शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

दीपोत्सवासाठी गावी जाण्याची लगबग

By admin | Updated: October 22, 2014 01:20 IST

औरंगाबाद : प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळी सणासाठी आपापल्या गावी जाण्याची लगबग सुरू असून रेल्वेस्थानक आणि बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत आहे.

औरंगाबाद : प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळी सणासाठी आपापल्या गावी जाण्याची लगबग सुरू असून रेल्वेस्थानक आणि बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत आहे. प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने जादा बसचे नियोजन केले; परंतु दक्षिण मध्य रेल्वेने जादा अथवा विशेष रेल्वे न सोडता प्रवाशांचा रेल्वे प्रवास अवघड करण्यास हातभार लावल्याचे चित्र सध्या दिसत आहे.दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालये, विविध कंपन्यांना सुट्या लागल्या आहेत. यामुळे आपापल्या गावी परतण्यासाठी बसस्थानक आणि रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बस सोडण्यात येत आहेत. यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. अनेक रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. रेल्वेस्थानक आणि बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले आहेत. मुंबई, नागपूर, नाशिक, अकोला, जळगाव, धुळे, अमरावती इ. जिल्ह्यांमधील विद्यार्थी शिक्षणानिमित्त तसेच अनेक नागरिक नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झाले आहेत. दिवाळी सणाला सुरुवात होताच आपापल्या गावी जाण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरू आहे. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत असून आगामी दोन दिवसांनंतर २३ आॅक्टोबरपासून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार आहे. दिवाळीनिमित्त अवघ्या काही वेळेत बस, रेल्वेगाड्या भरून जात असल्याचे दिसून येत आहे. परभणी, नांदेड, परळी, मुंबई, नाशिक, हैदराबाद आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाते; परंतु नियमित रेल्वेतूनच प्रवास करण्याची वेळ येत असल्याने प्रवाशांना काही गैरसोयींना सामोरे जावे लागत असून, मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.