शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

ढिसाळ नियोजन; शेतकरी त्रस्त

By admin | Updated: May 17, 2017 00:06 IST

लातूर : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर अद्यापही खरेदीविना पडून आहे.

राजकुमार जोंधळे । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर अद्यापही खरेदीविना पडून आहे. परिणामी, पुन्हा शासनाने आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर खरेदी केंद्र सुरु केले आहेत. मात्र, केंद्रावरील ढिसाळ नियोजनाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. लातूरच्या गुळ मार्केट परिसरात तूर घेऊन आलेल्या काही वाहनांतील तूर अद्याप उतरवून घेण्यात आली नाही. परिणामी, शेतकऱ्यांना वाहन भाड्यांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर काही शेतकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून खरेदी केंद्रावर मुक्काम ठोकला आहे.गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तूर उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. परिणामी, बाजार समितीत तुरीची अपेक्षेपेक्षा अधिक आवक झाल्याने अचानक दर कोसळले. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र जिल्हाभरात सुरु केले. या केंद्रावर आतापर्यंत जवळपास २ लाख ४९ लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. नाफेडच्यावतीने सुरु करण्यात आलेली खरेदी केंद्राची मुदत संपल्याने ती बंद करण्यात आली. जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची ‘तूर’कोंडी झाली. पुन्हा हे केंद्र सुरु करुन, उर्वरित शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत होती. अखेर सोमवारी आधारभूत किंमत योजनेंतर्गत जिल्ह्यातील सहा ठिकाणी तूर खरेदी केंदे्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र, जिल्ह्यातील उदगीर, देवणी, जळकोट आणि निलंगा येथे हे खरेदी केंद्र सुरु केले नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे.