शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

Lok Sabha Election 2019 : औरंगाबाद लोकसभेसाठी २३ उमेदवारांचे भवितव्य सीलबंद; ६१.८७ टक्के झाले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 12:12 IST

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन सिपेट या कंपनीत सर्व ईव्हीएम सील करून जमा

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात होते. त्या उमेदवारांच्या भवितव्यासाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. २०२१ मतदान केंद्रांवर घेण्यात आलेले मतदान ईव्हीएममध्ये नोंदविले गेले आहे. २,४४५ सीयू, ४,९०३ बीयू आणि २,६२२ व्हीव्हीपॅट सर्व मतदान केंद्रांवर होत्या. २४ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील मेल्ट्रॉन सिपेट या कंपनीत सर्व ईव्हीएम सील करून जमा करण्यात येणार आहेत. उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये दडले असून, २३ मे रोजी सकाळी ८ वा. मतमोजणीला सुरुवात होईल, असे जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले. 

मतदान प्रकियेनंतर सर्व ईव्हीएम सील होऊन सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षेत येण्यास २४ एप्रिलची पहाट होण्याची शक्यता आहे. २४ तारखेला सकाळी ११ वा. स्ट्राँगरूममध्ये सर्व ईव्हीएमच्या बाबतीतील कागदपत्रांची छाननी होणार आहे. निरीक्षक ब्रजमोहन कुमार यांच्या निगराणीमध्ये छाननी होईल. ईव्हीएम येण्यास उशीर होणार असल्याचे गृहीत धरून ११ वाजेची वेळ निर्धारित करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी चौधरी यांनी स्पष्ट केले. सील केलेल्या ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये ठेवल्यानंतर सील करण्यात येईल. मतमोजणी केंद्राला प्रचंड पोलीस बंदोबस्त असणार आहे. ईव्हीएम यंत्रे आता पूर्ण एक महिना सील केलेल्या स्वरूपात राहणार आहेत. मतमोजणीची तारीख २३ मे आहे. तोपर्यंत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची धाकधूक कायम राहणार आहे. असे असले तरी मंगळवारी काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपलाच उमेदवार विजयी झाला, या थाटात फटाक्यांची आतषबाजी केली. 

६१.८७ टक्के झाले मतदानलोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६१.८७ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तुरळक अपवाद वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. शांततेत व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडल्याचा दावा चौधरी यांनी केला. शहर व ग्रामीण भागातील काही मतदान केंद्रांवर रात्री ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार असल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले की, ६ वाजेपर्यंत ६१.८७ टक्के मतदान झाल्याचे आयोगाला कळविण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत जे मतदान प्रक्रियेत सायंकाळी ६ वाजेपर्यंत केंद्रात आलेल्या मतदारांचेच मतदान करून घेण्यात येणार आहे. रात्री उशिरानंतर त्याची आकडेवारी समोर येईल. मॉकपोलमुळे काही ठिकाणी मतदान प्रक्रिया उशिरा सुरू झाली, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती अस्वस्थनिवडणूक प्रक्रियेदरम्यान दोन कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली. पूर्व मतदारसंघात एका कर्मचाऱ्याला मॉकपोलदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याच्याठिकाणी दुसरा कर्मचारी नेमला, तर सिल्लोडमधील एका केंद्रावर रवाना झालेल्या कर्मचाऱ्याला फीट आल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019