शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

Lok Sabha Election 2019 : वचन देण्यापुरताच खैरेंचा वचननामा मर्यादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 14:40 IST

खैरे विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांना सामोरे जात आहेत.

ठळक मुद्देशहर तहानेने व्याकूळ गुंठेवारीचा प्रश्न कायमनवी रेल्वे कागदावरचवचननाम्याविषयी बोंबाबोंबच

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा, रिपाइं (आ), रासप गटाचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे हे मैदानात आहेत. १९९९ पासून ते मतदारसंघातून संसदेत जात असून, जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी प्रचारात सेवा, सुरक्षा, विकासाचा मुद्दा घेऊन ते मतदारांना सामोरे जात आहेत. समाजसेवा हेच ध्येच असल्याचे ते सांगतात. आजवर शहरातील बहुतांश विकासकामांचा दाखला देऊन आगामी काळात संधी मिळाल्यास शहरात विकासकामे करणार असल्याचे सध्या सांगत असले तरी मागील निवडणुकीत त्यांनी जो जाहीरनामा सादर केला होता, त्यातील किती कामे पूर्ण झाली, याचा लेखाजोखा. 

समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना आणि सिमेंट रस्ते करणार असल्याचे त्यांनी मागच्या निवडणुकीत जाहीर केले होते. समांतर जलवाहिनी काही पूर्ण झाली नाही. भूमिगत गटार योजना गटांगळ्या खात आहे, तर शहरातील सिमेंट रस्त्यांवरून अजूनही ओरड सुरू आहे. शहरात पाणीपुरवठाही तीन दिवसाआड होतो आहे, पर्यटननगरी खड्ड्यांत गेली आहे. औरंगाबाद जरी ऐतिहासिक व पर्यटनाचे शहर असले तरी त्याचे मार्केटिंग चांगले झालेले नाही. रस्ते पाहिल्यावर पर्यटक एकदा आले, तर नंतर पुन्हा येणार नाहीत, अशी अवस्था आहे. पुरातत्व विभागाची बांधकाम स्थगिती उठविणे, समांतरसाठी केंद्राचा निधी मिळविणे, भूमिगत गटार योजनेसाठी केंद्राचा निधी मिळविण्यासारखी कामे खा. खैरे यांना आघाडी सरकारच्या काळात करता आली.

२०१४ पासून आजपर्यंत केंद्र शासनाकडून खासदार म्हणून त्यांना उल्लेखनीय असे कोणतेही काम करता आलेले नाही. विमानसेवा, रेल्वेवाहतूक, औरंगाबद रिंगरोड, बीड बायपास, जालना रोडसाठी केंद्र शासनाकडून निधी आणण्याबाबत त्यांना काहीही करता आलेले नाही. संसदेतील अधिवेशनात हजेरी लावणे आणि प्रश्न उपस्थित करण्यापलीकडे शहर व जिल्हा म्हणून केंद्र शासनाकडून विशेष असे योगदान मागील पाच वर्षांत मिळविता आले नाही.

असा होता वचननामा                                                                                     सद्य:स्थितीत काय आहे१. समांतर जलवाहिनी योजनेतून २४ तास पाणी देणार                                  योजना सुरूच झाली नाही२. टुरिझम हब म्हणून सर्वांगीण विकास करणार                                            आश्वासन कागदावरच राहिले३. खाम नदी व नहर-ए-अंबरीचे पुनरुज्जीवन करणार                                    काहीही केले नाही४. हिमायतबागेचा कृषी उद्यान विकास करणार                                            काहीही केले नाही५. औद्योगिक वसाहतीत एकात्मिक वाहतूक प्रणाली आणणार                                                                                                                                                                                                       घोषणेपुरते राहिला मुद्दा६. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविणार                                             प्रश्न सुटलेला नाही७. दुष्काळग्रस्तांना भरीव मदतीचे आश्वासन                                                 यावर फक्त आंदोलने केली८. औद्योगिक वसाहतींसाठी विशेष योजना राबविणार                                  कुठलीही योजना राबविली नाही९. शहरातील गुंठेवारीची समस्या सोडविणार                                                 गुंठेवारीतील प्रश्न जैसे थे१०. नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार                                          फारसे प्रयत्न केले नाहीत११. शहराबाहेर हायवे चौपदरी करण्याचे आश्वासन                                       कुठलेही प्रयत्न झाले नाहीत१२. जिल्ह्यात वारकरी भवन उभारणार                                                        मुद्दा कागदावरच राहिला

जिल्ह्यात विकासकामे केलीखा. चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. दुष्काळामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत तर केलीच. शिवाय सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला. शहरातील रस्ते विकासासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळेच निधी मिळाला.     -प्रशांत डिघुळे 

दलित वस्तीत एकही काम नाहीशहर व जिल्हा भरात दलित वस्तीत कोणतेही विकासकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्याला खासदाराचे काम काय असते, याविषयी कोणतेही आश्वासन फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित असते. जनतेच्या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष झाले आहे. -सुनील घाटे

ऐतिहासिक शहराचा कचरा केलाऐतिहासिक तसेच औद्योगिक क्षेत्रासह शहराच्या पर्यटनाचा खा. चंद्रकांत खैरे यांनी कचराच केला असून, कामगार बेरोजगार झाले तरीदेखील केंद्रात एकदाही कामगार कायद्यावर ठराव मांडला नाही. २० वर्षांत नेत्रदिपक कामगिरीची कोणताही इतिहास सांगणे शक्य नाही. - अ‍ॅड. उद्धव भवलकर

वाड्या, तांड्यांवर कामे झालीनिवडणूक जाहीरनाम्यात कार्यकर्त्यांना व स्थानिक नागरिकांना दिलेल्या आश्वासनात रस्ते, तसेच सामाजिक सभागृहाचे काम खा. चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. वस्ती, वाड्या, तांड्यांवर ते सतत धावून येतात. - राजेंद्र राठोड  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण