शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
2
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
3
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
4
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
5
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
6
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
7
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
8
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
9
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
10
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
11
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
12
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
13
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
14
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
15
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
16
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
17
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
18
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
19
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

Lok Sabha Election 2019 : खैरेंच्या भेटीनंतर शांतिगिरी महाराजांचा निर्णय बदलला; निवडणूक न लढता करणार मतदार जागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:18 IST

हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी घेतला निर्णय

औरंगाबाद : खैरेंच्या भेटीनंतर वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुक न लढण्याची भूमिका आज पत्रकार परिषदेत जाहीर केली. हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी जाहीर करत आपण मतदार जनजागृती करणार आल्याची माहिती दिली. 

शुक्रवारी निवडणुकीच्या अनुषंगाने  शांतीगिरी महाराजांनी दोन उमेदवारी अर्ज घेऊन औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्यासाठी संकेत दिले होते. शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड, अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील यांनी आजवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराजांनी  आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मतदानाचा टक्का वाढण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहोत. 

खैरेंच्या भेटीनंतर झाला निर्णय शांतिगिरी महाराज यांनी युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची आज सकाळी भेट झाली. यानंतर हिंदू मतदानाचे विभाजन होऊ नये यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले. 

२००९ ला लढवली होती निवडणूक शांतीगिरी महाराज यांनी २००९ ला औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून  निवडणूक लढवली होती. यात १ लाख ४८ हजार २६ मते घेत त्यांनी काँग्रेसला पराभवाकडे नेले तर शिवसेनेचे मताधिक्य कमी केले होते. ही मते निर्णायक ठरली होती. कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जय बाबाजी परिवार आहे. 

वर्षभरापासून मठात नेत्यांची हजेरी मागील वर्षभरात महाराजांच्या मठात भाजप, काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावून स्रेहभोजनही घेतले. महाराजांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. नाशिक, जळगाव, औरंगाबादपैकी कुठेही त्यांना विचार झाला नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण