शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Lok Sabha Election 2019 : खैरेंच्या भेटीनंतर शांतिगिरी महाराजांचा निर्णय बदलला; निवडणूक न लढता करणार मतदार जागृती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 18:18 IST

हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी घेतला निर्णय

औरंगाबाद : खैरेंच्या भेटीनंतर वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुक न लढण्याची भूमिका आज पत्रकार परिषदेत जाहीर केली. हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी जाहीर करत आपण मतदार जनजागृती करणार आल्याची माहिती दिली. 

शुक्रवारी निवडणुकीच्या अनुषंगाने  शांतीगिरी महाराजांनी दोन उमेदवारी अर्ज घेऊन औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढण्यासाठी संकेत दिले होते. शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. सुभाष झांबड, अपक्ष उमेदवार आ. हर्षवर्धन जाधव, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील यांनी आजवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराजांनी  आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण निवडणूक लढणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मतदानाचा टक्का वाढण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणार आहोत. 

खैरेंच्या भेटीनंतर झाला निर्णय शांतिगिरी महाराज यांनी युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची आज सकाळी भेट झाली. यानंतर हिंदू मतदानाचे विभाजन होऊ नये यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले. 

२००९ ला लढवली होती निवडणूक शांतीगिरी महाराज यांनी २००९ ला औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून  निवडणूक लढवली होती. यात १ लाख ४८ हजार २६ मते घेत त्यांनी काँग्रेसला पराभवाकडे नेले तर शिवसेनेचे मताधिक्य कमी केले होते. ही मते निर्णायक ठरली होती. कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जय बाबाजी परिवार आहे. 

वर्षभरापासून मठात नेत्यांची हजेरी मागील वर्षभरात महाराजांच्या मठात भाजप, काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावून स्रेहभोजनही घेतले. महाराजांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. नाशिक, जळगाव, औरंगाबादपैकी कुठेही त्यांना विचार झाला नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादPoliticsराजकारण