शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

Lok Sabha Election 2019 : मतदान केंद्रावर पाणी, वीज, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 19:42 IST

प्रशासनाकडून सर्व मतदान केंद्रनिहाय माहितीचे संकलन 

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील १९३६ मतदान केंद्रांपैकी ७८ केंद्रांवर वीज, पाणी, इंटरनेट सेवा पुरविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. ज्या मतदान केंद्रांवर भौतिक सुविधा नाहीत, त्या केंद्रांची माहिती संकलित करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. 

सूत्रांनी सांगितले की, ७८ केंद्रांवर वीजपुरवठा नाही. तेथे वीजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी महावितरण कंपनीला सूचना करण्यात आल्या आहेत. उन्हाळ्याच्या काळात निवडणुका असल्यामुळे मतदान केंद्रावर वीजपुरवठा असणे आवश्यक आहे. शिवाय इंटरनेट सेवा सुरळीत मिळावी, यासाठी सर्व मोबाईल कंपन्यांशी २ महिन्यांपूर्वी चर्चा झाली आहे. मतदान केंद्रांवर कार्यरत कर्मचाऱ्यांकडून काही माहिती घ्यायची असल्यास इंटरनेट सेवा महत्त्वाची असेल. त्यामुळे प्राधान्याने त्यासाठी तयारी केली आहे.

पाणीपुरवठा प्रत्येक मतदान केंद्रावर करता येईल, कर्मचाऱ्यांसह मतदारांसाठीदेखील पाणी उपलब्ध होईल, यासाठी आढावा घेण्यात आला आहे. उन्हाळ्यामुळे मतदान केंद्राबाहेर सावलीची व्यवस्था व्हावी, यासाठी शेड टाकण्यात येणार आहेत. बहुतांश मतदान केंद्रे तळमजल्यावर आहेत. 

२३ एप्रिल रोजी मतदान आहे, तोपर्यंत नियोजन करण्यासाठी कालावधी आहे. पाणी, वीज, इंटरनेट सेवा तत्पर ठेवण्याचे सध्या आव्हान असले तरी त्या सुविधा देण्यासाठी तयारी केली जात आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात सध्या १८ लाख ५७ हजार ६४५ मतदार आहेत. १० एप्रिलपर्यंत यामध्ये भर पडण्याची शक्यता आहे. 

मतदारसंघातील मतदान केंद्र

विधानसभा मतदारसंघ    केंद्र कन्नड    ३५१औरंगाबाद मध्य    ३१२औरंगाबाद पश्चिम    ३३६औरंगाबाद पूर्व    २९२गंगापूर    २९९वैजापूर    ३४६एकूण    १९३६

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग