शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ढिसाळ नियोजन; शेतकरी त्रस्त

By admin | Updated: May 17, 2017 00:06 IST

लातूर : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर अद्यापही खरेदीविना पडून आहे.

राजकुमार जोंधळे । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर अद्यापही खरेदीविना पडून आहे. परिणामी, पुन्हा शासनाने आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरु केले आहेत. मात्र, केंद्रावरील ढिसाळ नियोजनाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. लातूरच्या गुळ मार्केट परिसरात तूर घेऊन आलेल्या काही वाहनांतील तूर अद्याप उतरवून घेण्यात आली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना वाहन भाड्यांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर काही शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून खरेदी केंद्रावर मुक्काम ठोकला आहे.गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तूर उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. परिणामी, बाजार समितीत तुरीची अपेक्षेपेक्षा अधिक आवक झाल्याने अचानक दर कोसळले. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र जिल्हाभरात सुरु केले. या केंद्रावर आतापर्यंत जवळपास २ लाख ४९ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. नाफेडच्यावतीने सुरु करण्यात आलेली खरेदी केंद्राची मुदत संपल्याने ती बंद करण्यात आली. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची ‘तूर’कोंडी झाली. पुन्हा हे केंद्र सुरु करुन, उर्वरित शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत होती. अखेर सोमवारी आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यातील सहा ठिकाणी तूर खरेदी केंदे्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्यातील उदगीर, देवणी, जळकोट आणि निलंगा येथे हे खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे.