शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

८९ संवेदनशील मतदान केंद्रांवर नजर

By admin | Updated: April 17, 2017 23:35 IST

लातूर : लातूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होत असून, ३७१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून, यातील ८९ केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत.

लातूर : लातूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होत असून, ३७१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले असून, यातील ८९ केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी आयोगाने जय्यत तयारी केली असून, संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम २२ मार्च रोजी जाहीर झाल्यापासून आयोगाने निवडणुकीची जय्यत तयारी केली असून, १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी लातूर शहरात ३७१ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, कंट्रोल युनिट व बॅलेट युनिटची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर एक कंट्रोल युनिट व उमेदवार संख्येवरून बॅलेट युनिट मतदान केंद्रांवर १८ एप्रिल रोजी सायंकाळी पोहोचविले जाणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी एकूण २ हजार २८३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर १ मतदान अधिकारी, सहाय्यक आणि अन्य ४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तीनवेळा निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून, त्यांची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी दर्जाचे एकूण ६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. या अधिकाऱ्यांमार्फतच निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. ३७१ मतदान केंद्रांपैकी ८९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. या केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही राहणार आहे.