शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : ज्याची खावी पोळी; त्याची वाजवावी टाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 19:13 IST

खैरेंसोबतच्या बैठकीनंतर शांतीगिरी महाराजांनी घेतली माघार 

औरंगाबाद : वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्यासोबत बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर महाराजांनी सायंकाळी ४ वा. पत्रकार परिषदेत ‘ज्याची खावी पोळी; त्याची वाजवावी टाळी’ असे सांगून भक्त परिवाराने नि:स्वार्थी, कर्तृत्ववान उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. मी स्वत: व जय बाबाजी परिवाराचा कुणालाही पाठिंबा नाही, निवडणुकीत २ लाखांच्या आसपास मतदान मिळाले असते, त्यामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. 

नि:स्वार्थी उमेदवार कोण आहे, या व इतर अनेक प्रश्नांचा भडिमार पत्रकारांनी शांतीगिरी यांच्यावर केला. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर योग्य व कर्तृत्ववान उमेदवाराची निवड करून भूमिका जाहीर केली जाईल. ‘लढा राष्ट्रहिताचा व संकल्प शुद्ध राजकारणाचा’ हे ब्रीद घेऊन औरंगाबाद, जालना, शिर्डी-अहमदनगर, नाशिक, दिंडोरी, जळगाव, धुळे या ७ लोकसभा मतदारसंघांत बाबाजी सांगतील तेच धोरण असेल, असे शांतीगिरी म्हणाले. मतदारांनी नि:स्वार्थी उमेदवाराला  मतदान करावे, प्रलोभनाला मतदारांनी बळी पडू नये.  

समीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम शांतीगिरी महाराजांनी गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे राजकीय समीकरणांचा गुंता वाढण्याची चर्चा होती; परंतु त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ साली शांतीगिरी महाराजांनी १ लाख ४८ हजार २६ मते घेत काँग्रेसला पराभवाकडे नेले, तर शिवसेनेचे मताधिक्य कमी केले. शांतीगिरी महाराजांनी निवडणूक मैदानातून माघार घेतल्यामुळे भक्त परिवार स्वेच्छेने मतदान करण्यास मोकळा झाला आहे. कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात जय बाबाजी परिवार असून, ती मते निर्णायक आहेत. मागील वर्षभरात महाराजांच्या मठात भाजप, काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावून स्नेहभोजनासह राजकीय चर्चा केल्या होत्या. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबाद