शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू
2
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
3
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
4
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
5
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
6
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
7
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
8
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
9
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
10
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
11
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
12
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
13
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
14
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
15
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
16
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
18
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
19
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
20
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Lok Sabha Election 2019 : वचन देण्यापुरताच खैरेंचा वचननामा मर्यादित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 14:40 IST

खैरे विकासाचा मुद्दा घेऊन मतदारांना सामोरे जात आहेत.

ठळक मुद्देशहर तहानेने व्याकूळ गुंठेवारीचा प्रश्न कायमनवी रेल्वे कागदावरचवचननाम्याविषयी बोंबाबोंबच

औरंगाबाद : लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपा, रिपाइं (आ), रासप गटाचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे हे मैदानात आहेत. १९९९ पासून ते मतदारसंघातून संसदेत जात असून, जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी प्रचारात सेवा, सुरक्षा, विकासाचा मुद्दा घेऊन ते मतदारांना सामोरे जात आहेत. समाजसेवा हेच ध्येच असल्याचे ते सांगतात. आजवर शहरातील बहुतांश विकासकामांचा दाखला देऊन आगामी काळात संधी मिळाल्यास शहरात विकासकामे करणार असल्याचे सध्या सांगत असले तरी मागील निवडणुकीत त्यांनी जो जाहीरनामा सादर केला होता, त्यातील किती कामे पूर्ण झाली, याचा लेखाजोखा. 

समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना आणि सिमेंट रस्ते करणार असल्याचे त्यांनी मागच्या निवडणुकीत जाहीर केले होते. समांतर जलवाहिनी काही पूर्ण झाली नाही. भूमिगत गटार योजना गटांगळ्या खात आहे, तर शहरातील सिमेंट रस्त्यांवरून अजूनही ओरड सुरू आहे. शहरात पाणीपुरवठाही तीन दिवसाआड होतो आहे, पर्यटननगरी खड्ड्यांत गेली आहे. औरंगाबाद जरी ऐतिहासिक व पर्यटनाचे शहर असले तरी त्याचे मार्केटिंग चांगले झालेले नाही. रस्ते पाहिल्यावर पर्यटक एकदा आले, तर नंतर पुन्हा येणार नाहीत, अशी अवस्था आहे. पुरातत्व विभागाची बांधकाम स्थगिती उठविणे, समांतरसाठी केंद्राचा निधी मिळविणे, भूमिगत गटार योजनेसाठी केंद्राचा निधी मिळविण्यासारखी कामे खा. खैरे यांना आघाडी सरकारच्या काळात करता आली.

२०१४ पासून आजपर्यंत केंद्र शासनाकडून खासदार म्हणून त्यांना उल्लेखनीय असे कोणतेही काम करता आलेले नाही. विमानसेवा, रेल्वेवाहतूक, औरंगाबद रिंगरोड, बीड बायपास, जालना रोडसाठी केंद्र शासनाकडून निधी आणण्याबाबत त्यांना काहीही करता आलेले नाही. संसदेतील अधिवेशनात हजेरी लावणे आणि प्रश्न उपस्थित करण्यापलीकडे शहर व जिल्हा म्हणून केंद्र शासनाकडून विशेष असे योगदान मागील पाच वर्षांत मिळविता आले नाही.

असा होता वचननामा                                                                                     सद्य:स्थितीत काय आहे१. समांतर जलवाहिनी योजनेतून २४ तास पाणी देणार                                  योजना सुरूच झाली नाही२. टुरिझम हब म्हणून सर्वांगीण विकास करणार                                            आश्वासन कागदावरच राहिले३. खाम नदी व नहर-ए-अंबरीचे पुनरुज्जीवन करणार                                    काहीही केले नाही४. हिमायतबागेचा कृषी उद्यान विकास करणार                                            काहीही केले नाही५. औद्योगिक वसाहतीत एकात्मिक वाहतूक प्रणाली आणणार                                                                                                                                                                                                       घोषणेपुरते राहिला मुद्दा६. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविणार                                             प्रश्न सुटलेला नाही७. दुष्काळग्रस्तांना भरीव मदतीचे आश्वासन                                                 यावर फक्त आंदोलने केली८. औद्योगिक वसाहतींसाठी विशेष योजना राबविणार                                  कुठलीही योजना राबविली नाही९. शहरातील गुंठेवारीची समस्या सोडविणार                                                 गुंठेवारीतील प्रश्न जैसे थे१०. नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार                                          फारसे प्रयत्न केले नाहीत११. शहराबाहेर हायवे चौपदरी करण्याचे आश्वासन                                       कुठलेही प्रयत्न झाले नाहीत१२. जिल्ह्यात वारकरी भवन उभारणार                                                        मुद्दा कागदावरच राहिला

जिल्ह्यात विकासकामे केलीखा. चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. दुष्काळामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदत तर केलीच. शिवाय सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला. शहरातील रस्ते विकासासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळेच निधी मिळाला.     -प्रशांत डिघुळे 

दलित वस्तीत एकही काम नाहीशहर व जिल्हा भरात दलित वस्तीत कोणतेही विकासकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्याला खासदाराचे काम काय असते, याविषयी कोणतेही आश्वासन फक्त निवडणुकीपुरतेच मर्यादित असते. जनतेच्या प्रश्नाकडे सतत दुर्लक्ष झाले आहे. -सुनील घाटे

ऐतिहासिक शहराचा कचरा केलाऐतिहासिक तसेच औद्योगिक क्षेत्रासह शहराच्या पर्यटनाचा खा. चंद्रकांत खैरे यांनी कचराच केला असून, कामगार बेरोजगार झाले तरीदेखील केंद्रात एकदाही कामगार कायद्यावर ठराव मांडला नाही. २० वर्षांत नेत्रदिपक कामगिरीची कोणताही इतिहास सांगणे शक्य नाही. - अ‍ॅड. उद्धव भवलकर

वाड्या, तांड्यांवर कामे झालीनिवडणूक जाहीरनाम्यात कार्यकर्त्यांना व स्थानिक नागरिकांना दिलेल्या आश्वासनात रस्ते, तसेच सामाजिक सभागृहाचे काम खा. चंद्रकांत खैरे यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. वस्ती, वाड्या, तांड्यांवर ते सतत धावून येतात. - राजेंद्र राठोड  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण