याकडून १९00 रुपये घेण्यात आले. एक शेतकरी बाजार समितीचे सभापती रामेश्वर शिंदे यांच्याकडे तक्रार घेवून आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. यात बेभाव हमाली, मापारी दर व केवळ मोजमाप नोंदणी घेणारा एक बाऊन्सरसारखा खाजगी युवक दादागिरी करून वसुली करीत होता. वरून तो सभापतींनाही जुमानायला तयार नव्हता. मात्र नंतर सदर शेतकºयांची रक्कम परत केली. परंतु चाळणी करताना प्रत्येकवेळी शेतकºयांशी वाद होत होता. बाजार समितीच्या माजी संचालक संध्या अजाबराव मते व त्यांच्या सोबतच्यांच्या ९0 पोते तुरीसाठीही अशीच अवाजवी मागणी होत असल्याने वाद पेटला. तोही खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गोविंद भवर यांनी मध्यस्थी केल्याने मिटला. या एकंदर प्रकारात बाजार समिती व खरेदी विक्री संघ एकमेकांवर ढकलून मोकळे होत आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाने इतर बाबींत जसा हस्तक्षेप केला. तसा यातही करणे अपरिहार्य दिसत आहे.खरेदी-विक्री संघाला आम्ही केवळ जागा दिली. बाकी सर्व यंत्रणा त्यांचीच असल्याचे बाजार समितीकडून सांगितले जाते. तर खरेदीसाठी बाजार समितीचा एक माणूस नोंदणीसाठी अनिवार्य आहे. मात्र तो हजरच राहत नसल्याचे खरेदी-विक्री सांगत आहे. आणखीही बरेच मुद्दे आहेत.