शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

लॉकडाऊनमुळे ‘डीएमआयसी’च्या विकासाला खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:04 IST

औरंगाबाद : गेल्या वर्षापासून सतत दोन वेळा लागलेल्या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीत (डीएमआयसी) विकास कामांबरोबर गुंतवणुकीची प्रक्रियाही थांबली ...

औरंगाबाद : गेल्या वर्षापासून सतत दोन वेळा लागलेल्या लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक वसाहतीत (डीएमआयसी) विकास कामांबरोबर गुंतवणुकीची प्रक्रियाही थांबली आहे. मागील तीन-चार वर्षांपासून या औद्योगिक वसाहतीत उद्योगांना प्लॉट देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या ठिकाणी पुरेशा प्रमाणात गुंतवणूक व्हावी, यासाठी अलीकडच्या काळात मार्केटिंग करण्यास उद्योग विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सुमारे दहा हजार एकर क्षेत्र असलेल्या ‘डीएमआयसी’मध्ये शेंद्रा औद्योगिक पट्ट्यात (ऑरिक सिटी) ‘ह्योसंग’, पर्किन्स या मोठ्या उद्योगांसह १०-१२ उद्याेगांचे उत्पादनही सुरू झाले आहे. अलीकडेच स्टील उद्योगातील अग्रगण्य रशियन कंपनी ‘नोव्होलिपटेस्क’ (एनएलएमके) व फ्यूजी सिल्व्हर टेक या उद्योगांसह ६१ उद्योगांना जागा हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे बिडकीन औद्योगिक पट्ट्यात पायाभूत सुविधांची बऱ्यापैकी कामे झाली आहेत, परंतु तेथे अद्याप एकही अँकर प्रोजेक्ट आलेला नाही.

बिडकीन औद्योगिक पट्ट्यात ‘फूडपार्क’ उभारण्यासाठी ‘औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाउनशिप लिमिटेड’च्या (एआयटीएल) संचालक मंडळाने पाच महिन्यांपूर्वीच मान्यता दिली. त्यानंतर, अन्नप्रकिया उद्योगांशी संबंधित देश-विदेशातील उद्योगांना निमंत्रित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यानच्या कालावधीत देश-विदेशात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने ही प्रक्रिया पुन्हा थांबली. लॉकडाऊनमुळे ‘डीएमआयसी’तील गुंतवणुकीबाबत मार्केटिंग करण्यास अडचणी येत आहेत, असे ‘एआयटीएल’चे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी सांगितले.

शेंद्रा औद्योगिक वसाहतीजवळून समृद्धी महामार्गाची ‘डीएमआयसी’ला कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रस्तावही ‘एमआयडीसी’ संचालक मंडळाने मंजूर केला. त्यानुसार, ‘एमएसआरडीसी’ला जवळपास ४१ कोटी रुपयांचा निधीही हस्तांतरित करण्यात आला. मात्र, भूसंपादनासाठी शेतकऱ्यांसोबत लॉकडाऊनमुळे बैठका घेता येत नाहीत. काही शेतकरी दामदुप्पट भावाने जमिनी देण्यासाठी अडून बसले आहेत. त्यांच्यासोबत तडजोड करण्यासाठी बैठका घेता येत नाहीत. त्यामुळे कनेक्टिव्हिटीचेही काम रखडले आहे, असे काटकर यांचे म्हणणे आहे.

चौकट....

लॉकडाऊन उठल्यानंतर प्रक्रिया गतीने

‘डीएमआयसी’मध्ये गुंतवणूक करण्यास देश-विदेशातील उद्योगांना निमंत्रणे दिली आहेत, पण कोरोनामुळे गेल्या वर्षापासून प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन पाहणी करण्यासाठी उद्योजकांना अडचणी येत आहेत. आताही लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया ठप्प झाली आहे. फूडपार्कबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला. त्याबाबत हालचाली गतिमान झाल्या होत्या, पण आता त्याही मध्येच थांबल्या. लॉकडाऊन उठताच, येथे गुंतवणूक वाढविण्याच्या सर्व प्रक्रिया आम्ही पुन्हा त्याच गतीने पार पाडू, असे संजय काटकर यांनी सांगितले.