शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

Lok Sabha Election 2019 : मतदार यादीत अनेकांच्या नावावर ‘डिलीट’चा शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 12:36 IST

सहा बुथवर ५ हजार ९२२ मतदानापैकी ४०० मतदारांच्या नावावर डिलीटचा शिक्का

औरंगाबाद/पिंप्रीराजा : औरंगाबाद शहरासह तालुक्यातील पिंप्रीराजा आणि इतर काही गावांमध्ये मतदारांची नावे ‘डिलीट’ केल्याचे समोर आले. 

पिंप्रीराजा येथील एकूण  सहा बुथवर ५ हजार ९२२ मतदानापैकी ४०० मतदारांच्या नावावर डिलीटचा शिक्का आढळून आला. त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. या यादीत काही नावे मृत व्यक्तींची होती; पण यात अनेक जिवंत मतदारांच्या नावांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे काही मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती केली; पण तुमचा फोटो मतदार यादीत नसल्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मतदार मतदान न करताच परतले. 

यासंदर्भात बीएलओ म्हणाले की, ग्रा.पं.ला सर्व याद्या दिल्या होत्या; पण मतदारांनी फोटो किंवा कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांचे नाव डिलीट झाल्याचे सांगितले. यासंदर्भात सरपंच म्हणाले की, गावातील अनेक मतदारांचे नाव डिलीट झाले आहे. ते दुरुस्त करून घ्यावे, अशी विनंती तालुका निवडणूक अधिकारी परदेशी यांना केली; पण त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप सरपंचांनी केला.

यादीतून अनेकांची नावे गायब मतदार यादीत नाव नसल्याने तर काहींची नावे इतरत्र ठिकाणी असल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. तीसगाव येथील सरोजिनी बढे, अतुल बढे, संजय पाटील, वडगाव कोल्हाटी येथील आशा साळवे, सुनीता चव्हाण यांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही. अशा अनेक मतदारांना ओळखपत्र असूनही मतदान केंद्रावर आल्यावर केवळ यादीत नाव नसल्याने मतदान न करताच घरी जावे लागल्याचे चित्र वाळूज महानगर परिसरात दिसून आले. 

ईडीसी न मिळाल्यामुळे मतदानापासून वंचित इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट  (ईडीसी) न मिळाल्यामुळे अनेक सरकारी कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले. मतदारसंघ बदलल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना ईडीसी मिळाले नाही. परिणामी त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ईडीसी भरून घेतल्यानंतर १२ (ड) अर्ज मिळतो, तो अर्जही मतदारांना मिळाला नाही. याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. शासकीय कर्मचाऱ्यांचे ईडीसी प्रशिक्षणादरम्यान भरून घेण्यात आले होते. ५५०० कर्मचाऱ्यांना ते देण्यात आले होते. शहर पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांसाठी ईडीसी दिले होते. ईडीसीआधारे कुठल्याही मतदान केंद्रांवर संबंधित मतदाराला मतदान करता येणे शक्य होते. बीएलओकडे ईडीसी जमा करून मतदानाचा हक्क बजावता येतो. काही ठिकाणी ईडीसी न मिळाल्याच्या तक्रारी होत्या, याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, ठराविक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नाहीत. 

सोशल मीडियातून गोपनीयतेचा भंगसोशल मीडियातून अनेक मतदारांनी कुणाला मतदान केले, त्याची माहिती फेसबुकवर टाकून मतदान गोपनीयतेचा भंग केला. जिल्हा व राज्य पातळीवरील समितीकडे याबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी मतदान गोपनीयतेचा भंग केला, त्यांना सोशल मीडियातून ट्रेस करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. तत्पूर्वी, समितीमार्फत याबाबत चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019