शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

बळीराजाच्या नजरा आकाशाकडे

By admin | Updated: July 14, 2014 01:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसाच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे घेऊन पेरणी केली खरी; पण त्यानंतर पाऊसच पडत नसल्याने बळीराजा चिंतित झाला

औरंगाबाद : जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसाच्या आधारावर काही शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे घेऊन पेरणी केली खरी; पण त्यानंतर पाऊसच पडत नसल्याने बळीराजा चिंतित झाला असून, सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. गंगापूर तालुक्यात दुष्काळसदृश स्थितीगंगापूर : मृग नक्षत्रापासून आर्द्रा नक्षत्रापर्यंत जवळपास महिनाभर पावसाने दडी मारल्याने तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. आर्द्रा संपता संपता आषाढी एकादशीच्या पहिल्या दिवशी व दुसऱ्या दिवशी पांडुरंगाच्या आशीर्वादाने तालुक्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवित होऊन पुढे जोराचा पाऊस येणार, या आशेने शेतातील थोड्याफार ओलीवर खरीप हंगामातील अधिक आर्थिक उत्पन्न येणारे कपाशी व मका या पिकांची लागवड मोठ्या जोमाने सुरू केली होती. त्यानंतर पावसाने पुन्हा डोळे वटारल्याने शेतकरी वर्गात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले असून, लागवड केलेल्या पिकास वेळीच पाऊस न झाल्यास बी-बियाणे वाया जाणार व पुढेही लागवडीस उशीर होत असल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पाऊस येत नसल्याने व्यापारी व कृषी व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून, कृषी व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत लाखो रुपयांचा माल उठाव नसल्याने पडून आहे. पाऊस नसल्यामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट पसरले आहे. पाऊस पडावा यासाठी शेतकरी वर्गासह व्यापारी आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत.वेरूळ परिसरात निराशावेरूळ : परिसरात अर्धा आषाढ संपला तरी पावसाने पाठ फिरविली आहे. नांगरट केलेली ढेकळं शेतात तशीच असल्याने संपूर्ण परिसरातील पेरणी ठप्प झाली आहे. एकादशीला हमखास पाऊस येईल, पंढरपूरच्या विठोबाची कृपा होईल, या आशेने धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी पाऊस न आल्याने निराशा झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर पेरणी केली आहे, त्या पिकांचीही पाण्याअभावी वाढ खुंटली आहे. नदी-नाले कोरडेठाक असून, भूगर्भातील पाण्याची पातळी खाली खाली जात आहे. आता बळीराजाकडे चाऱ्याची उपलब्धता नसल्याने मोठ्या प्रमाणात बेभाव पशुधन बाजारात चालले आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा असून, जागोजागी चारा छावणी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मजुरांची शहराकडे धावशेतीची कामे बंद, धंदे बंद असल्यामुळे मजुरांचे जथे शहराकडे धावू लागले आहेत. त्यामुळे मोठमोठी गावे बकाल होत असून, दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. याकडे वन विभाग, कृषी विभाग व महसूल विभाग यांनी गांभीर्याने घेऊन मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी आहे.पिंप्रीराजा परिसरात प्रतीक्षापिंप्रीराजा : काही दिवसांपूर्वी झालेल्या थोड्या पावसानंतर शेतकऱ्यांनी लागवड केली; पण नंतर पाऊस झालाच नाही, त्यामुळे पेरलेले बी-बियाणे वाया जाते की काय, अशी शंका आता निर्माण झाली आहे. शेतकरी चिंतित झाला असून, पावसाच्या प्रतीक्षेत आहे. (वार्ताहर)बाजारसावंगी परिसरात दुबार पेरणी सुरूबाजारसावंगी : परिसरात पहिली पेरणी वाया गेली असल्याने शेतकरी दुबार पेरणीकडे वळला असून, अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने अर्धा पावसाळा उलटला जात असताना नदी-नाले, विहिरी कोरड्याठाक आहेत. २० जून रोजी बाजारसावंगी परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. पेरणीस उशीर होत असल्याचे पाहून सर्वत्र शेतकऱ्यांनी कापूस, मका, तूर पिकाची पेरणी उरकली; मात्र यानंतर पावसाने तब्बल पंधरा ते वीस दिवसांची उघडीप दिल्याने पहिली पेरणी पूर्णपणे वाया गेली. यामुळे पहिल्या पेरणीची मशागत, बियाणे वाया गेले. ढग येतात... जातात... दररोज पडणारे कडक ऊन, दुपारनंतर येणारे ढग निघून जात असल्याने शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. आषाढी एकादशीला पडलेल्या तुरळक पावसाने शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणीस सुरुवात केली आहे; मात्र अजूनही दमदार पावसाची नितांत गरज आहे. दुबार पेरणी सुरू असल्याने त्रस्त शेतकऱ्यांना मोफत, तसेच अनुदान स्वरूपात कापूस, मका बियाणांचे वाटप करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.उंडणगावात दुबार पेरणीचे संकट, अनेक शेतकऱ्यांनी केली मक्याची धूळपेरणी उंडणगाव : येथे ६ जुलै रोजी झालेल्या पावसानंतर पाऊस नसल्याने उगवून आलेले पीक वाळण्याचा धोका असून, दुबार पेरणीचे संकट आले; मात्र येथील खंडाळा व गोळेगाव परिसरात पेरणीयोेग्य पाऊस नसल्याने या भागातील शेतकरीदेखील पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस लांबल्याने अनेक शेतकऱ्यांनी मक्याची धूळपेरणी केली होती. आठ दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाने मका उगवला; मात्र प्रचंड उष्णता व पाऊस गायब झाल्याने ही कोवळी पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे आलेली मदत काही शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले; मात्र यादीत नाव नाही, अशा शेतकऱ्यांची नावे पुन्हा पाठविली; मात्र अद्याप मदत मिळाली नसल्याने शेतकरी वर्गात संताप आहे. दुबार पेरणीसाठी शासनातर्फे बियाणे व खत देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.