शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

दीपोत्सवासाठी गावी जाण्याची लगबग

By admin | Updated: October 22, 2014 01:20 IST

औरंगाबाद : प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळी सणासाठी आपापल्या गावी जाण्याची लगबग सुरू असून रेल्वेस्थानक आणि बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत आहे.

औरंगाबाद : प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळी सणासाठी आपापल्या गावी जाण्याची लगबग सुरू असून रेल्वेस्थानक आणि बसस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत आहे. प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने जादा बसचे नियोजन केले; परंतु दक्षिण मध्य रेल्वेने जादा अथवा विशेष रेल्वे न सोडता प्रवाशांचा रेल्वे प्रवास अवघड करण्यास हातभार लावल्याचे चित्र सध्या दिसत आहे.दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालये, विविध कंपन्यांना सुट्या लागल्या आहेत. यामुळे आपापल्या गावी परतण्यासाठी बसस्थानक आणि रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळातर्फे जादा बस सोडण्यात येत आहेत. यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. अनेक रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. रेल्वेस्थानक आणि बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलले आहेत. मुंबई, नागपूर, नाशिक, अकोला, जळगाव, धुळे, अमरावती इ. जिल्ह्यांमधील विद्यार्थी शिक्षणानिमित्त तसेच अनेक नागरिक नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झाले आहेत. दिवाळी सणाला सुरुवात होताच आपापल्या गावी जाण्यासाठी प्रत्येकाची लगबग सुरू आहे. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानकात प्रवाशांची गर्दी वाढत असून आगामी दोन दिवसांनंतर २३ आॅक्टोबरपासून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार आहे. दिवाळीनिमित्त अवघ्या काही वेळेत बस, रेल्वेगाड्या भरून जात असल्याचे दिसून येत आहे. परभणी, नांदेड, परळी, मुंबई, नाशिक, हैदराबाद आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य दिले जाते; परंतु नियमित रेल्वेतूनच प्रवास करण्याची वेळ येत असल्याने प्रवाशांना काही गैरसोयींना सामोरे जावे लागत असून, मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.