शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

गणेश मंडळांसाठी लोकमान्य महोत्सव

By admin | Updated: August 19, 2016 00:57 IST

जालना : या वर्षीचा गणेशोत्सव शासनाच्यावतीने लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

जालना : या वर्षीचा गणेशोत्सव शासनाच्यावतीने लोकमान्य महोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान लोकमान्य टिळकांच्या संकल्पनेतून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या महोत्सवात सहभाग घेणाऱ्या मंडळांना शासनाच्यावतीने तालुका ते राज्य पातळीवर रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे माहिती राज्य महोत्सव समितीचे सदस्य बसवराज मंगरूळे यांनी दिली.या महोत्सवाची माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.बैठकीस जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे प्रमुख उपस्थित होते. मंगरूळे म्हणाले की, या वर्षीच्या गणेशोत्सवात जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सहभागी होत असताना शासनाच्या लोकमान्य महोत्सवात सहभाग नोंदवावा. या महोत्सवात स्वदेशी, साक्षरता अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, जलसंधारण या पाच विषयावर देखावे सादर करावेत. उत्कृष्ट ठरणाऱ्या गणेश मंडळांच्या देखाव्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर बक्षीस देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर प्रथम बक्षीस १ लाख रूपये, दुसरे ७५ हजार तर तिसरे ५० हजार एवढे असणार असून तालुकास्तरावरील प्रथम बिक्षस २५ हजार, दुसरे १५ हजार व तृतीय बिक्षस १० हजार रूपये दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी या बैठकीत दिली. या कामी विविध विभागाबरोबरच शिक्षण विभागाने हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २६ आॅगस्टपूर्वी आपले आवेदनपत्र दाखल करणे आवश्यक असल्याचेही मंगरुळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)