शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

Lok Sabha Election 2019 : ज्याची खावी पोळी; त्याची वाजवावी टाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 19:13 IST

खैरेंसोबतच्या बैठकीनंतर शांतीगिरी महाराजांनी घेतली माघार 

औरंगाबाद : वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्यासोबत बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर महाराजांनी सायंकाळी ४ वा. पत्रकार परिषदेत ‘ज्याची खावी पोळी; त्याची वाजवावी टाळी’ असे सांगून भक्त परिवाराने नि:स्वार्थी, कर्तृत्ववान उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. मी स्वत: व जय बाबाजी परिवाराचा कुणालाही पाठिंबा नाही, निवडणुकीत २ लाखांच्या आसपास मतदान मिळाले असते, त्यामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. 

नि:स्वार्थी उमेदवार कोण आहे, या व इतर अनेक प्रश्नांचा भडिमार पत्रकारांनी शांतीगिरी यांच्यावर केला. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर योग्य व कर्तृत्ववान उमेदवाराची निवड करून भूमिका जाहीर केली जाईल. ‘लढा राष्ट्रहिताचा व संकल्प शुद्ध राजकारणाचा’ हे ब्रीद घेऊन औरंगाबाद, जालना, शिर्डी-अहमदनगर, नाशिक, दिंडोरी, जळगाव, धुळे या ७ लोकसभा मतदारसंघांत बाबाजी सांगतील तेच धोरण असेल, असे शांतीगिरी म्हणाले. मतदारांनी नि:स्वार्थी उमेदवाराला  मतदान करावे, प्रलोभनाला मतदारांनी बळी पडू नये.  

समीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम शांतीगिरी महाराजांनी गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे राजकीय समीकरणांचा गुंता वाढण्याची चर्चा होती; परंतु त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ साली शांतीगिरी महाराजांनी १ लाख ४८ हजार २६ मते घेत काँग्रेसला पराभवाकडे नेले, तर शिवसेनेचे मताधिक्य कमी केले. शांतीगिरी महाराजांनी निवडणूक मैदानातून माघार घेतल्यामुळे भक्त परिवार स्वेच्छेने मतदान करण्यास मोकळा झाला आहे. कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात जय बाबाजी परिवार असून, ती मते निर्णायक आहेत. मागील वर्षभरात महाराजांच्या मठात भाजप, काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावून स्नेहभोजनासह राजकीय चर्चा केल्या होत्या. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबाद