शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : मतदार यादीत अनेकांच्या नावावर ‘डिलीट’चा शिक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 12:36 IST

सहा बुथवर ५ हजार ९२२ मतदानापैकी ४०० मतदारांच्या नावावर डिलीटचा शिक्का

औरंगाबाद/पिंप्रीराजा : औरंगाबाद शहरासह तालुक्यातील पिंप्रीराजा आणि इतर काही गावांमध्ये मतदारांची नावे ‘डिलीट’ केल्याचे समोर आले. 

पिंप्रीराजा येथील एकूण  सहा बुथवर ५ हजार ९२२ मतदानापैकी ४०० मतदारांच्या नावावर डिलीटचा शिक्का आढळून आला. त्यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. या यादीत काही नावे मृत व्यक्तींची होती; पण यात अनेक जिवंत मतदारांच्या नावांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे काही मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती केली; पण तुमचा फोटो मतदार यादीत नसल्यामुळे तुम्हाला मतदान करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मतदार मतदान न करताच परतले. 

यासंदर्भात बीएलओ म्हणाले की, ग्रा.पं.ला सर्व याद्या दिल्या होत्या; पण मतदारांनी फोटो किंवा कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांचे नाव डिलीट झाल्याचे सांगितले. यासंदर्भात सरपंच म्हणाले की, गावातील अनेक मतदारांचे नाव डिलीट झाले आहे. ते दुरुस्त करून घ्यावे, अशी विनंती तालुका निवडणूक अधिकारी परदेशी यांना केली; पण त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप सरपंचांनी केला.

यादीतून अनेकांची नावे गायब मतदार यादीत नाव नसल्याने तर काहींची नावे इतरत्र ठिकाणी असल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. तीसगाव येथील सरोजिनी बढे, अतुल बढे, संजय पाटील, वडगाव कोल्हाटी येथील आशा साळवे, सुनीता चव्हाण यांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याने त्यांना मतदान करता आले नाही. अशा अनेक मतदारांना ओळखपत्र असूनही मतदान केंद्रावर आल्यावर केवळ यादीत नाव नसल्याने मतदान न करताच घरी जावे लागल्याचे चित्र वाळूज महानगर परिसरात दिसून आले. 

ईडीसी न मिळाल्यामुळे मतदानापासून वंचित इलेक्शन ड्यूटी सर्टिफिकेट  (ईडीसी) न मिळाल्यामुळे अनेक सरकारी कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले. मतदारसंघ बदलल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना ईडीसी मिळाले नाही. परिणामी त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ईडीसी भरून घेतल्यानंतर १२ (ड) अर्ज मिळतो, तो अर्जही मतदारांना मिळाला नाही. याप्रकरणी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. शासकीय कर्मचाऱ्यांचे ईडीसी प्रशिक्षणादरम्यान भरून घेण्यात आले होते. ५५०० कर्मचाऱ्यांना ते देण्यात आले होते. शहर पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांसाठी ईडीसी दिले होते. ईडीसीआधारे कुठल्याही मतदान केंद्रांवर संबंधित मतदाराला मतदान करता येणे शक्य होते. बीएलओकडे ईडीसी जमा करून मतदानाचा हक्क बजावता येतो. काही ठिकाणी ईडीसी न मिळाल्याच्या तक्रारी होत्या, याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, ठराविक तक्रारी माझ्यापर्यंत आल्या नाहीत. 

सोशल मीडियातून गोपनीयतेचा भंगसोशल मीडियातून अनेक मतदारांनी कुणाला मतदान केले, त्याची माहिती फेसबुकवर टाकून मतदान गोपनीयतेचा भंग केला. जिल्हा व राज्य पातळीवरील समितीकडे याबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्यांनी मतदान गोपनीयतेचा भंग केला, त्यांना सोशल मीडियातून ट्रेस करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. तत्पूर्वी, समितीमार्फत याबाबत चौकशी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019